शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

'मंत्र्याने मध्ये तोंड घालायचं नाही, तुम्ही कोणाकडे मागणी करत आहात?'; अंबादास दानवे सत्ताधाऱ्यांवर बरसले

By भागवत हिरेकर | Updated: March 20, 2025 17:03 IST

Ambadas Danve News: दिशा सालियन प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनातही पडसाद उमटले. 

Disha Salian Ambadas Danve News: "सगळ्या चौकश्या करा. काही अडचण नाहीये त्याच्याबद्दल. राजकीय अंगाने प्रेरित होऊ चार-चार जणांनी बोलायचं. सरकार तुमचं आहे आणि तुम्ही कोणाकडे मागणी करत आहात? मंत्र्याने मध्ये मध्ये तोंड घालायचं नाही", असे म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेविधान परिषदेत सत्ताधारी आमदारांवर बरसले. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा मुद्दा काढत सत्ताधारी आमदारांनी डिवचल्यानंतर दानवेंचा रौद्रवतार बघायला मिळाला.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

अंबादास दानवेविधान परिषदेत बोलत होते. त्यावेळी दिशा सालियनचा मुद्दा सत्ताधारी बाकांवरील आमदारांनी काढला. त्यावर दानवे म्हणाले, "चर्चा करा. राज्याने एसआयटी नेमलेली आहे. चित्राताईंनी मागणी केलीये. सगळ्या चौकश्या करा. काही अडचण नाहीये त्याच्याबद्दल. राजकीय अंगाने प्रेरित होऊ चार-चार जणांनी बोलायचं."

मंत्र्याने मध्ये तोंड घालायचं नाही -दानवे

गिरीश महाजनांनी दानवे बोलत असताना व्यत्यय आणला. त्यावर दानवे म्हणाले, "गिरीशजी, मला बोलू द्या. मी तुमच्याशी बोलत नाहीये. मी सांगून ठेवतोय. मंत्र्याचा हस्तक्षेप, सभापती महोदय थांबवायला सांगा. नेहमी नेहमी मध्ये तोंड घालायची गरज नाही. मंत्र्याने मध्ये मध्ये तोंड घालायचं नाही. ज्याचं असेल, त्याने करायचं", अशा शब्दात अंबादास दानवेंनी व्यक्त केला. 

तुम्ही कोणाकडे मागणी करता आहात?, दानवेंचा सवाल

"माझं बोलणं चालुये. नाहीतर मला थांबवा. मी बाहेर जाऊन बसतो, मंत्र्यालाच बोलू द्या. नेहमी नेहमी मध्ये तोंड घालता. मला बोलू द्या नाहीतर मी बाहेर जाऊन बसतो. नेहमीच आहे यांचं. करा ना तुमचे मुख्यमंत्री आहेत. जाऊन करा... तुम्ही रोज मांडीला मांडी लावून बसता... जा ना त्यांच्याकडे. इथे काय बोलता? सरकार तुमचं आहे आणि तुम्ही कोणाकडे मागणी करत आहात?", असा उलट सवाल अंबादास दानवे दिशा सालियन प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीवर सत्ताधारी आमदारांना केला. 

"वारंवार हे मंत्री प्रत्येकवेळी हस्तक्षेप करतात. त्यांच्याकडे हे खातं आहे का? त्यांना सरकारने जबाबदारी दिलीये का? उगाच प्रत्येक गोष्टीत सामुदायिक जबाबदारी म्हणायचं. आम्ही राज्यपालांकडे जाऊन आलो. आम्ही काही विशिष्ट मंत्र्यांबद्दल बोललो. कारण अशा पद्धतीने मंत्र्यांनी नेहमी नेहमी मध्ये बोलणं चुकीचं आहे", असा संताप अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.  

माझ्या तोंडून काही निघून जाईल -दानवे

"यांनी मध्ये बोलायची गरज नाही. त्यांची भूमिका आम्ही ऐकली ना. आमची भूमिकाही ऐका. ऐकायची तयारीच नाहीये. सगळं तुमचंच खरं आहे आणि आमचं खोटं आहे. तुमची (गिरीश महाजन) परवानगी घेऊन बोलत नाहीये मी. तुम्ही मला सांगायची गरज नाहीये. माझ्या तोंडून काही शब्द निघून जाईल. यांनी मध्ये काही बोलायचं नाही", असा इशारा दानवेंनी दिला. 

त्यानंतर गोंधळ झाल्याने सभापतींनी विधान परिषदेचं कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात आले. 

टॅग्स :Disha Salian Caseदिशा सालियान मृत्यू प्रकरणGirish Mahajanगिरीश महाजनMahayutiमहायुतीVidhan Parishadविधान परिषदAmbadas Danweyअंबादास दानवे