शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

वरवर गोड बोलतात आणि पक्ष सोडून गेलं पाहिजे असं वागतात!; एकनाथ खडसेंचं 'टार्गेट फडणवीस'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 14:42 IST

माझ्यावर आरोप झाले तसे मुंडे साहेंबावर झाले होते. ज्या पद्धतीने मुंडे साहेबांवर आरोप झाले तसे माझे झाले.

परळी - जनसंघापासून आजच्या भाजपापर्यंत वाटचाल आम्ही पाहिली आहे, देशात २ खासदार आणि महाराष्ट्रात १० च्या पुढे आमदार जात नव्हते. शेठजी, भटजी पक्ष म्हणून भाजपाची ओळख होती. त्याला बहुजनाचा चेहरा देण्याचं काम गोपीनाथ मुंडे यांनी केलं. महादेव जानकर सांगतात कितीही छळ केला तरी सोडणार नाही, का सोडणार नाही कारण गोपीनाथ मुंडे यांच्यावरचं ते प्रेम आहे. ज्यांनी ४० वर्ष पक्षासाठी झटलो त्यांना अशी वागणूक का? आम्ही बाहेर पडत नाही तर आम्हाला तसं करण्यासाठी प्रवृत्त केलं जात आहे. वरवर गोड बोलतात आणि पक्ष सोडून गेलं पाहिजे असं वागतात असा आरोप एकनाथ खडसेंनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. 

यावेळी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, माझ्यावर आरोप झाले तसे मुंडे साहेंबावर झाले होते. ज्या पद्धतीने मुंडे साहेबांवर आरोप झाले तसे माझे झाले. ज्यांच्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री झालात, मंत्री झाला मग त्यांना काढण्याचं काम का केलं? जे गोपीनाथ मुंडे यांनी सहन केलं ते आम्ही सहन करत आहोत. मग किती दिवस हे सहन करायचं? पुढे काय करायचं? हे तुम्ही सांगा असं उपस्थित जनतेलं त्यांनी विचारलं. 

त्याचसोबत देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. २३ नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. २६ नोव्हेंबरला राजीनामा दिला. ५ वर्षापूर्वी मी मंत्री असताना गोपीनाथ मुंडे स्मारक उभारण्यासाठी औरंगबाद येथील दुग्धविकास विभागाची जागा मी दिली. गेली ५ वर्ष भाजपा सरकार असून निधी दिला नाही. २४ नोव्हेंबरला स्व. गोपीनाथ मुंडे स्मारकासाठी निधी दिला. २५ नोव्हेंबरला औरंगाबाद येथे कंत्राट निघालं. आणि २६ नोव्हेंबरला राजीनामा दिला. ८० तासांच्या सरकारमध्ये हे सगळं घडलं. मग कुणासाठी सीएम झाले होते? त्यासाठी त्यांचे आभार मानतो असा चिमटाही एकनाथ खडसेंनी फडणवीसांना काढला. 

तसेच जास्त उघड करणार नाही कारण शिस्तभंगाची कारवाई करतील. माझा गुन्हा काय हे सभागृहात, लोकांसमोर, टीव्हीसमोर सगळीकडे विचारलं तरी उत्तर मिळालं नाही. मग पक्षात जीव गुदमरणार नाही का? पक्षात राहून न्याय मिळत नाही मग काय करणार? माझ्या जीवनात जसा प्रसंग आला, गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनात जसा प्रसंग आला तसा पंकजा मुंडे यांच्या जीवनात येऊ नये, पंकजा मुंडे यांच्या पाठिशी आम्ही सगळे खंबीर आहोत. माझ्याजवळ खूप काही आहे, भरपूर आहे पण बोलायला वेळ नाही असं सांगत इशाराही एकनाथ खडसेंनी दिला.      

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGopinath Mundeगोपीनाथ मुंडेBJPभाजपाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार