शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

“...तर निवडणुकीत भाजपला ३३ कोटी देव अन् श्रीरामही वाचवू शकणार नाही”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 11:36 IST

Sanjay Raut News: काँग्रेसचा बेस आहे, हे मान्य करावे लागेल. २०२४ च्या भूकंपात भाजपा वाहून जाणार, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut News: २०२४ ला देशात आणि राज्यात परिवर्तन होईल. मात्र, ईव्हीएम विषयी लोकांमध्ये संशय आहे. पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या लोकांवर हल्ला झाला, लोक संतापले आहे, हेच उद्या ईव्हीएम बाबतही होऊ शकते. ज्या मतदान प्रक्रियेवर जनतेचा विश्वास नाही मग ही असली कसली लोकशाही. आपण विष्णूचे १३ वे अवतार आहेत मग बेलेट पेपर निवडणुकांना का घाबरता? कारण अशा निवडणूक झाल्या तर आपल्याला ३३ कोटी देव आणि प्रभू श्रीराम ही वाचवू शकणार नाहीत. भाजप ग्रामपंचायत ही जिंकू शकणार नाही, या शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ईव्हीएमवरून भाजप आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ईव्हीएम माध्यमातून हुकूमशाही सुरु आहे. इतका महान शक्तिमान नेता का घाबरतो, जगात कुठेही ईव्हीएम निवडणूक आता होत नाही. देशात १९ लाख ईव्हीएम मशीन चोरी झाल्या आहेत, त्या कुठे आहेत यातून संशय बळावतो. मध्य प्रदेश निवडणुकात पोस्टल बेलेटमध्ये काँग्रेस आघाडी वर होते, ईव्हीएम सुरू झाले आणि काँग्रेस मागे पडले, असा मोठा दावा संजय राऊतांनी केला आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री दीड वर्षांपासून मोदींच्या प्रेमात आहेत. आम्ही २५ वर्ष भाजपच्या प्रेमात होतो. आमचा प्रेमभंग झाला आहे, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली. 

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लोकसभा मतदारसंघ निहाय झाडाझडती

मराठवाड्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लोकसभा मतदारसंघ निहाय झाडाझडती घेतली. कोण कुठे लढेल यावर एकमत झाले आहे. २०१९ ला संभाजीनगर लोकसभा जो अपघात झाला त्याची दुरुस्ती करायची आहे. एनसीपीसोबत जागा वाटप निश्चित झाले आहे, वंचितसोबतची बोलणी अंतिम टप्प्यात आहे. यावेळी कुणीही भाजपला मागच्या दाराने मदत करणार नाही, पोटात एक ओठात एक असे कुणीही करणार नाही, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला. तसेच महाविकास आघाडीने शिवसेनेला प्रकाश आंबेडकर सोबत चर्चा करण्याची मुभा दिली आहे. जागावाटप फॉर्म्युला तिन्ही पक्षांचे प्रमुख जाहीर करतील. वंचित महाविकास आघाडीचा घटक आहे, जागा संदर्भात लहान सहन गोष्टी आहेत. या वातावरणात प्रकाश आंबेडकर नवीन आहेत मात्र देशाचे नेते आहेत, आमच्या या आघाडीत ते नवे आहेत. काँग्रेस आमच्या आघाडीतील मोठा पक्ष आहे, असे संजय राऊतांनी सांगितले. 

पंतप्रधानांना रोड शो करण्यापलीकडे काम नाही

पंतप्रधानांना रोड शो करण्यापलीकडे काम नाही, नाशिकला येतायत आनंद आहे, मात्र मणिपूर ला का जात नाही? काश्मीरमध्ये पंडितांच्या छावण्या मध्ये जात नाहीत. महायुतीकडे आम्ही लक्ष देत नाही त्या मेलेल्या कोंबड्या आहेत. आमदार मारहाण लोकांनी पहिली आहे, गृहमंत्र्यांनी पाहिले आहे कारवाई कोण करणार, अशी विचारणा संजय राऊतांनी केली. तसेच हा महाराष्ट्र आहे जपान नाही भूकंप व्हायला. २०२४ च्या भूकंपात तुम्ही वाहून जाणार. ईडी चा वापर करून भूकंप करणे याला भूकंप म्हणत नाही, डरपोकपणा म्हणतात, या शब्दांत संजय राऊतांनी गिरीश महाजनांवर हल्लाबोल केला. 

दरम्यान, काँग्रेससोबत बोलणी योग्य मार्गाने सुरु आहे. ४ दिवसात आम्ही दिल्लीत जाऊन काँग्रेससोबत अंतिम चर्चा करणार आहोत. मसुदा ठरवू, मात्र जागा वाटपात कुठलीही अडचण नाही. काँग्रेसकडून जागावाटपाबाबत काही जाहीर वक्तव्य आले नाही. कुणी वरिष्ठ बोलले नाहीत. जो जिंकेल त्याची जागा असे आम्ही ठरवले आहे. आकडे वाढवायला कुणालाही जागा मिळणार नाही. काँग्रेसने कुठल्याही जास्त जागा मागितल्या नाहीत. राज्यात काँग्रेसचा बेस आहे हे मान्य करावे लागेल. देशात ३०० ठिकाणी काँग्रेस भाजप थेट लढत आहे त्या जागा २०२४ भविष्य ठरवेल, असे संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEVM Machineएव्हीएम मशीनBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी