शहरं
Join us  
Trending Stories
1
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
2
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
4
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
5
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
7
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
8
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
9
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
10
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
11
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
12
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
13
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
14
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
15
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
16
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
17
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
18
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
19
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
20
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश

'ज्यांना कचऱ्याचा प्रश्न सोडवता आला नाही, ते राम मंदिर काय बांधणार?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 18:22 IST

औरंगाबाद महानगरपालिकेत कित्येक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताचं, राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. तर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची कोणतेही संधी नेतेमंडळी सोडत नसल्याचे पाहायला मिळत आहे . वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. औरंगाबाद शहरातील साधा कचऱ्याचा प्रश्न सोडवता आला नसलेली शिवसेना राममंदिर काय बांधणार अश्या शब्दात त्यांनी शिवसेनेवर टीका केली.

अयोध्यातील राममंदिर बांधण्याच्या मुद्यावरून शिवसेना नेहमीच आक्रमक होताना पाहायाला मिळाली. मात्र याच राममंदिरावरून सुजात आंबेडकर यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. आज औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, शिवसनेचे नेतेमंडळी राममंदिर बांधू असे सांगत फिरतात. मात्र ज्यांना औरंगाबाद सारख्या शहरातील कचराच्या प्रश्न सोडवता आला नाही, ते काय राममंदिर बांधणार. अशा शब्दात त्यांनी सेनेवर जहरी टीका केली.

पुढे बोलताना ते म्हणाले की, भाजप-शिवसेना हे बहुजन समाजातील तरुणांची डोके भडकवून त्यांना राममंदिर सारख्या प्रश्नावरून रस्त्यावर उतरवत आहे. मात्र याच पक्षातील नेत्यांची मुले राममंदिराच्या प्रश्नासाठी कधीच रस्तावर उतरताना दिसत नाही. ज्या नेत्यांना जनतेचे स्थानिक प्रश्न सोडवता येत नाहीत, त्यांनी राममंदिर बांधण्याची भाषा करू नयेत असेही सुजात आंबेडकर म्हणाले.

औरंगाबाद महानगरपालिकेत कित्येक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. मात्र शहरातील कचराप्रश्न सोडवण्यात त्यांना अपयश आले असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे याच मुद्द्यावरून सुजात यांनी सेनेचा समाचार घेतला. स्थानिक प्रश्न सोडून, राममंदिरचा प्रश्न पुढे करून भाजप-शिवसेनेकडून घाणेरडे राजकरण केले जात असल्याचा आरोप सुद्धा सुजात यांनी यावेळी केला.