शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

“...तर निवडणुकीत भाजपला ३३ कोटी देव अन् श्रीरामही वाचवू शकणार नाही”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 11:36 IST

Sanjay Raut News: काँग्रेसचा बेस आहे, हे मान्य करावे लागेल. २०२४ च्या भूकंपात भाजपा वाहून जाणार, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut News: २०२४ ला देशात आणि राज्यात परिवर्तन होईल. मात्र, ईव्हीएम विषयी लोकांमध्ये संशय आहे. पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या लोकांवर हल्ला झाला, लोक संतापले आहे, हेच उद्या ईव्हीएम बाबतही होऊ शकते. ज्या मतदान प्रक्रियेवर जनतेचा विश्वास नाही मग ही असली कसली लोकशाही. आपण विष्णूचे १३ वे अवतार आहेत मग बेलेट पेपर निवडणुकांना का घाबरता? कारण अशा निवडणूक झाल्या तर आपल्याला ३३ कोटी देव आणि प्रभू श्रीराम ही वाचवू शकणार नाहीत. भाजप ग्रामपंचायत ही जिंकू शकणार नाही, या शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ईव्हीएमवरून भाजप आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ईव्हीएम माध्यमातून हुकूमशाही सुरु आहे. इतका महान शक्तिमान नेता का घाबरतो, जगात कुठेही ईव्हीएम निवडणूक आता होत नाही. देशात १९ लाख ईव्हीएम मशीन चोरी झाल्या आहेत, त्या कुठे आहेत यातून संशय बळावतो. मध्य प्रदेश निवडणुकात पोस्टल बेलेटमध्ये काँग्रेस आघाडी वर होते, ईव्हीएम सुरू झाले आणि काँग्रेस मागे पडले, असा मोठा दावा संजय राऊतांनी केला आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री दीड वर्षांपासून मोदींच्या प्रेमात आहेत. आम्ही २५ वर्ष भाजपच्या प्रेमात होतो. आमचा प्रेमभंग झाला आहे, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली. 

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लोकसभा मतदारसंघ निहाय झाडाझडती

मराठवाड्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लोकसभा मतदारसंघ निहाय झाडाझडती घेतली. कोण कुठे लढेल यावर एकमत झाले आहे. २०१९ ला संभाजीनगर लोकसभा जो अपघात झाला त्याची दुरुस्ती करायची आहे. एनसीपीसोबत जागा वाटप निश्चित झाले आहे, वंचितसोबतची बोलणी अंतिम टप्प्यात आहे. यावेळी कुणीही भाजपला मागच्या दाराने मदत करणार नाही, पोटात एक ओठात एक असे कुणीही करणार नाही, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला. तसेच महाविकास आघाडीने शिवसेनेला प्रकाश आंबेडकर सोबत चर्चा करण्याची मुभा दिली आहे. जागावाटप फॉर्म्युला तिन्ही पक्षांचे प्रमुख जाहीर करतील. वंचित महाविकास आघाडीचा घटक आहे, जागा संदर्भात लहान सहन गोष्टी आहेत. या वातावरणात प्रकाश आंबेडकर नवीन आहेत मात्र देशाचे नेते आहेत, आमच्या या आघाडीत ते नवे आहेत. काँग्रेस आमच्या आघाडीतील मोठा पक्ष आहे, असे संजय राऊतांनी सांगितले. 

पंतप्रधानांना रोड शो करण्यापलीकडे काम नाही

पंतप्रधानांना रोड शो करण्यापलीकडे काम नाही, नाशिकला येतायत आनंद आहे, मात्र मणिपूर ला का जात नाही? काश्मीरमध्ये पंडितांच्या छावण्या मध्ये जात नाहीत. महायुतीकडे आम्ही लक्ष देत नाही त्या मेलेल्या कोंबड्या आहेत. आमदार मारहाण लोकांनी पहिली आहे, गृहमंत्र्यांनी पाहिले आहे कारवाई कोण करणार, अशी विचारणा संजय राऊतांनी केली. तसेच हा महाराष्ट्र आहे जपान नाही भूकंप व्हायला. २०२४ च्या भूकंपात तुम्ही वाहून जाणार. ईडी चा वापर करून भूकंप करणे याला भूकंप म्हणत नाही, डरपोकपणा म्हणतात, या शब्दांत संजय राऊतांनी गिरीश महाजनांवर हल्लाबोल केला. 

दरम्यान, काँग्रेससोबत बोलणी योग्य मार्गाने सुरु आहे. ४ दिवसात आम्ही दिल्लीत जाऊन काँग्रेससोबत अंतिम चर्चा करणार आहोत. मसुदा ठरवू, मात्र जागा वाटपात कुठलीही अडचण नाही. काँग्रेसकडून जागावाटपाबाबत काही जाहीर वक्तव्य आले नाही. कुणी वरिष्ठ बोलले नाहीत. जो जिंकेल त्याची जागा असे आम्ही ठरवले आहे. आकडे वाढवायला कुणालाही जागा मिळणार नाही. काँग्रेसने कुठल्याही जास्त जागा मागितल्या नाहीत. राज्यात काँग्रेसचा बेस आहे हे मान्य करावे लागेल. देशात ३०० ठिकाणी काँग्रेस भाजप थेट लढत आहे त्या जागा २०२४ भविष्य ठरवेल, असे संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEVM Machineएव्हीएम मशीनBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी