शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

राज्य सरकारने मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करू नये, संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 18:12 IST

प्रत्येक पाऊल जपून टाकायला हवं. मराठा आरक्षणाबाबत कसल्याही प्रकारची चूक परवडणारी नाही.

कोल्हापूर -  मराठा आरक्षणाबाबतसर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर खासदार युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.  मराठा आरक्षणासंदर्भातसर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडणाऱ्या यापूर्वीच्या वकिलांना बदलण्यात आले असल्याच्या वृत्तानंतर संभाजी राजेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यासंदर्भात विचारणा केली आहे. तसेच आरक्षणाची अटीतटीची आणि अंतिम लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. अश्या परिस्थितीत ही एक गंभीर चूक सरकार कडून होत आहे, असे वाटत नाही का? मुख्यमंत्र्यांना यासंदर्भातील माहिती दिली गेली आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच मराठा आरक्षणासंदर्भात कसल्याही प्रकारची चूक परवडणारी नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात खासदार संभाजीराजे म्हणतात की, ''सर्वोच्च न्यालायात मराठा आरक्षण संदर्भात भूमिका मांडणाऱ्या यापूर्वीच्या वकिलांना बदलण्यात आले आहे? जर हे खरे असेल, तर सर्वोच्च न्यायालयात यशस्वी लढा देत असलेल्या मुकुल रोहतगी आणि नाडकर्णी यांसारख्या जेष्ठ वकिलांना बदलण्याचे कारण काय? आज अरक्षणसंबंधीत बाजू मंडण्याकरिता कोर्टात उपरोक्त वकील उपस्थित नव्हते. प्रचंड मोठ्या त्यागातून मिळत असलेल्या आरक्षणाची अटीतटीची आणि अंतिम लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. अश्या परिस्थितीत ही एक गंभीर चूक सरकार कडून होत आहे, असे वाटत नाही का? मुख्यमंत्र्यांना यासंदर्भातील माहिती दिली गेली आहे का?''  ''आज सर्वोच्च न्यायालयात केस दाखल करण्याची तारीख होती. काल रात्री उशिरा माजी सरकारी वकील निशांत कटनेश्वरकर यांनी रोहतगी आणि नाडकर्णी यांना ब्रिफ केले. काही वेळाने, नवनियुक्त सरकारी वकिल  राहुल चिटणीस यांनी उपरोक्त वकिलांना न्यायालयात बाजू न मांडण्याची विनंती केली. त्याकरिता त्यांनी हे कारण दिलं की एवढे महागडे वकील कशाकरता लावायचे? त्यांना एवढी फी देण्याची काही आवश्यकता नाही. ते वकील केवळ महागडे आहेत हे कारण पुरेसे नाही. यापैकी माजी अॅटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी उच्च न्यायालयात सुद्धा मराठा आरक्षणाचा बाजू मांडली होती. त्यांच्या भूमिकेमुळे मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकण्यात मोठी मदत झाली हे वास्तव आहे. नाडकर्णी हे देशाचे सध्याचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आहेत. त्यांचं महत्व किती मोठं आहे, हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. या अनुभवी वकिलांना बाजूला करणे हे काही ठीक नाही, असेही संभाजीराजेंनी पत्रात म्हटले आहे.''सरकारकडे मराठा आरक्षणाची केस लढण्याकरीता पैश्यांची कमतरता असेल असे वाटत नाही. उलट सरकारने देशातले सर्वोत्तम वकिलांना आपली भूमिका मांडायला सांगितलं पाहिजे. या परिस्थितीत प्रत्येक पाऊल जपून टाकायला हवं. कसल्याही प्रकारची चूक परवडणारी नाही. मुख्यमंत्र्यांनी याबाबत त्वरित उपाय करण्याची आवश्यकता आहे,''अशी मागणीही खासदार संभाजीराजेंनी केली आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय