शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

"राज्याचं मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे..."; ठाकरेंच्या रणनीतीला ब्रेक लावण्याची खेळी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 13:25 IST

राज्यात येत्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सगळे पक्ष आपापली रणनीती आखत आहेत. त्यात महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदावरून चूरस निर्माण झाली आहे. 

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत एकनाथ शिंदे आणि भाजपाला पराभूत करणं ठाकरेंचं मुख्य टार्गेट आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगले यश मिळवले परंतु सर्वाधिक जागा लढवून ठाकरेंना अवघ्या ९ जागा जिंकता आल्या. लोकसभेतील निकालामुळे मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव वाढला आहे. त्यातून विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा अशी आग्रही मागणी केली. मात्र त्या मागणीलाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून धुडकावण्यात आलं. 

येत्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल. पुढचा मुख्यमंत्री हा काँग्रेसचा असेल असं जाहीर विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. त्यामुळे ठाकरेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. हे सरकार काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री असणार आहे. लोकसभेचा निकाल पाहिला तर सर्वात जास्त जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. सर्वात जास्त स्ट्राईक रेट काँग्रेसचा आहे. ६५ टक्के जागांवर लोकसभेत आघाडी आहे, याचा अर्थ विधानसभेच्या २८८ जागांपैकी १८३ जागांहून अधिक आपल्याला मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

तसेच राज्यात महायुतीचा गलथान कारभार सुरू आहे. हे सरकार आपल्याला घालवावं लागेल. हे सरकार जाणार आहे. विदर्भात धुव्वा उडणार आहे. मराठवाड्यात दलित, मुस्लीम आणि मराठा आरक्षणकर्त्यांनी सरकारला घालवलं आहे असंही पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्रिपदावरून महाविकास आघाडीत तिन्ही पक्षांमध्ये चढाओढ सुरू असल्याचं दिसून येते. ज्याचे जास्त आमदार, त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सातत्याने सांगितले जाते. मात्र हा फॉर्म्युला उद्धव ठाकरेंना मान्य नाही. जर हे केले तर पाडापाडी अधिक होते असं उद्धव ठाकरेंचं ठाम मत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा यासाठी ते आग्रही होते. 

काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदासाठी फिल्डिंग

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदासाठी फिल्डिंग लावली जाते. त्यात प्रामुख्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मुख्यमंत्री केले जावे यासाठी विदर्भातील काँग्रेस नेत्यांनी एकसूर लावला. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत कार्यकर्ते उत्साही असतात, त्याप्रकारे मागणी केली जाते. मात्र हायकमांड मुख्यमंत्री ठरवतील असं विधान बाळासाहेब थोरात यांनी केले. बाळासाहेब थोरातांचे भावी मुख्यमंत्रिपदाचे बॅनर्स झळकत आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या निकालापूर्वीच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदावरून अनेकजण इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणChief Ministerमुख्यमंत्रीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४