शहरं
Join us  
Trending Stories
1
MIMच्या पदयात्रेत मोठा राडा; जलील यांच्यासमोरच कार्यकर्त्यांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी!
2
अंबरनाथमध्ये भाजपशी युती करणाऱ्या काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना दणका; पक्षाने केलं निलंबित
3
Vaibhav Suryavanshi Century : वैभव सूर्यवंशीची विश्वविक्रमी सेंच्युरी! असा पराक्रम करणारा पहिला कॅप्टन
4
Video: अमेरिकेकडून रशियन तेलवाहू टँकरचा पाठलाग; मॉस्कोने सुरक्षेसाठी पाठवली नेव्ही, आता पुढे...
5
आकाराने गोव्यापेक्षाही लहान, नांदतात सगळेच श्रीमंत! 'हा' छोटासा देश कसा बनला कुबेराचा खजिना?
6
कुटुंब रंगलंय निवडणूक प्रचारात; शिंदेसेनेच्या उमेदवारांची घरच्यांसाठीच तिकीट घेण्यात आघाडी
7
मुस्तफिजुर रहमानचा बांगलादेशने बदला घेतला; भारतीय अँकरला बीपीएलमधून बाहेर काढले
8
Riitual: सावधान! हातातील पूजेचा धागा 'इतक्या' दिवसांनंतर बनतो नकारात्मक ऊर्जेचं कारण!
9
आरक्षण मिळाल्यानंतर पुन्हा जनरल कॅटेगरीवर दावा करता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
10
एक्स गर्लफ्रेंडशी पुन्हा संबंध जोडण्यासाठी रचला कट; अपघात घडवून आणल्याचा धक्कादायक खुलासा
11
वैभव सूर्यवंशीचा धमाक्यावर धमाका! षटकार-चौकारांची 'बरसात' करत ठोकली सलग दुसरी फिफ्टी
12
Dhule: शिंदेसेनेच्या उमेदवार गीता नवले यांची फेसबुकवरून बदनामी, नेमका प्रकार काय?
13
Nashik Municipal Election 2026 : शिंदेसेना वरचढ ठरणार की भाजप गड राखणार? अटीतटींच्या लढतींनी वेधले मतदारांचे लक्ष
14
भयंकर! सुंदर दिसण्याची ओढ बेतली जीवावर; कॉस्मेटिक सर्जरीनंतर प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा मृत्यू
15
"त्यांच्या कोत्या वृत्तीला राज ठाकरेंनी साथ दिली"; उद्धव ठाकरेंनी मनात राग धरून डावलल्याचा संतोष धुरींचा आरोप
16
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगापूर्वी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड न्यूज; DA-DR मध्ये होणार बंपर वाढ?
17
Nashik Municipal Election 2026 : भाजपचे आमदारच नाराज, तेथे कार्यकर्त्यांचे काय? अरविंद सावंत यांची टीका
18
अवघी ६ लाख लोकसंख्या असलेला 'हा' देश भारतासाठी अति महत्त्वाचा का आहे? कारण काय?
19
"सत्ता हेच सर्वस्व नाही, हे लोक स्वार्थासाठी..."; भाजप-काँग्रेस आघाडीवर श्रीकांत शिंदे बरसले
20
ऑस्ट्रेलियानं रचला इतिहास! १३४ वर्षांचा विक्रम मोडला; टीम इंडियाच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 12:54 IST

Amravati : वनविभागाकडे केवळ ९ हजार वनरक्षक; जलदकृती २४ वनाधिकारी आणि २२० वनरक्षकांची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: जंगलच नव्हे, तर मानवी वस्तीत येणाऱ्या वाघ, बिबट्यांपासून मानवाचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाकडे केवळ ९,७८५ वनरक्षक अत्यंत कमी असून, महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत निर्माण झाली आहे. जलदकृती २४ वनाधिकारी आणि २२० वनरक्षकांची गरज आहे. १४ वनविभागामध्ये प्रादेशिकचे ४८ विभान ३७८ परिक्षेत्र आणि ५६१३ बीट असून, वन्यजीव विभागांचे १३ विभान व १०३ परिक्षेत्र ज्यामध्ये केवळ ९७० बीट मोडतात. याशिवाय सामाजिक वनीकरणाचे उपविभाग असून, यामध्ये २५० परिक्षेत्र आणि ९९० व उर्वरित वनरक्षक साईट पोस्टिंग म्हणून कामे करतात. पोलिस विभागामध्ये लोकसंख्येच्या आधारावर पोलिस स्टेशनची निर्मिती केली जाते. तर वनविभागामध्ये जंगलाच्या क्षेत्रफळानुसार परिक्षेत्र व बीटची निर्मिती केली जाते. सध्या महाराष्ट्रात वन्यजीव विभागाचे ६ क्षेत्र संचालक कार्यरत आहेत. याशिवाय नाशिक, पुणे, ठाणे, मुंबई (कांदळवन), छत्रपती संभाजीनगर येथे वनसंरक्षक अशी पदे निर्माण करण्यात आली आहेत. मात्र, वनपरिक्षेत्र अधिकारी आणि वनरक्षकांची पदे निर्माण करण्यात आलेली नाही. ९,७८५ वनरक्षकांमध्येच वन्यजीव विभागाचा कारभार हाकला जातो. 

पदांची कमतरता

सध्या राज्यामध्ये वाघ आणि बिबट्यांच्या दहशतीमुळे सर्वसामान्य नागरिक भयभीत झालेले आहेत, अशावेळी वन्यजीव विभाग बळकट करणे गरजेचे असताना केवळ ९,७८५ वनरक्षकांच्या भरोशावर वन्यजीव विभागाचा गाडा हाकला जात आहे. आयएफएस लॉबी ही केवळ सोईसाठी पदांची निर्मिती करीत असल्याचे चित्र आहे. वनविभागामध्ये क्षेत्रीय पदांची निर्मिती करणे आवश्यक आहे. जलद कृती दलासाठी नव्याने वनपरिक्षेत्र अधिकारी या पदापासून तर वनरक्षकांची पदे निर्माण करणे आवश्यक आहेत.

राज्यात केवळ ९,७८५ वनरक्षक

विदर्भानंतर पश्चिम महाराष्ट्र, कोकण, ठाणे, मुंबई, नाशिक या भागामध्ये वनक्षेत्र अधिक प्रमाणात असताना आणि पुणे, कोल्हापूर, नाशिक, जुन्नर, आंबेगाव, अहिल्यानगर, पालघर, बोरीवली, गोरेगाव, निफाड या भागांमध्ये बिबट्यांची संख्या कमालीची वाढलेली दिसून येत आहे. गेल्या २० वर्षांमध्ये वनविभागामध्ये राज्यात केवळ १२०० वनरक्षकांची नवीन पदे भरण्यात आली आहेत. सध्या राज्यात वाघ व बिबट्यांची दहशत बघता किमान १५ हजार वनरक्षकांची पदे भरणे आवश्यक आहे.

कसे पकडणार एवढे बिबटे ?

वनमंत्री गणेश नाईक यांनी पुणे, कोल्हापूर, अहिल्या नगर, नाशिकमध्ये धुमाकूळ घालणारे बिबटे पकडण्याची घोषणा केली. मात्र, वनविभागाकडे असलेले अपुरे साधने आणि मनुष्यबळाचा अभावामुळे या भागातील २ हजार बिबटे वेळेच्या आत पकडणे शक्य होणार नाही. शेड्युल १ मध्ये असलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव विभागाला केंद्रांकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. सध्या राज्याच्या २५ जिल्ह्यांमध्ये बिबट्यांची संख्या वाढलेली असून, विदर्भातील ९, पश्चिम महाराष्ट्रातील ६, मराठवाडा २, कोकण ३ आणि उर्वरित महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांचा समावेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard, Tiger Terror Grips 25 Districts: Reasons for Free Movement?

Web Summary : Maharashtra faces a wildlife crisis as tiger and leopard presence terrorizes 25 districts. A shortage of forest guards (only 9,785) hinders effective wildlife management. Increased leopard sightings in populated areas exacerbate the problem, requiring urgent action and more personnel.
टॅग्स :leopardबिबट्याTigerवाघforest departmentवनविभागforestजंगलAmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्रVidarbhaविदर्भnagpurनागपूर