शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

राज्यात दोन आठवडे पाऊस नाही; विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 3:17 AM

६ ते १२ जून या कालावधीत ईशान्य भारत आणि दक्षिण कर्नाटकच्या भागात पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे : राज्यात १२ जूनपर्यंत पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यामुळे आभाळाकडे तोंड लावून बसलेल्या बळीराजाला आणखी दोन आठवडे पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हवामान विभागाने येत्या १२ जूनपर्यंतच्या पावसाचा अंदाज गुरुवारी (दि. ३०) जाहीर केला. २० मे च्या सुमारास अंदमान आणि निकोबार बेटांवर मॉन्सूनचे आगमन झाले. मात्र, प्रतिकूल परिस्थितीमुळे मॉन्सूनची पुढील वाटचाल थांबलेली आहे. केरळमध्येही मॉन्सूनचे आगमन झालेले नाही. मात्र, स्थानिक स्थितीमुळे केरळासह महाराष्ट्रातील काही भागात येत्या सप्ताहात पावसाच्या काही सरी कोसळतील.येत्या आठवड्यात ईशान्य भारतात जोरदार पाऊस कोसळेल, बिहार, झारखंड, दक्षिण कर्नाटकातील काही भाग, केरळ आणि लक्षद्वीप येथे तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. ६ ते १२ जून या कालावधीत ईशान्य भारत आणि दक्षिण कर्नाटकच्या भागात पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. वळवाच्या पावसाची पाठदेशात १ मार्च ते २९ मे या कालावधीत होणाऱ्या पावसात २४ टक्के घट झाली आहे. देशात या काळात सरासरी १२६.६ मिलिमीटर पाऊस पडतो. आत्तापर्यंत देशभरात सरासरी ९६.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उत्तर पश्चिम भारतात ७८ मिलिमीटर (२९ टक्के घट), मध्यभारतात ३१.७ (१७ टक्के घट), दक्षिण भारतात ६१.८ (४८ टक्के घट) आणि ईशान्य भारतात ३१२.५ मिलिमीटर (१२ टक्के घट) पाऊस झाला आहे.

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाVidarbhaविदर्भweatherहवामान