शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
2
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
3
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
4
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
5
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
6
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
7
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
8
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
9
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
10
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
11
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
12
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
13
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
14
चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
15
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
16
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
17
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

‘त्या’ सात मंत्र्यांवर कारवाई करा

By admin | Updated: June 5, 2016 01:24 IST

एकनाथ खडसे यांनी दिलेला राजीनामा हा संपूर्णत: काँग्रेसच्या आंदोलनाचे यश आहे. केवळ खडसे यांच्या राजीनाम्याने भागणार नाही. सध्याच्या युती सरकारमधील सात मंत्री भ्रष्टाचारात अडकले आहेत

मुंबई : एकनाथ खडसे यांनी दिलेला राजीनामा हा संपूर्णत: काँग्रेसच्या आंदोलनाचे यश आहे. केवळ खडसे यांच्या राजीनाम्याने भागणार नाही. सध्याच्या युती सरकारमधील सात मंत्री भ्रष्टाचारात अडकले आहेत. त्या सगळ्यांवर कारवाई करून जेलमध्ये टाकल्याशिवाय काँग्रेस गप्प बसणार नाही. या सातही मंत्र्यांवर लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा मुख्यमंत्र्याच्या वर्षा निवासस्थानी घुसू, असा इशारा मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिला. भ्रष्ट मंत्र्यांवरील कारवाई आणि मुंबई महापालिकेच्या कारभाराविरोधात काँग्रेसच्या वतीने शनिवारी धिक्कार मोर्चाचे आयोजन करण्यात आले. चर्चगेट येथील फॅशन स्ट्रीट ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या वेळी बोलताना निरुपम म्हणाले की, ‘एकनाथ खडसे यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय काँग्रेस गप्प बसणार नाही. मोक्का कायद्यांतर्गत, तसेच भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्यांना अटक करावी. या सरकारमधील ७ मंत्री भ्रष्टाचारामध्ये अडकलेले आहेत. एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, दीपक सावंत, रणजीत पाटील, बबनराव लोणीकर आणि चंद्रशेखर बावनकुळे या सगळ्यांवर कारवाई करून जेलमध्ये टाकल्याशिवाय मी व काँग्रेस गप्प बसणार नाही. (प्रतिनिधी)...अन् पालिकेने हटविले १२०० झेंडे- धिक्कार मोर्चासाठी काँग्रेसने फॅशन स्ट्रिट ते आझाद मैदान परिसरात सुमारे १२०० काँगे्रसचे झेंडे लावले होते. रस्ता दुभाजक, फुटपाथवरील विजेचे खांब आदींवर झेंडे लावले गेले. मात्र, मोर्चा सुरू होण्याच्या आधीच महापालिका अधिकाऱ्यांनी हे झेंडे हटविण्याची कार्यवाही केली. त्यामुळे नाराज काँग्रेस कार्यकर्ते हेच झेंडे हातात घेत, मोर्च्यात सहभागी झाले. - काँग्रेसच्या मोर्चाला शिवसेना-भाजपा घाबरली आहे. त्यामुळेच पालिकेच्या अधिकाऱ्यांमार्फत झेंडे हटविण्याचा प्रकार करण्यात आला. मात्र, या अशा प्रकारांनी काँग्रेस दबणार नाही, पालिकेच्या विरोधातील आमचा लढा सुरूच राहील, अशा भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.युतीवर आरोपमुंबई महानगरपालिकेत प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. नालेसफाई घोटाळा, टॅब घोटाळा, रस्ते बांधणी घोटाळा, खड्डे दुरुस्ती घोटाळा, डम्पिंग ग्राउंड घोटाळा असे अनेक घोटाळे झालेले आहेत. भाजपाचेच खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेत माफिया राज सुरू असल्याचे म्हटले होते. माफिया राजला वांद्र्याचे एक साहेब त्यांचा मेहुणा व त्यांचाच खासगी सचिव जबाबदार असल्याचे ते म्हणाले होते. आता सोमय्या यांनी त्यांची नावे जाहीर करावीत व त्यांच्यावर कारवाई करून अटक करावी, अशी आमची मागणी आहे, शिवाय महापालिका चालविण्यात शिवसेना-भाजपा अपयशी ठरली असल्याने, महापालिकाच बरखास्त करावी, अशी मागणी निरुपम यांनी केली.