शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
2
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
3
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
4
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
5
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
6
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा
7
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
8
सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलमध्ये तरुणाईचा कल्ला; 'या' टीमने मारली बाजी
9
गिलमुळे 'तळ्यात-मळ्यात' असलेल्या संजूचा 'फिफ्टी प्लस'चा चौकार! दावेदारी भक्कम केलीये खरी, पण...
10
AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का
11
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
12
बिजुरिया बिजुरिया! सोनू निगमसोबत वरुण धवनचा जबरदस्त डान्स, अभिनेता म्हणाला...
13
वहिनीचा दीरावर जडला जीव; रात्री पतीला एका खोलीत कोंडून 'ती' दिराच्या खोलीत गेली अन्...
14
तुम्हीही तुमच्या पगारवाढीचा हिशोब लावताय? वेतनवाढ कशी ठरते? संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घ्या
15
Manoj Jarange Patil: "माझ्या पोरांवर दादागिरी करायची नाही, एकालाही काठी लावली तर मुंबईसह महाराष्ट्र बंद करू"
16
चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची आवडती कार, मोदींनीही केली सफर! 'लाल झेंडा' असलेल्या 'या' गाडीत खास काय?
17
भारतात रस्ते अपघातात दर तासाला २० जणांचा मृत्यू, अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती
18
GST कमी झाल्यास, किती स्वस्त होऊ शकते मोस्ट-सेलिंग Maruti Ertiga? किती रुपयांचा होऊ शकतो फायदा? जाणून घ्या
19
'आरक्षण बचाव'ची मागणी, मराठा आंदोलनाचे केंद्रबिंदू अंतरवाली सराटीत ओबीसींचे उपोषण
20
Mumbai Local: मराठा आंदोलनामुळे मुंबईची लाईफलाईन खोळंबली! सीएसएमटी स्टेशनवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

राज्यातल्या कैद्यांच्या सुरक्षेसाठी उच्चस्तरीय समिती सर्वोच्च न्यायालयाचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 13:45 IST

राज्यात एकूण ४५ ठिकाणी ६० कारागृह आहे. त्यात ३८००० कैदी आहेत.

ठळक मुद्देमहाराष्ट्रातल्या कैद्यांबाबतचे प्रतिज्ञापत्र नुकतेच सर्वोच्च न्यायालयाला सादर सर्व राज्यांना कैद्यांच्या शिक्षेच्या माहितीचा अहवाल पाठविण्याचे आदेश

युगंधर ताजणे -पुणे : कलम २१ नुसार प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. तसाच तो अधिकार कैद्यांनादेखील आहे. कैद्यांच्या सुरक्षा आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी रेडक्रॉस सोसायटी आणि जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच यापुढील काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टिकोनातून कैद्यांच्या सुरक्षेसाठी ' हाय पावर कमिटी' स्थापन करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. राज्याचे तुरुंग महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी महाराष्ट्रातल्या कैद्यांबाबतचे प्रतिज्ञापत्र नुकतेच सर्वोच्च न्यायालयाला सादर केले आहे. 

राज्यात एकूण ४५ ठिकाणी ६० कारागृह आहे . त्यात ३८००० कैदी आहेत. त्यातील दोन तृतीयांश कच्चे कैदी आहे. हि सुविधा सात वर्षांच्या आतील शिक्षा ठोठावलेल्या कैद्यानाच यांचा लाभ मिळणार आहे. यात कच्च्या कैद्यांचा देखील सहभाग आहे. सध्या कोरोनाच्या प्रादुभार्वाने संपूर्ण देश एका वेगळ्या संकटातून जात आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी केंद्र, राज्य प्रशासनाकडून शथीर्चे प्रयत्न सुरू आहेत. अशातच तुरुंगातल्या कैद्यांच्या सुरक्षेचे काय? याविषयी सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना देशातील सर्व राज्यांना कैद्यांच्या शिक्षेच्या माहितीचा अहवाल पाठविण्याचे आदेश दिले होते. यात महाराष्ट्राच्यावतीने रामानंद यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. मात्र गुजरात, मणिपूर, ओडिशा, दादरा नगर हवेली, पाँडेचरी यापैकी कु ठल्याच राज्याने प्रतिज्ञापत्र सादर न केल्याबद्दल न्यायालयाने त्यांना फटकारले आहे. याशिवाय आंध्र प्रदेश, पंजाब, तमिळनाडू, कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात विधी संघर्षित  कैद्यांविषयी कुठलीच माहिती नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. न्यायालयाने आदेश दिल्याप्रमाणे या हाय पावर कमिटीमध्ये राज्य विधी सेवा प्राधिकरण समितीचे अध्यक्ष, राज्याचे तुरुंग महानिरीक्षक, गृह विभागाचे सेक्रेटरी यांचा समावेश करण्यात आला आहे. यापुढील काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली कुठल्या कैद्यांना अंतरिम जामीन मिळावा, तसेच पॅरोलवर सुटी मिळावी, याचा निर्णय होणार आहे.  --------------* प्रतिज्ञापत्रात काय?-कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी कैद्यांकरिता स्वच्छताविषयक कुठल्या प्रकारच्या सुविधा पुरवण्यात आल्या आहेत, त्यांना मास्कचे वाटप केले का, त्यांच्यावर सुरक्षेच्यादृष्टीने कुठले निर्बंध आदी माहिती प्रतिज्ञापत्रात नमूद करणे गरजेचे होते. -बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, त्रिपुरा, झारखंड, गोवा, केरळ आणि तेलंगणा याबरोबरच जम्मू-काश्मीर या राज्यांमधील तुरुंग प्रशासनाने डिजिटल थर्मामीटरचा उपक्रम सुरू केला असून तो स्तुत्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. आंध्र प्रदेश, पंजाब, केंद्रशासित प्रदेश लडाख यांनी कैद्यांच्या सुरक्षित आरोग्यासाठी विशेष गट तयार केले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेjailतुरुंगSupreme Courtसर्वोच्च न्यायालयPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस