शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

‘मंत्रिमंडळाचा विस्तार नाहीच, आम्हाला केवळ तारीख पे तारीख’ शिंदे गटातील आमदार संतप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 15:24 IST

Maharashtra Government: एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिंदेगट आणि भाजपाचं सरकार स्थापन होऊन वर्ष उलटलं तरी मंत्रिपदाची आशा बाळगून बसलेल्या शिंदे गटातील अनेक आमदारांचं मंत्रिपदाचं स्वप्न पूर्ण होऊ शकलेलं नाही. त्यामुळे शिंदे गटातील अनेक इच्छुक आमदार अस्वस्थ आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिंदेगट आणि भाजपाचं सरकार स्थापन होऊन वर्ष उलटलं तरी मंत्रिपदाची आशा बाळगून बसलेल्या शिंदे गटातील अनेक आमदारांचं मंत्रिपदाचं स्वप्न पूर्ण होऊ शकलेलं नाही. त्यामुळे शिंदे गटातील अनेक इच्छुक आमदार अस्वस्थ आहेत. त्यातच गेल्या आठवड्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही बड्या नेत्यांचा शपथविधी पार पडला होता. त्यानंतर शिंदे गटातील अस्वस्थता कमालीची वाटली आहे. दरम्यान, शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या एका अपक्ष आमदाराने या अस्वस्थतेला मोकळी वाट करून दिली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सध्या केवळ तारीख पे तारीख हेच सुरू आहे. असं विधान अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांनी केलं आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना आशिष जयस्वाल म्हणाले की, मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल, याबाबत मी कुठलीही भविष्यवाणी करू शकत नाही. सध्या केवळ तारीख पे तारीखच सुरू आहे. त्यामुळे मंत्रिपदाची आस लावून बसलेल्या सर्व आमदारांनी आपल्या मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना आता खूप कमी अवधी उरला आहे. या निवडणुकांआधी आचारसंहिताही लागू होणार आहे. राज्यातील राजकीय घडामोडींबरोबरच केंद्रीय कॅबिनेटमध्येही फेरबदल होण्याची चर्चा आहे. त्यामुळे याबाबत आमचे वरिष्ठच अधिक सांगू शकतात.

आशिष जयस्वाल हे महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध बंड करणाऱ्या पहिल्या काही आमदारांपैकी एक आमदार होते. यावेळी अजित पवार यांच्या सरकारमध्ये झालेल्या समावेशाबाबत बोलताना ते म्हणाले की, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघेही चांगले प्रशासक आहेत. त्यामुळे त्यांनी आमदारांना त्यांची क्षमता आणि कामगिरीच्या आधारावर मंत्रिपद दिलं पाहिजे. तसेच प्रादेशिक संतुलन कायम राहिलं पाहिजे. तसेच इतर समर्थक पक्ष आणि अपक्ष आमदारांनाही कसे सामावून घेता येईल, याचाही विचार केला पाहिजे, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Ashish Jaiswalआशीष जयस्वालEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार