शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

महाराष्ट्रातील मतदार याद्यांत कोणताही घोळ झालेला नाही; काँग्रेसला ६० पानी उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 08:57 IST

निवडणूक आयोगाने केले स्पष्ट

चंद्रशेखर बर्वे 

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसने केलेले सर्व आरोप मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळून लावले. जवळपास ५० मतदारसंघांत ५० हजारांपेक्षा अधिक नावे बेकायदेशीरपणे मतदार याद्यांमध्ये समाविष्ट केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. मात्र, केंद्रीय निवडणूक दिलेल्या तब्बल ६० पानांच्या उत्तरात काँग्रेसचे सर्व आरोप मुद्देनिहाय फेटाळून लावले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदार यादीत बेकायदेशीरपणे नावे जोडली गेली नाहीत किंवा वगळण्यात आली नाहीत. मतदार याद्यांमध्ये कोणताही घोळ झालेला नाही, असे आयोगाने म्हटले आहे. महाराष्ट्र व हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसने ईव्हीएम आणि मतदार याद्यांवर शंका उपस्थित केली होती. महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढवून दाखविली जात आहे. सायंकाळी पाच वाजता संपलेल्या मतदानाची आकडेवारी आणि अंतिम आकडेवारी यात मोठी तफावत आहे, असे आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. दरम्यान, सायंकाळी पाच वाजेच्या मतदान आकडेवारीची तुलना अंतिम आकडेवारीशी करणे योग्य नाही, असे निवडणूक आयोगाने काँग्रेसला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.

काय म्हटले आयोगाने? 

सायंकाळी ५ ते पावणेबारा या वेळेत मतदानात वाढ होणे एक सामान्य बाब आहे. कारण, यादरम्यान मतदानाच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरू असते. 

वास्तविक, मतदान आणि मतांची मोजणी यात किंचितसा फरक आढळून येऊ शकतो, असेही आयोगाने म्हटले. 

कारण, एकूण मतदानाची माहिती असलेला फॉर्म १७-सी हा प्रत्येक उमेदवाराच्या प्रतिनिधीला दिला जातो. एवढेच नव्हेतर, मतदार यादी तयार करताना सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते.

यामुळे मतदारांची नावे काढण्यात कोणत्याही प्रकारची अनियमितता झाली नाही, असे आयोगाने स्पष्ट केले. ५० मतदारसंघांत याद्यांमध्ये ५० हजार मतदारांची नावे अतिशय हुशारीने जोडण्यात आली. त्यामुळे यापैकी ४७ मतदारसंघांत भाजपचा विजय झाला, असा आरोप काँग्रेसने केला होता. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रVotingमतदान