शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

'मंत्र्याने मध्ये तोंड घालायचं नाही, तुम्ही कोणाकडे मागणी करत आहात?'; अंबादास दानवे सत्ताधाऱ्यांवर बरसले

By भागवत हिरेकर | Updated: March 20, 2025 17:03 IST

Ambadas Danve News: दिशा सालियन प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनातही पडसाद उमटले. 

Disha Salian Ambadas Danve News: "सगळ्या चौकश्या करा. काही अडचण नाहीये त्याच्याबद्दल. राजकीय अंगाने प्रेरित होऊ चार-चार जणांनी बोलायचं. सरकार तुमचं आहे आणि तुम्ही कोणाकडे मागणी करत आहात? मंत्र्याने मध्ये मध्ये तोंड घालायचं नाही", असे म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेविधान परिषदेत सत्ताधारी आमदारांवर बरसले. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा मुद्दा काढत सत्ताधारी आमदारांनी डिवचल्यानंतर दानवेंचा रौद्रवतार बघायला मिळाला.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

अंबादास दानवेविधान परिषदेत बोलत होते. त्यावेळी दिशा सालियनचा मुद्दा सत्ताधारी बाकांवरील आमदारांनी काढला. त्यावर दानवे म्हणाले, "चर्चा करा. राज्याने एसआयटी नेमलेली आहे. चित्राताईंनी मागणी केलीये. सगळ्या चौकश्या करा. काही अडचण नाहीये त्याच्याबद्दल. राजकीय अंगाने प्रेरित होऊ चार-चार जणांनी बोलायचं."

मंत्र्याने मध्ये तोंड घालायचं नाही -दानवे

गिरीश महाजनांनी दानवे बोलत असताना व्यत्यय आणला. त्यावर दानवे म्हणाले, "गिरीशजी, मला बोलू द्या. मी तुमच्याशी बोलत नाहीये. मी सांगून ठेवतोय. मंत्र्याचा हस्तक्षेप, सभापती महोदय थांबवायला सांगा. नेहमी नेहमी मध्ये तोंड घालायची गरज नाही. मंत्र्याने मध्ये मध्ये तोंड घालायचं नाही. ज्याचं असेल, त्याने करायचं", अशा शब्दात अंबादास दानवेंनी व्यक्त केला. 

तुम्ही कोणाकडे मागणी करता आहात?, दानवेंचा सवाल

"माझं बोलणं चालुये. नाहीतर मला थांबवा. मी बाहेर जाऊन बसतो, मंत्र्यालाच बोलू द्या. नेहमी नेहमी मध्ये तोंड घालता. मला बोलू द्या नाहीतर मी बाहेर जाऊन बसतो. नेहमीच आहे यांचं. करा ना तुमचे मुख्यमंत्री आहेत. जाऊन करा... तुम्ही रोज मांडीला मांडी लावून बसता... जा ना त्यांच्याकडे. इथे काय बोलता? सरकार तुमचं आहे आणि तुम्ही कोणाकडे मागणी करत आहात?", असा उलट सवाल अंबादास दानवे दिशा सालियन प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीवर सत्ताधारी आमदारांना केला. 

"वारंवार हे मंत्री प्रत्येकवेळी हस्तक्षेप करतात. त्यांच्याकडे हे खातं आहे का? त्यांना सरकारने जबाबदारी दिलीये का? उगाच प्रत्येक गोष्टीत सामुदायिक जबाबदारी म्हणायचं. आम्ही राज्यपालांकडे जाऊन आलो. आम्ही काही विशिष्ट मंत्र्यांबद्दल बोललो. कारण अशा पद्धतीने मंत्र्यांनी नेहमी नेहमी मध्ये बोलणं चुकीचं आहे", असा संताप अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.  

माझ्या तोंडून काही निघून जाईल -दानवे

"यांनी मध्ये बोलायची गरज नाही. त्यांची भूमिका आम्ही ऐकली ना. आमची भूमिकाही ऐका. ऐकायची तयारीच नाहीये. सगळं तुमचंच खरं आहे आणि आमचं खोटं आहे. तुमची (गिरीश महाजन) परवानगी घेऊन बोलत नाहीये मी. तुम्ही मला सांगायची गरज नाहीये. माझ्या तोंडून काही शब्द निघून जाईल. यांनी मध्ये काही बोलायचं नाही", असा इशारा दानवेंनी दिला. 

त्यानंतर गोंधळ झाल्याने सभापतींनी विधान परिषदेचं कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात आले. 

टॅग्स :Disha Salian Caseदिशा सालियान मृत्यू प्रकरणGirish Mahajanगिरीश महाजनMahayutiमहायुतीVidhan Parishadविधान परिषदAmbadas Danweyअंबादास दानवे