शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

'मंत्र्याने मध्ये तोंड घालायचं नाही, तुम्ही कोणाकडे मागणी करत आहात?'; अंबादास दानवे सत्ताधाऱ्यांवर बरसले

By भागवत हिरेकर | Updated: March 20, 2025 17:03 IST

Ambadas Danve News: दिशा सालियन प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनातही पडसाद उमटले. 

Disha Salian Ambadas Danve News: "सगळ्या चौकश्या करा. काही अडचण नाहीये त्याच्याबद्दल. राजकीय अंगाने प्रेरित होऊ चार-चार जणांनी बोलायचं. सरकार तुमचं आहे आणि तुम्ही कोणाकडे मागणी करत आहात? मंत्र्याने मध्ये मध्ये तोंड घालायचं नाही", असे म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेविधान परिषदेत सत्ताधारी आमदारांवर बरसले. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा मुद्दा काढत सत्ताधारी आमदारांनी डिवचल्यानंतर दानवेंचा रौद्रवतार बघायला मिळाला.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

अंबादास दानवेविधान परिषदेत बोलत होते. त्यावेळी दिशा सालियनचा मुद्दा सत्ताधारी बाकांवरील आमदारांनी काढला. त्यावर दानवे म्हणाले, "चर्चा करा. राज्याने एसआयटी नेमलेली आहे. चित्राताईंनी मागणी केलीये. सगळ्या चौकश्या करा. काही अडचण नाहीये त्याच्याबद्दल. राजकीय अंगाने प्रेरित होऊ चार-चार जणांनी बोलायचं."

मंत्र्याने मध्ये तोंड घालायचं नाही -दानवे

गिरीश महाजनांनी दानवे बोलत असताना व्यत्यय आणला. त्यावर दानवे म्हणाले, "गिरीशजी, मला बोलू द्या. मी तुमच्याशी बोलत नाहीये. मी सांगून ठेवतोय. मंत्र्याचा हस्तक्षेप, सभापती महोदय थांबवायला सांगा. नेहमी नेहमी मध्ये तोंड घालायची गरज नाही. मंत्र्याने मध्ये मध्ये तोंड घालायचं नाही. ज्याचं असेल, त्याने करायचं", अशा शब्दात अंबादास दानवेंनी व्यक्त केला. 

तुम्ही कोणाकडे मागणी करता आहात?, दानवेंचा सवाल

"माझं बोलणं चालुये. नाहीतर मला थांबवा. मी बाहेर जाऊन बसतो, मंत्र्यालाच बोलू द्या. नेहमी नेहमी मध्ये तोंड घालता. मला बोलू द्या नाहीतर मी बाहेर जाऊन बसतो. नेहमीच आहे यांचं. करा ना तुमचे मुख्यमंत्री आहेत. जाऊन करा... तुम्ही रोज मांडीला मांडी लावून बसता... जा ना त्यांच्याकडे. इथे काय बोलता? सरकार तुमचं आहे आणि तुम्ही कोणाकडे मागणी करत आहात?", असा उलट सवाल अंबादास दानवे दिशा सालियन प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीवर सत्ताधारी आमदारांना केला. 

"वारंवार हे मंत्री प्रत्येकवेळी हस्तक्षेप करतात. त्यांच्याकडे हे खातं आहे का? त्यांना सरकारने जबाबदारी दिलीये का? उगाच प्रत्येक गोष्टीत सामुदायिक जबाबदारी म्हणायचं. आम्ही राज्यपालांकडे जाऊन आलो. आम्ही काही विशिष्ट मंत्र्यांबद्दल बोललो. कारण अशा पद्धतीने मंत्र्यांनी नेहमी नेहमी मध्ये बोलणं चुकीचं आहे", असा संताप अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.  

माझ्या तोंडून काही निघून जाईल -दानवे

"यांनी मध्ये बोलायची गरज नाही. त्यांची भूमिका आम्ही ऐकली ना. आमची भूमिकाही ऐका. ऐकायची तयारीच नाहीये. सगळं तुमचंच खरं आहे आणि आमचं खोटं आहे. तुमची (गिरीश महाजन) परवानगी घेऊन बोलत नाहीये मी. तुम्ही मला सांगायची गरज नाहीये. माझ्या तोंडून काही शब्द निघून जाईल. यांनी मध्ये काही बोलायचं नाही", असा इशारा दानवेंनी दिला. 

त्यानंतर गोंधळ झाल्याने सभापतींनी विधान परिषदेचं कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात आले. 

टॅग्स :Disha Salian Caseदिशा सालियान मृत्यू प्रकरणGirish Mahajanगिरीश महाजनMahayutiमहायुतीVidhan Parishadविधान परिषदAmbadas Danweyअंबादास दानवे