शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

नेत्यांनी परिपक्वता दाखविल्यास आघाडी शक्य - पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 5:43 AM

महाराष्ट्रातील फडणवीस सरकार हे मोदींच्या कृपेमुळे सत्तेत आले नाही. ते कोणाच्या कृपेमुळे आले हे तुम्हाला माहीत आहे, आमचे सरकार पाडले नसते तर राज्यात सत्तांतरच झाले नसते, अशी खंत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. त्यांच्या टीकेचा रोष शरद पवार यांच्याकडे असला तरी त्यांचे थेट नाव न घेता चव्हाणांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. आता पुन्हा सत्तेत यायचे असेल तर देशाचे राजकारण करणाऱ्या नेत्यांनी परिपक्वता दाखविल्यास आघाडी होऊ शकते, असेही ते म्हणाले.

पंढरपूर (जि. सोलापूर) : महाराष्ट्रातील फडणवीस सरकार हे मोदींच्या कृपेमुळे सत्तेत आले नाही. ते कोणाच्या कृपेमुळे आले हे तुम्हाला माहीत आहे, आमचे सरकार पाडले नसते तर राज्यात सत्तांतरच झाले नसते, अशी खंत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. त्यांच्या टीकेचा रोष शरद पवार यांच्याकडे असला तरी त्यांचे थेट नाव न घेता चव्हाणांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. आता पुन्हा सत्तेत यायचे असेल तर देशाचे राजकारण करणाऱ्या नेत्यांनी परिपक्वता दाखविल्यास आघाडी होऊ शकते, असेही ते म्हणाले.पत्रकार परिषदेत चव्हाण म्हणाले, केंद्र आणि राज्यातील कारभारावर लोक प्रचंड नाराज आहेत. काल जाहीर झालेल्या एका सर्वेक्षणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामावर नाराज असलेल्या लोकांची संख्या ही ७५ टक्के इतकी आहे. २०१४ च्या निवडणुकीत ३१ टक्के लोकांनी भाजपाला मतदान केले होते, तर त्यांच्या विरोधात ६९ टक्के लोकांनी मतदान केले होते. या सरकारचा कारभार पाहता नकारात्मक मतदानात वाढ होते आहे.केंद्र शासनाचे आयात निर्यात धोरण चुकल्याने त्याचे दूरगामी परिणाम कृषी अर्थ व्यवस्थेला भोगावे लागत आहेत. देशातील साखरेचे उत्पादन लक्षात न घेता केंद्र शासनाने ९ लाख टन साखर आयात केली. त्यामुळे देशातील साखरेचे दर कोसळले. सरकार चालविण्याचा अनुभव नसल्याने साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकरी या निर्णयामुळे अडचणीत आला. आता ७५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. हे अनुदान तुटपुंजे आहे. या तात्पुरत्या मलमपट्टीने काहीही होणार नाही, यासाठी काही धोरणात्मक निर्णय सरकारला घ्यावा लागेल, असेही चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेस