शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

कणखर अपृष्ठवंशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 7:29 AM

महाराष्ट्रालादेखील या अपृष्ठवंशी प्राण्यांचे वरदान लाभले आहे. यात कीटकांचा सहभाग सर्वात अमूल्य आहे.

अपृष्ठवंशी प्राणी हे जगातील सर्वांत जैवविविध गट असूनदेखील त्यांच्याबद्दल लोकांना खूपच कमी आत्मीयता वाटते. सर्व प्राणिमात्रात त्यांचा सहभाग दोनतृतीयांश आहे. संख्या आणि विविधतेच्या दृष्टीने, अपृष्ठवंशी प्राणी स्पष्ट विजेते आहेत. पृथ्वीच्या प्रत्येक उपलब्ध कोनाडात (जमीन, हवा आणि समुद्र), अपृष्ठवंशी प्राण्यांची व्याप्ती आहे. तरीदेखील ५ टक्के असलेले सस्तन प्राणी जसे वाघ, सिंह, हत्ती आणि अस्वल हे जास्त लक्ष वेधून घेतात आणि लोक बाकीच्या इटुकल्या पिटुकल्या प्राण्यांना दूर लोटून देतात.पर्यावरणातील प्रत्येक अन्नसाखळीत, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अपृष्ठवंशी प्राणी पोषक म्हणून कार्यरत आहेत. पृष्ठवंशी प्राण्यांचे (मासे, उभयचर, सरिसृप, पक्षी आणि सस्तन प्राणी) अन्न म्हणून मोलाची भूमिका असो किंवा विघटक म्हणून असो अपृष्ठवंशी प्राणी अन्न जाळ्याचा महत्त्वपूर्ण भाग आहेत. काही परजीवी प्राण्यांखेरीज बहुतांश अपृष्ठवंशी प्राणी हे आवश्यक पर्यावरण-सेवा पुरवितात. जसे परागीकरण, खनिजांचा पुनर्वापर करणे आणि मोम, मध, लाख, रेशमसारख्या लहान वन उत्पादनांची निर्मिती करणे.महाराष्ट्रालादेखील या अपृष्ठवंशी प्राण्यांचे वरदान लाभले आहे. यात कीटकांचा सहभाग सर्वात अमूल्य आहे आणि त्यांच्या प्रजाती विविध आहेत. फक्त कीटक बघितले तरी ते ३२ आॅर्डरमध्ये विभागले जातात. त्यापैकी बहुतांश कीटक हे मुंग्या, बीटलस्, फुलपाखरे आणि पतंग, नाकतोडे, चतुर आणि टाचणी, माशा व मधमाशा, गांधीलमाशी, अशा शेकडो जाती, प्रजाती आणि उपजाती आपल्या समुद्रकिनारी, सह्याद्रीच्या डोंगरात, दख्खनच्या पठारावर आणि मध्य भारताच्या घनदाट जंगलात सापडतात.मुंग्या : जगातील सर्वात बलाढ्य प्राण्यांमध्ये मुंग्यांना धरले जाते. त्यांची संख्या, काम करण्याची क्षमता, शिस्त आणि सामाजिक संरचना हे त्यांचे वैशिष्ट्य मानले जाते.फुलपाखरे आणि पतंग : सौंदर्याची परिभाषा म्हणजे फुलपाखरे आणि पतंग. त्यांनी जर परागीकरण केले नाही, तर अर्धी मनुष्यवस्ती उपाशी मरेल. असे म्हणतात की, हे नष्ट होण्याच्या चौथ्या दिवशी पृथ्वी बंद पडेल.गांधीलमाशी : आपल्याला चावतात म्हणून आपण त्यांची घरटी तोडतो; परंतु या प्राण्यांनी जगात सर्वात प्रथम पानांपासून कागद बनवला होता. त्यावरूनच चिनी लोकांनी कागद बनवणे शिकले. या गांधीलमाशा, भाज्या खाणाऱ्या अळ्या आणि रोगराई पसरवणाºया माशांचे नियंत्रण करतात.फिड्डलर कॅ्रब : समुद्रकिनारी दशपदी खेकडे आणि फिड्डलर क्रॅब हे शेती करीत असतात. रात्रं-दिवस ते वाळूतील अन्न खोलवर लपवून जुनी वाळू परत वर फेकत असतात, ज्यामुळे किनारपट्टीची शेती होते आणि त्यात प्राणवायू जातो. यामुळे वाळूत राहणाºया प्राण्यांना प्राणवायू मिळतो.गोम आणि पैसाकिडा : शेकडो पायांचे हे प्राणी डायनासोरच्या युगातून आपल्या युगात जगले आहेत. आपल्या द्रव आणि रासायनिक फवारणीमुळे ते नष्ट होऊ लागले आहेत. रात्री-अपरात्री वावरणारे हे प्राणी खूपच महत्त्वाचे विघटक आहेत. त्यांच्या शिवाय मृतांपासून पुनरुज्जीवन अशक्य आहे!- आनंद पेंढरकर, जयेश विश्वकर्मा, मुंबई

टॅग्स :International Day for Biological Diversityजागतिक जैवविविधता दिवसwildlifeवन्यजीव