शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

तनिष्क कधी पडला समजलेच नाही!

By admin | Updated: June 27, 2017 02:02 IST

‘तनिष्क पाय घसरून कधी पडला कळलेच नाही. त्याला वाचविण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न केले मात्र ते अपयशी ठरत होते.

गौरी टेंबकर-कलगुटकर। लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘तनिष्क पाय घसरून कधी पडला कळलेच नाही. त्याला वाचविण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न केले मात्र ते अपयशी ठरत होते. त्यामुळे मी माझ्या घरच्यांना फोन केला. त्यांनीच मला पोलिसांकडून मदत मागण्याचे सुचवले आणि सुरू झाला मृत्यूचा थरार.’ हा अनुभव आहे मंजीत ठाकूरचा. मंजीत माणगावला पावसाळी सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी एक आहे.ठाण्याला राहणारा मंजीत हा माटुंग्याच्या एका कॉलेजमधून बीएमएसच्या दुसऱ्या वर्गात शिकत आहे. त्याने ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी एकदा तो माणगावच्या भीरा गावातील कुंड पाहून आला होता. तेव्हा फारसा पाऊस नव्हता. त्यामुळे या वर्षी मित्रांना घेऊन या ठिकाणी जाण्याचे त्याने ठरविले. सकाळी आठच्या दरम्यान ते कुंडाच्या ‘स्टार्टिंग पॉइंट’ला पोहोचले. एका हॉटेलमध्ये नाश्ता केला आणि पुढे निघाले. तेव्हादेखील जास्त पाऊस नव्हता. मात्र आम्ही जसजसे पुढे जाऊ लागलो तसतसा पावसाचा जोर वाढू लागला. आम्ही पूर्ण भिजून चिंब झालो होतो, त्यातच खाण्याचे सामानही संपत आले. पाऊस थांबत नव्हता. त्यामुळे अखेर आम्ही कुंडापर्यंत पोहोचू शकत नसल्याचे लक्षात आले आणि माघारी परतण्याचे ठरविले, असे मंजीतने सांगितले. येताना जो ओढा आम्ही सहज पार केला तोच ओढा परतत असताना तुडुंब भरून वाहू लागला. त्यातच आमचा मित्र तनिष्क पाय घसरून ओढ्यात कधी पडला ते मला समजलेच नाही. ते पाहून सोबतच्या मुली घाबरल्या. मात्र तनिष्कला पोहता येत असल्याने तो कसाबसा हातपाय मारत ओढ्याच्या पलीकडे गेला. ओढ्याच्या पाण्याने पातळी गाठली होती. त्यामुळे तनिष्क बराच वेळ तेथे अडकला होता. त्यातच तो थोडाफार जखमीदेखील झाला होता. आमच्याकडे असलेले बिस्कीट, ओआरएसचे पाणी, चॉकलेट्स आम्ही त्याला पुरविले. त्यानंतर आमच्या सोबत असलेल्या स्थानिक गाइड्सना आम्ही तनिष्कला अलीकडे आणण्यासाठी मदत मागितली. मात्र त्यांनी बनवलेली योजना फारशी न रुचल्याने मी माझ्या घरच्यांना फोन केला आणि सर्व काही सांगितले. तेव्हा त्यांनीच मला पोलिसांची मदत घेण्याचे सुचविले आणि ती मदतच महत्त्वाची ठरली, असे मंजीतने सांगितले. मी माणगाव पोलिसांना फोन केला. तेव्हा त्यांनी आम्हाला धीर देत लगेचच घटनास्थळी धाव घेतली. ज्यात पोलीस अधिकारी नवनाथ जगताप होते. त्यांनी सोबत रोप आणि बचावकार्यासाठी आवश्यक असलेली साधने आणली होती. सर्व मुलांचे मनोधैर्य वाढवत तनिष्कसह त्यांनी सर्वांना बाहेर काढले. भुकेने व्याकूळ झाल्याने आम्हाला त्यांनी जेवायला पाठवून दिले. तेव्हा कधी एकदा मुंबईला परततो आणि पालकांना भेटतो असे आम्हाला वाटत होते. मान्सून सुरू झाल्याने अशा अनेक सहली अनेक ठिकाणी निघतील. मात्र त्यापूर्वी योग्य नियोजन आणि काही संकट आल्यास मदत मिळण्याची सोय नक्की पाहा, अशी विनंती मंजीतसह सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांनी केली आहे.