शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील मतदार याद्यांत कोणताही घोळ झालेला नाही; काँग्रेसला ६० पानी उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 08:57 IST

निवडणूक आयोगाने केले स्पष्ट

चंद्रशेखर बर्वे 

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसने केलेले सर्व आरोप मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळून लावले. जवळपास ५० मतदारसंघांत ५० हजारांपेक्षा अधिक नावे बेकायदेशीरपणे मतदार याद्यांमध्ये समाविष्ट केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. मात्र, केंद्रीय निवडणूक दिलेल्या तब्बल ६० पानांच्या उत्तरात काँग्रेसचे सर्व आरोप मुद्देनिहाय फेटाळून लावले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदार यादीत बेकायदेशीरपणे नावे जोडली गेली नाहीत किंवा वगळण्यात आली नाहीत. मतदार याद्यांमध्ये कोणताही घोळ झालेला नाही, असे आयोगाने म्हटले आहे. महाराष्ट्र व हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसने ईव्हीएम आणि मतदार याद्यांवर शंका उपस्थित केली होती. महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढवून दाखविली जात आहे. सायंकाळी पाच वाजता संपलेल्या मतदानाची आकडेवारी आणि अंतिम आकडेवारी यात मोठी तफावत आहे, असे आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. दरम्यान, सायंकाळी पाच वाजेच्या मतदान आकडेवारीची तुलना अंतिम आकडेवारीशी करणे योग्य नाही, असे निवडणूक आयोगाने काँग्रेसला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.

काय म्हटले आयोगाने? 

सायंकाळी ५ ते पावणेबारा या वेळेत मतदानात वाढ होणे एक सामान्य बाब आहे. कारण, यादरम्यान मतदानाच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरू असते. 

वास्तविक, मतदान आणि मतांची मोजणी यात किंचितसा फरक आढळून येऊ शकतो, असेही आयोगाने म्हटले. 

कारण, एकूण मतदानाची माहिती असलेला फॉर्म १७-सी हा प्रत्येक उमेदवाराच्या प्रतिनिधीला दिला जातो. एवढेच नव्हेतर, मतदार यादी तयार करताना सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते.

यामुळे मतदारांची नावे काढण्यात कोणत्याही प्रकारची अनियमितता झाली नाही, असे आयोगाने स्पष्ट केले. ५० मतदारसंघांत याद्यांमध्ये ५० हजार मतदारांची नावे अतिशय हुशारीने जोडण्यात आली. त्यामुळे यापैकी ४७ मतदारसंघांत भाजपचा विजय झाला, असा आरोप काँग्रेसने केला होता. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रVotingमतदान