शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
3
“राजन पाटलांच्या वाया गेलेल्या कार्ट्यांना सत्तेचा माज…”, बाळराजे पाटलांना अजितदादांच्या आमदाराने सुनावले
4
सावधान! फक्त एक फोन कॉल अन् गमावले तब्बल ३२ कोटी; महिलेसोबत नेमकं काय घडलं?
5
लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक; पाहा नवी किंमत
6
"मॅचच्या ४ दिवस आधी BCCIचे क्यूरेटर आले अन्.."; कोलकाता पिच वादावर सौरव गांगुलीचा खुलासा
7
Eye Infections: मुंबईत वाढताहेत संसर्गाचे रुग्ण; डोळ्यांत डोळे घालाल तर पस्तावाल, 'अशी' घ्या काळजी!
8
१,२,३,४... बाप रे बाप...! एका ऑटोरिक्‍शातून बाहेर पडली तब्बल 22 मुलं! व्हिडिओ बघून धक्का बसेल
9
९४% रिटर्न दिल्यावर 'ग्रोव'ला १०% लोअर सर्किट! गुंतवणूकदारांनी शेअर विकायला का लावली रांग?
10
प्रशासकीय दिरंगाईमुळे बोनस रखडला; संतप्त कामगारांचे नायर रुग्णालयासमोर 'बोंबाबोंब' आंदोलन
11
"अजित पवार नाद करायचा नाही"; मुलाच्या इशाऱ्यानंतर राजन पाटील म्हणाले, "त्याला पार्थ सारखं..."
12
Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
“आता ‘प्रो बैलगाडा लीग’ लवकरच, महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा...”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
14
सरकारच्या 'या' स्कीममध्ये मिळवा विना गॅरेंटी व्यवसाय सुरू करण्यासाठी लोन; केवळ एका डॉक्युमेंटची लागेल गरज
15
मुलांच्या भवितव्याशी खेळ! Noge, Eare, Iey... चुकीचं इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकाचा Video व्हायरल
16
आरक्षण मर्यादेचं उल्लंघन, राज्यातील निवडणुकांचं काय होणार? आता २५ नोव्हेंबरला पुढील सुनावणी, सुप्रिम कोर्टात आज काय घडलं
17
दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता बॉयफ्रेंड, अचानक भर लग्नात धडकली गर्लफ्रेंड; मंडपात तमाशा सुरू होताच...
18
निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा
19
SIP सुरू करण्यापूर्वी वाचा! इंडेक्स फंडात 'कमी खर्च' तर Active फंडात 'जास्त रिटर्न'ची संधी; कोणता निवडावा?
20
“काँग्रेस-वंचित पक्षाची आघाडी व्हावी ही स्थानिक कार्यकर्त्यांची भावना”; नेते म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 12:54 IST

Amravati : वनविभागाकडे केवळ ९ हजार वनरक्षक; जलदकृती २४ वनाधिकारी आणि २२० वनरक्षकांची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: जंगलच नव्हे, तर मानवी वस्तीत येणाऱ्या वाघ, बिबट्यांपासून मानवाचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाकडे केवळ ९,७८५ वनरक्षक अत्यंत कमी असून, महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत निर्माण झाली आहे. जलदकृती २४ वनाधिकारी आणि २२० वनरक्षकांची गरज आहे. १४ वनविभागामध्ये प्रादेशिकचे ४८ विभान ३७८ परिक्षेत्र आणि ५६१३ बीट असून, वन्यजीव विभागांचे १३ विभान व १०३ परिक्षेत्र ज्यामध्ये केवळ ९७० बीट मोडतात. याशिवाय सामाजिक वनीकरणाचे उपविभाग असून, यामध्ये २५० परिक्षेत्र आणि ९९० व उर्वरित वनरक्षक साईट पोस्टिंग म्हणून कामे करतात. पोलिस विभागामध्ये लोकसंख्येच्या आधारावर पोलिस स्टेशनची निर्मिती केली जाते. तर वनविभागामध्ये जंगलाच्या क्षेत्रफळानुसार परिक्षेत्र व बीटची निर्मिती केली जाते. सध्या महाराष्ट्रात वन्यजीव विभागाचे ६ क्षेत्र संचालक कार्यरत आहेत. याशिवाय नाशिक, पुणे, ठाणे, मुंबई (कांदळवन), छत्रपती संभाजीनगर येथे वनसंरक्षक अशी पदे निर्माण करण्यात आली आहेत. मात्र, वनपरिक्षेत्र अधिकारी आणि वनरक्षकांची पदे निर्माण करण्यात आलेली नाही. ९,७८५ वनरक्षकांमध्येच वन्यजीव विभागाचा कारभार हाकला जातो. 

पदांची कमतरता

सध्या राज्यामध्ये वाघ आणि बिबट्यांच्या दहशतीमुळे सर्वसामान्य नागरिक भयभीत झालेले आहेत, अशावेळी वन्यजीव विभाग बळकट करणे गरजेचे असताना केवळ ९,७८५ वनरक्षकांच्या भरोशावर वन्यजीव विभागाचा गाडा हाकला जात आहे. आयएफएस लॉबी ही केवळ सोईसाठी पदांची निर्मिती करीत असल्याचे चित्र आहे. वनविभागामध्ये क्षेत्रीय पदांची निर्मिती करणे आवश्यक आहे. जलद कृती दलासाठी नव्याने वनपरिक्षेत्र अधिकारी या पदापासून तर वनरक्षकांची पदे निर्माण करणे आवश्यक आहेत.

राज्यात केवळ ९,७८५ वनरक्षक

विदर्भानंतर पश्चिम महाराष्ट्र, कोकण, ठाणे, मुंबई, नाशिक या भागामध्ये वनक्षेत्र अधिक प्रमाणात असताना आणि पुणे, कोल्हापूर, नाशिक, जुन्नर, आंबेगाव, अहिल्यानगर, पालघर, बोरीवली, गोरेगाव, निफाड या भागांमध्ये बिबट्यांची संख्या कमालीची वाढलेली दिसून येत आहे. गेल्या २० वर्षांमध्ये वनविभागामध्ये राज्यात केवळ १२०० वनरक्षकांची नवीन पदे भरण्यात आली आहेत. सध्या राज्यात वाघ व बिबट्यांची दहशत बघता किमान १५ हजार वनरक्षकांची पदे भरणे आवश्यक आहे.

कसे पकडणार एवढे बिबटे ?

वनमंत्री गणेश नाईक यांनी पुणे, कोल्हापूर, अहिल्या नगर, नाशिकमध्ये धुमाकूळ घालणारे बिबटे पकडण्याची घोषणा केली. मात्र, वनविभागाकडे असलेले अपुरे साधने आणि मनुष्यबळाचा अभावामुळे या भागातील २ हजार बिबटे वेळेच्या आत पकडणे शक्य होणार नाही. शेड्युल १ मध्ये असलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव विभागाला केंद्रांकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. सध्या राज्याच्या २५ जिल्ह्यांमध्ये बिबट्यांची संख्या वाढलेली असून, विदर्भातील ९, पश्चिम महाराष्ट्रातील ६, मराठवाडा २, कोकण ३ आणि उर्वरित महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांचा समावेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard, Tiger Terror Grips 25 Districts: Reasons for Free Movement?

Web Summary : Maharashtra faces a wildlife crisis as tiger and leopard presence terrorizes 25 districts. A shortage of forest guards (only 9,785) hinders effective wildlife management. Increased leopard sightings in populated areas exacerbate the problem, requiring urgent action and more personnel.
टॅग्स :leopardबिबट्याTigerवाघforest departmentवनविभागforestजंगलAmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्रVidarbhaविदर्भnagpurनागपूर