शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

मराठा आरक्षणावरील स्थगिती हटविण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, २५ जानेवारीला पुढील सुनावणी   

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 07:31 IST

Maratha reservation : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने बुधवारी नकार दिल्याने राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे.

नवी दिल्ली : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने बुधवारी नकार दिल्याने राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. मराठा आरक्षणाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी विविध उदाहरणे देऊन स्थगिती हटविण्याची विनंती केली. मात्र त्यास न्यायालयाने स्पष्ट शब्दांत नकार दिला. आता पुढील सुनावणी २५ जानेवारी रोजी होणार आहे.सरकारी भरतीवर बंधने नाहीत. परंतु या कायद्यांतर्गत ती करता येणार नाही, असे कोर्टाने म्हटले आहे. सरकारची बाजू मुकुल रोहतगी यांनी मांडली. याबाबत युक्तिवाद करताना रोहतगी म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लावण्यात आलेला नाही. स्वतंत्र ईएसबीसी श्रेणी तयार करण्यात आली. या श्रेणीत येणाऱ्यांना नोकरी, शिक्षणात आरक्षण देण्यात आले. 

सरसकट नाेकरभरती करण्यास मनाई नाही स्थगिती न हटल्यास २ हजारांपेक्षा जास्त उमेदवारांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण होईल. मात्र केवळ याच श्रेणीतील आरक्षणावर स्थगिती आहे, सरसकट भरतीस मनाई नसल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.  दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने नोकरी व शिक्षणात आरक्षण देताना एसईबीसी अधिनियम मंजूर केला होता. आरक्षण घटनाबाह्य असल्याचे सांगून २७ जून २०१९ रोजी त्याविरोधात उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. 

अन्य पर्यायांचा अवलंब करावा न्यायालयीन लढताना एक वेगळी रणनीती लागते, जिचा अभाव राज्य सरकारकडे दिसून आला. अजूनही वेळ गेलेली नाही. विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी शासनाकडे अनेक पर्याय आहेत, त्यांचा विशेष बाब म्हणून सरकारने अवलंब करावा ही विनंती. तसेच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष व सर्वच सत्ताधारी व विरोधी पक्षांनी मराठा आरक्षण प्रकरण गांभीर्याने घ्यावे ! समाजाचा न्यायप्रकियेवर पूर्णतः विश्वास आहे. आम्ही पुन्हा कोर्टात नवीन अर्ज करू.     - विनोद पाटील, याचिकाकर्ते काय करायचे ते सरकारनेच सांगावेतरुणांचे फार नुकसान होतेय. त्यांच्यात आक्रोश निर्माण होतोय. त्यांना पुढे काय करायचं कळत नाहीये. तोपर्यंत इतर माध्यमातून त्यांना कशी मदत करता येईल, याबाबत सरकारने निर्णय घ्यावा, अशी मी विनंती करतो. हा न्यायप्रविष्ट विषय आहे. २५ जानेवारीपर्यंत अंतिम निर्णय होईल किंवा अंतिम सुनावणी होऊन निर्णय येईल, पण तोपर्यंत सरकार या मुलांसाठी काय करणार आहे. काय मदत देणार आहे, हे सरकारनं सांगावे.     - संभाजीराजे, खासदार मुकुल रोहतगी, पीएस पटवालिया, कपिल सिब्बल यांनी राज्य सरकारच्या वतीने तर अभिषेक मनु सिंघवी आणि संदीप देशमुख यांनी याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या वतीने बाजू मांडली. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालयMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार