शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

जनगणना कार्यक्रम करणे शिक्षकांना बंधनकारकच!

By admin | Updated: October 15, 2015 02:03 IST

शिक्षण उपसचिवांनी काढले परिपत्रक; राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावतीकरण जनगणनेचाच एक भाग.

प्रवीण खेते/अकोला : शिक्षकांना देण्यात येणारे राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावतीकरणाचे काम हा जनगणना कार्यक्रमाचाच एक भाग आहे. आरटीई अँक्ट २00९ अन्वये शिक्षकांना जनगणना कार्यक्रम करावयाचा असल्याने, हे काम शिक्षकांना करणे बंधनकारक असल्याचे शिक्षण उपसचिवांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अशैक्षणिक कार्य म्हणून शिक्षकांचा होणारा विरोध बेकायदेशीर असल्याचा इशाराही त्यांनी दिला. बालकांचा मोफत आणि सक्तीचे शिक्षण हक्क कायदा (आरटीई) २00९ नुसार शिक्षकांना जनगणना, आपत्तिग्रस्तांना मदत, स्थानिक, विधानसभा, तसेच लोकसभेच्या निवडणूक कामांव्यतिरिक्त इतर अशैक्षणिक कामे न सोपविण्याची तरतूद करण्यात आली आहे. यावर संबंधित शाळा व्यवस्थापन समितीने नियंत्रण ठेवण्याचे निर्देशही महाराष्ट्र शासनाने दिले आहेत. त्या अनुषंगाने जनगणना कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावतीकरणाची कामे शिक्षकांना देण्यात येत आहेत; परंतु आरटीई अँक्टमधील प्रकरण ४ कलम २७ अन्वये, तसेच शिक्षकांना कोणतीही अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नये, या १८ जून २0१0 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीचा आधार घेत राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावतीकरणाच्या कार्याला शिक्षक विरोध करीत आहेत. राज्यात विविध ठिकाणी स्थानिक पातळीवर या विरोधात कुठे आंदोलन, तर कुठे कामावर बहिष्कार टाकण्यात येत आहे. राज्यभरात शिक्षकांमार्फत विरोध होत असताना महाराष्ट्र शासनाचे शिक्षण उपसचिव राजेंद्र पवार यांनी १२ ऑक्टोबर रोजी एक परिपत्रक काढले. या परिपत्रकानुसार, आरटीई अँक्ट २00९ अन्वये शिक्षकांना जनगणना कार्यक्रम राबवायचा आहे. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावतीकरणाचा उपक्रम हा जनगणना कार्यक्रमाचाच एक भाग आहे. शिक्षकांना हे काम करणे बंधनकारक असल्याचे या परिपत्रकामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षकांमार्फत होत असलेला विरोध व्यर्थ असून, त्यांना ही कामे करावीच लागणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आरटीई अँक्ट २00९ अन्वये शिक्षकांना जनगणना कार्यक्रम राबवायचा आहे, तर राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही हा उपक्रमदेखील जनगणना कार्यक्रमाचाच एक भाग असल्याने शिक्षकांना हे काम करावे लागणार आहे. यासंदर्भात शिक्षण उपसचिवांनीदेखील परिपत्रक जारी केले असल्याचे अमरावती विभागाचे शिक्षण उपसंचालक अशोक सोनवणे यांनी सांगीतले.