शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

"राज्याचं मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे..."; ठाकरेंच्या रणनीतीला ब्रेक लावण्याची खेळी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 13:25 IST

राज्यात येत्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सगळे पक्ष आपापली रणनीती आखत आहेत. त्यात महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदावरून चूरस निर्माण झाली आहे. 

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत एकनाथ शिंदे आणि भाजपाला पराभूत करणं ठाकरेंचं मुख्य टार्गेट आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगले यश मिळवले परंतु सर्वाधिक जागा लढवून ठाकरेंना अवघ्या ९ जागा जिंकता आल्या. लोकसभेतील निकालामुळे मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव वाढला आहे. त्यातून विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा अशी आग्रही मागणी केली. मात्र त्या मागणीलाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून धुडकावण्यात आलं. 

येत्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल. पुढचा मुख्यमंत्री हा काँग्रेसचा असेल असं जाहीर विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. त्यामुळे ठाकरेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. हे सरकार काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री असणार आहे. लोकसभेचा निकाल पाहिला तर सर्वात जास्त जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. सर्वात जास्त स्ट्राईक रेट काँग्रेसचा आहे. ६५ टक्के जागांवर लोकसभेत आघाडी आहे, याचा अर्थ विधानसभेच्या २८८ जागांपैकी १८३ जागांहून अधिक आपल्याला मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

तसेच राज्यात महायुतीचा गलथान कारभार सुरू आहे. हे सरकार आपल्याला घालवावं लागेल. हे सरकार जाणार आहे. विदर्भात धुव्वा उडणार आहे. मराठवाड्यात दलित, मुस्लीम आणि मराठा आरक्षणकर्त्यांनी सरकारला घालवलं आहे असंही पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्रिपदावरून महाविकास आघाडीत तिन्ही पक्षांमध्ये चढाओढ सुरू असल्याचं दिसून येते. ज्याचे जास्त आमदार, त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सातत्याने सांगितले जाते. मात्र हा फॉर्म्युला उद्धव ठाकरेंना मान्य नाही. जर हे केले तर पाडापाडी अधिक होते असं उद्धव ठाकरेंचं ठाम मत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा यासाठी ते आग्रही होते. 

काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदासाठी फिल्डिंग

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदासाठी फिल्डिंग लावली जाते. त्यात प्रामुख्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मुख्यमंत्री केले जावे यासाठी विदर्भातील काँग्रेस नेत्यांनी एकसूर लावला. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत कार्यकर्ते उत्साही असतात, त्याप्रकारे मागणी केली जाते. मात्र हायकमांड मुख्यमंत्री ठरवतील असं विधान बाळासाहेब थोरात यांनी केले. बाळासाहेब थोरातांचे भावी मुख्यमंत्रिपदाचे बॅनर्स झळकत आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या निकालापूर्वीच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदावरून अनेकजण इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणChief Ministerमुख्यमंत्रीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४