शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

महाराष्ट्रातील मतदार याद्यांत कोणताही घोळ झालेला नाही; काँग्रेसला ६० पानी उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 08:57 IST

निवडणूक आयोगाने केले स्पष्ट

चंद्रशेखर बर्वे 

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसने केलेले सर्व आरोप मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळून लावले. जवळपास ५० मतदारसंघांत ५० हजारांपेक्षा अधिक नावे बेकायदेशीरपणे मतदार याद्यांमध्ये समाविष्ट केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. मात्र, केंद्रीय निवडणूक दिलेल्या तब्बल ६० पानांच्या उत्तरात काँग्रेसचे सर्व आरोप मुद्देनिहाय फेटाळून लावले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदार यादीत बेकायदेशीरपणे नावे जोडली गेली नाहीत किंवा वगळण्यात आली नाहीत. मतदार याद्यांमध्ये कोणताही घोळ झालेला नाही, असे आयोगाने म्हटले आहे. महाराष्ट्र व हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसने ईव्हीएम आणि मतदार याद्यांवर शंका उपस्थित केली होती. महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढवून दाखविली जात आहे. सायंकाळी पाच वाजता संपलेल्या मतदानाची आकडेवारी आणि अंतिम आकडेवारी यात मोठी तफावत आहे, असे आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. दरम्यान, सायंकाळी पाच वाजेच्या मतदान आकडेवारीची तुलना अंतिम आकडेवारीशी करणे योग्य नाही, असे निवडणूक आयोगाने काँग्रेसला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.

काय म्हटले आयोगाने? 

सायंकाळी ५ ते पावणेबारा या वेळेत मतदानात वाढ होणे एक सामान्य बाब आहे. कारण, यादरम्यान मतदानाच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरू असते. 

वास्तविक, मतदान आणि मतांची मोजणी यात किंचितसा फरक आढळून येऊ शकतो, असेही आयोगाने म्हटले. 

कारण, एकूण मतदानाची माहिती असलेला फॉर्म १७-सी हा प्रत्येक उमेदवाराच्या प्रतिनिधीला दिला जातो. एवढेच नव्हेतर, मतदार यादी तयार करताना सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते.

यामुळे मतदारांची नावे काढण्यात कोणत्याही प्रकारची अनियमितता झाली नाही, असे आयोगाने स्पष्ट केले. ५० मतदारसंघांत याद्यांमध्ये ५० हजार मतदारांची नावे अतिशय हुशारीने जोडण्यात आली. त्यामुळे यापैकी ४७ मतदारसंघांत भाजपचा विजय झाला, असा आरोप काँग्रेसने केला होता. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रVotingमतदान