शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

'कंबरेखाली वार केल्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 06:22 IST

एकनाथ शिंदे यांची आणि माझी मैत्री पूर्वी लपूनछपून होती. मात्र, आज आम्ही उघडपणे मैत्री करीत आहोत.

ठाणे : एकनाथ शिंदे यांची आणि माझी मैत्री पूर्वी लपूनछपून होती. मात्र, आज आम्ही उघडपणे मैत्री करीत आहोत. विरोधी पक्षात असतानाही आम्ही कधीच परस्परांवर कंबरेखालचे वार केले नाहीत. परंतु, राजकारणात काही लोक तोंडावर गोड बोलतात, कौतुक करतात, आपले मित्र असल्याचे भासवतात. मात्र, प्रत्यक्षात ते कंबरेखाली वार करून मोकळे होतात. अशा लोकांमुळेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याची टीका गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर केली.

ठाणे महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि ई-भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आव्हाड बोलत होते. ठाकरे यांच्यासोबत काम करताना कम्फर्टेबल वाटते. आतापर्यंत कोणत्याच मुख्यमंत्र्यांसोबत काम करताना इतके कम्फर्टेबल वाटले नसल्याची जाहीर कबुली आव्हाड यांनी दिली.

मातोश्रीवर एकदा गेलो होतो, तेव्हा ममता, माया व प्रेम काय असते, ते कळले होते, असेही ते म्हणाले. किसननगर भागात क्लस्टर योजना राबविली गेली आहे. परंतु, मुंब्य्रातदेखील अशा अनेक अनधिकृत, धोकादायक इमारती उभ्या आहेत. त्यामुळे येथेही ही योजना राबवावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. किंबहुना, एमएमआर रिजनमध्ये क्लस्टर योजना राबविल्यास त्यातून सर्वांनाच हक्काचे घर मिळेल, असे ते म्हणाले.

एसआरएच्या माध्यमातून ठाण्यात ३०० चौरस फुटांची घरे दिली जाणार आहेत. पोलीस आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना म्हाडा किंवा तत्सम योजनांमध्ये १० टक्के राखीव कोटा ठेवला जाणार आहे. मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातील एसआरएचे नियम समान केले जाणार आहेत. पारसिकनगर येथे २७ एकरचा भूखंड आहे. त्यावर दिवंगत अभिनेत्री नूतन यांचे घर आहे. तिथे पक्षी अभयारण्य, नवा प्रकल्प ठाणेकरांसाठी राबवावा, अशी मागणी त्यांनी केली. शिवाय, गावठाणे आणि कोळीवाड्यांतील रहिवाशांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

एमएमआर रिजनचे वेगळे प्राधिकरण करणार- शिंदे

मुंबईच्या धर्तीवर ठाण्यात एसआरएचा विकास करताना एमएमआर रिजनमध्ये क्लस्टरची योजना राबविली जाणार आहे. या शिवाय, एमएमआरए क्षेत्राचे वेगळे प्राधिकरण केले जाणार असल्याची माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमावेळी दिली.च्यानिमित्ताने या भागाचा विकास त्याच ठिकाणी होईल.

धोकादायक किंवा अनधिकृत इमारतींचा विकासही त्याच ठिकाणी होईल. ठाणे आणि शिवसेनेचे अतूट नाते आहे. ठाण्यात आमूलाग्र बदल झाला आहे. परंतु, ठाणेकरांचा २५ वर्षांपासून विश्वास कायम आहे, असे शिंदे म्हणाले. मुंबई महापालिका मोठी असली तरी ठाणे महापालिकेत अनेक मोठे प्रकल्प उभे राहिले आहेत, ही ठाणेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. दुसरीकडे क्लस्टरच्या विकासात कोणताही दुजाभाव केला जाणार नसल्याचे शिंदे यांनी जितेंद्र आव्हाडांना उद्देशून स्पष्ट केले.

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीJitendra Awhadजितेंद्र आव्हाडUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसthaneठाणे