शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

मराठी माणसाला हाकलण्याचा डाव

By admin | Updated: March 10, 2015 04:26 IST

बृहन्मुंबईचा प्रस्तावित विकास आराखडा हा मुंबईतून मराठी माणसाला हाकलून लावण्याचा सुनियोजित डाव असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. मेट्रो प्रकल्पाकरिता मराठी

मुंबई : बृहन्मुंबईचा प्रस्तावित विकास आराखडा हा मुंबईतून मराठी माणसाला हाकलून लावण्याचा सुनियोजित डाव असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. मेट्रो प्रकल्पाकरिता मराठी माणसांच्या घरावर बुलडोझर फिरणार असल्याने त्या प्रकल्पालाही त्यांनी विरोध केला. मराठी माणसाच्या थडग्यावर मुंबईचा विकास आपण होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.मनसेच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. ते म्हणाले की, मुंबईच्या विकास आराखड्याचा बारकाईने अभ्यास केला असता व तज्ज्ञांशी चर्चा केली असता हा आराखडा मराठी माणसाला मुंबईतून हाकलून लावण्याचा कट आहे. मुंबई अशी सरळ ताब्यात घेता येत नसेल तर टॉवरद्वारे ताब्यात घेण्याची योजना आहे. आराखड्यातील एफएसआय वाढीचा प्रस्ताव मराठी माणसाच्या हिताचा नाही. सध्या मुंबईत जे टॉवर उभे राहत आहेत त्यामध्ये मराठी माणसाला राहायला जागा नाही. त्याला तेथून हुसकावून लावले जाते. केवळ शाकाहारी लोकांना अनेक ठिकाणी घरे दिली जातात. मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्यात गिरगावातील मराठी माणसांच्या घरावरच नांगर का फिरवला जाणार आहे, असा सवाल करून ठाकरे म्हणाले की, मलबार हिलवरून मेट्रो रेल्वे का नेण्यात येणार नाही. गोराई येथील १५०० एकर जमीन ना विकास क्षेत्रातून बाहेर काढण्याचा निर्णय हा कुणाच्या फायद्याकरिता घेतला गेला आहे? या जमिनी अगोदरच उद्योगपतींनी विकत घेतल्या असून, त्याची विल्हेवाट लावण्याचे ठरले आहे. आरे कॉलनीमधील झाडांची कत्तलही काही विशिष्ट लोकांना तेथील जमीन हवी असल्याने केली जात आहे, असा आरोप त्यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)