शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

'कंबरेखाली वार केल्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 06:22 IST

एकनाथ शिंदे यांची आणि माझी मैत्री पूर्वी लपूनछपून होती. मात्र, आज आम्ही उघडपणे मैत्री करीत आहोत.

ठाणे : एकनाथ शिंदे यांची आणि माझी मैत्री पूर्वी लपूनछपून होती. मात्र, आज आम्ही उघडपणे मैत्री करीत आहोत. विरोधी पक्षात असतानाही आम्ही कधीच परस्परांवर कंबरेखालचे वार केले नाहीत. परंतु, राजकारणात काही लोक तोंडावर गोड बोलतात, कौतुक करतात, आपले मित्र असल्याचे भासवतात. मात्र, प्रत्यक्षात ते कंबरेखाली वार करून मोकळे होतात. अशा लोकांमुळेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याची टीका गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर केली.

ठाणे महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि ई-भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आव्हाड बोलत होते. ठाकरे यांच्यासोबत काम करताना कम्फर्टेबल वाटते. आतापर्यंत कोणत्याच मुख्यमंत्र्यांसोबत काम करताना इतके कम्फर्टेबल वाटले नसल्याची जाहीर कबुली आव्हाड यांनी दिली.

मातोश्रीवर एकदा गेलो होतो, तेव्हा ममता, माया व प्रेम काय असते, ते कळले होते, असेही ते म्हणाले. किसननगर भागात क्लस्टर योजना राबविली गेली आहे. परंतु, मुंब्य्रातदेखील अशा अनेक अनधिकृत, धोकादायक इमारती उभ्या आहेत. त्यामुळे येथेही ही योजना राबवावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. किंबहुना, एमएमआर रिजनमध्ये क्लस्टर योजना राबविल्यास त्यातून सर्वांनाच हक्काचे घर मिळेल, असे ते म्हणाले.

एसआरएच्या माध्यमातून ठाण्यात ३०० चौरस फुटांची घरे दिली जाणार आहेत. पोलीस आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना म्हाडा किंवा तत्सम योजनांमध्ये १० टक्के राखीव कोटा ठेवला जाणार आहे. मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातील एसआरएचे नियम समान केले जाणार आहेत. पारसिकनगर येथे २७ एकरचा भूखंड आहे. त्यावर दिवंगत अभिनेत्री नूतन यांचे घर आहे. तिथे पक्षी अभयारण्य, नवा प्रकल्प ठाणेकरांसाठी राबवावा, अशी मागणी त्यांनी केली. शिवाय, गावठाणे आणि कोळीवाड्यांतील रहिवाशांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

एमएमआर रिजनचे वेगळे प्राधिकरण करणार- शिंदे

मुंबईच्या धर्तीवर ठाण्यात एसआरएचा विकास करताना एमएमआर रिजनमध्ये क्लस्टरची योजना राबविली जाणार आहे. या शिवाय, एमएमआरए क्षेत्राचे वेगळे प्राधिकरण केले जाणार असल्याची माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमावेळी दिली.च्यानिमित्ताने या भागाचा विकास त्याच ठिकाणी होईल.

धोकादायक किंवा अनधिकृत इमारतींचा विकासही त्याच ठिकाणी होईल. ठाणे आणि शिवसेनेचे अतूट नाते आहे. ठाण्यात आमूलाग्र बदल झाला आहे. परंतु, ठाणेकरांचा २५ वर्षांपासून विश्वास कायम आहे, असे शिंदे म्हणाले. मुंबई महापालिका मोठी असली तरी ठाणे महापालिकेत अनेक मोठे प्रकल्प उभे राहिले आहेत, ही ठाणेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. दुसरीकडे क्लस्टरच्या विकासात कोणताही दुजाभाव केला जाणार नसल्याचे शिंदे यांनी जितेंद्र आव्हाडांना उद्देशून स्पष्ट केले.

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीJitendra Awhadजितेंद्र आव्हाडUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसthaneठाणे