शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
2
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
3
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
4
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
5
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
6
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
7
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
8
नांदेडमधील चौघांच्या मृत्यूचे गूढ उकलले; आई-वडिलांना संपवून मुलांची आत्महत्या 
9
बाजार सुस्त, पण SIP मस्त! दरमहा १०,००० रुपयांच्या एसआयपीने व्हाल कोट्यधीश; वाचा सोपं गणित
10
दोन पत्नींच्या कचाट्यात सापडला बेरोजगार पती! स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; १९ दिवसांनी दिल्लीत जे घडलं...
11
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
12
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
13
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
14
'सैराट'मधील इंटिमेट सीनबद्दल पहिल्यांदाच बोलली रिंकू राजगुरू, म्हणाली- "मी घाबरले होते, पण..."
15
आ. विजयकुमार देशमुख यांचा असंतोष ३० तासात मावळला; मुंबईच्या बैठकीत उमेदवार निश्चित
16
Video: "पापाराझींना वाटलं सलमान खान कारमध्ये, पण...", चक्क ई-बाईकवरुन घेतली भाईजानने एन्ट्री
17
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
18
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
19
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात रब्बीवर अवकाळी पावसाचा सुखद शिडकावा; पिकांना संजीवनी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 13:18 IST

परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने राज्यात अनेक तालुक्यात दुष्काळ पडला आहे. त्यामुळे खरीपाच्या पिकांबरोबरच रब्बी पिकेही जळून गेली आहेत.

ठळक मुद्देजनावरांना काही दिवस का होईना हिरवा चारा उपलब्ध होणारपुणे विभागातील काही तालुक्यात पावसाच्या चांगल्या सरी कोसळल्या पाणी टंचाईमुळे नागरिकांना पाणी पुरवठा करणा-या टँकरच्या संख्येत वाढ

पुणे: राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीमुळे रब्बी पिके करपू लागल्याची स्थिती असतानाच गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसाच्या शिडकाव्यामुळे पिकांना संजीवनी मिळली आहे. पुणे विभागातील काही तालुक्यात पावसाच्या चांगल्या सरी कोसळल्या आहेत.त्यामुळे जनावरांना काही दिवस का होईना हिरवा चारा उपलब्ध होणार आहे.सांगली जिल्ह्यात आटपाडीमध्ये ६५.३० मि.मी.तर खानापूरमध्ये ३९.४० मि.मी पावसाची नोंद झाली आहे.परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने राज्यात अनेक तालुक्यात दुष्काळ पडला आहे.काही तालुक्यात खरीपाच्या पिकांबरोबरच रब्बी पिकेही जळून गेली आहेत.त्यातच जनावरांनाही चारा उपलब्ध नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.महसूल विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार राज्य शासनातर्फे दुष्काळी तालुके जाहीर करण्यात आले आहेत.तसेच पाणी टंचाईमुळे नागरिकांना पाणी पुरवठा करणा-या टँकरच्या संख्येत वाढ होत चालाली आहे.त्यात गेल्या दोन दिवसात पुणे विभागातील पुणे,सांगली,सातारा,कोलापूर व सोलापूर जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या सरी कोसळल्याने सुखद वातावरण निर्माण झाले आहे.पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील नैसर्गीक आपत्ती नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार सांगली जिल्ह्यात काही तालुक्यात आवकाळी पाऊस झाला आहे.त्यात सोमवारपर्यंत (दि.१९) खानापूरमध्ये ३९.४०मि.मी.,आटपाडीत ५६.३० मि.मी., केडगावमध्ये ३१.६० मि.मी., पलूसमध्ये १२.८० मि.मी. एवढी पावसाची नोंद झाली आहे. तर सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यात १८.४० मि.मी.,पंढरपूरमध्ये १२.९६ मि.मी., सांगोलामध्ये ८.७२ मि.मी. पावसाची नोंद झाली. कोल्हापूर जिल्ह्यात करवीर येथे १२.५४ मि.मी. आणि भूदरगडमध्ये १८.०० मि.मी.पाऊस नोंदविला गेला.साता-यात काही ठिकाणी १ ते ७ मि.मी.पावसाची नोंद झाली. पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासात बारामती,इंदापूर व पुरंदर तालुक्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या.पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या मंगळवार (दि.२०)च्या अहवालानुसार साता-यात माण तालुक्यात १९.२९ मि.मी.पावसाची नोंद झाली.तर पाटण,कराड,कोरेगाव,खटाव,खंडाळा,वाई येथे ३ ते ७ मि.मी.पावसाची नोंद झाली.सांगलीत शिराळा येथे ११.३० मि.मी.पाऊस झाला असून मिरज,इस्लामपूर,तासगाव आणि कवठेमहाकाळ येथे १ ते ७ मि.मी.एवढा पाऊस झाला.पुणे विभागात सोलापूर जिल्ह्यात यंदा केवळ ४० टक्के पाऊस झाला आहे.सोलापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात मोहोळमध्ये १७.९० मि.मी.,माळशिरस येथे १०.६० मि.मी., करमाळ्यात १६.८८ मि.मी. आणि अक्कलकोट येथे १३.०० मि.मी.तर दक्षिण सोलापूरात २०.९१ मि.मी.पावसाची नोंद झाली.त्याचप्रमाणे बार्शी,पंढरपूर,मंगळवेढा या भागातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत.तर कोल्हापूर जिल्ह्यात शाहुवाडीत १८.६७ आणि शिरोळमध्ये ९.४३ मि.मी.पावसाची नोंद झाली................अवकाळी पावसामुळे बहुतांश वेळा पिकांचे नुकसानच होते.मात्र,सुमारे अडीच महिन्यापासून काही भागात पाऊसाने पाठ फिरवली आहे.त्यामुळे पाण्याआभावी करपू लागलेल्या ज्वारीसारख्या पिकांना दिलासा मिळाला आहे.परंतु,काढणीला आलेल्या भात पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसdroughtदुष्काळMaharashtraमहाराष्ट्र