शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
3
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
4
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
5
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
6
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
8
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
9
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
10
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
11
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
12
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
13
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
14
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
15
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
16
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
17
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
18
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
19
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
20
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखान्यांनी आगामी काळात इथेनॉल पंप सुरू करावेत - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 13:29 IST

येणाऱ्या जागतिक पर्यावरणदिनी ८० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या बाजारपेठेत विक्रीकरता दाखल करणार

पाचवड : साखर कारखानदारांनी साखर उत्पादनावर भर न देता इथेनॉल निर्मिती वाढवणे गरजेचे आहे. फक्त साखर उत्पादनातून नफा मिळविणे आता अशक्य आहे. इथेनॉलचे उत्पादन वाढवून आगामी काळात साखर कारखानदारांनी स्वतःचे इथेनॉल विक्री पंप सुरू करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

भुईंज येथील किसन वीर सह. साखर कारखाना येथे आयोजित देशभक्त आबासाहेब वीर कृतज्ञता पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, मदत व पुनर्वसन मंत्री आणि किसन वीर कारखाना अध्यक्ष मकरंद पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, खासदार नितीन पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, प्रभाकर घार्गे, प्रमोद शिंदे उपस्थित होते.

मंत्री गडकरी म्हणाले, ‘शेतकरी फक्त अन्नदाता नसून तो आता इंधनदाता झाला पाहिजे, यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. येणाऱ्या जागतिक पर्यावरणदिनी ८० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या आम्ही बाजारपेठेत विक्रीकरता दाखल करीत आहे. भविष्यात शंभर टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्यांची निर्मिती करण्याच्या सूचना वाहने तयार करणाऱ्या कंपन्यांना दिल्या आहेत. शेतीकरता वापरण्यात येणारी यंत्रसामुग्री इथेनॉल किंवा बायो-सीएनजीवर चालविल्यास शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होईल. हायड्रोजन भविष्य असून त्याची किंमत शंभर रुपयांपर्यंत आणता आली तर आपला देश इंधन आयात करणारा देश नाही तर इंधन निर्यात करणारा देश निर्माण होईल.

मंत्री मकरंद पाटील म्हणाले, या पुरस्काराची उंची व पुरस्कार मूर्ती नितीन गडकरी हा खरा संगम या परिसराला पाहिला मिळाला. हे आमचे भाग्य आहे.

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचा आवाका व नजरेतील विकासकामांचे नियोजन हे या राज्याच्या बांधकाम खात्याने अनुभवले आहे. यापुढे देशातील महामार्ग सुखकर करीत असताना माझ्या आणि मकरंद पाटील यांच्या मतदार संघाकडे विशेष लक्ष देतील, असा विश्वास आहे. उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी स्वागत केले. संचालक दिलीप पिसाळ यांनी आभार मानले.

English
हिंदी सारांश
Web Title : Sugar factories should start ethanol pumps: Union Minister Nitin Gadkari

Web Summary : Nitin Gadkari urges sugar factories to prioritize ethanol production and establish their own ethanol pumps for increased profitability and reduced pollution. He envisions farmers as fuel providers. The government aims for 80% ethanol vehicles soon.