शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

सोलापूर अन् उस्मानाबाद जिल्ह्यातील ४१ साखर कारखान्यांकडे ११८६ कोटींची साखर शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 12:00 PM

एफआरपीचे ६०९ कोटी देणे; आधारभूत ३१०० रुपये क्विंटल दराने साखर विक्रीला परवानगी

ठळक मुद्देसाखर विक्री करून एफआरपीची रक्कम देण्याची शासनाने सवलत दिली शासनाने दिलेल्या सवलतीनुसार कारखान्यांनी साखर विक्री सुरू केलीएफआरपी न देणाºया काही कारखान्यांवर आरआरसीनुसार साखर जप्तीची कारवाई

सोलापूर: केंद्र शासनाने ठरविलेल्या ३१०० रुपये क्विंटल आधारभूत किमतीनुसार सोलापूरउस्मानाबाद जिल्ह्यातील ४१ साखर कारखान्यांकडे ११८५ कोटी ८४ लाख ४२ हजार ४०० रुपयांची साखर शिल्लक आहे. एफआरपीप्रमाणे ६०८ कोटी ६४ लाख रुपये इतकी रक्कम कारखाने शेतकºयांचे देणे आहे.

  राज्यातील साखर कारखान्यांकडे एफआरपीनुसार शेतकºयांचे देणे असून स्वॉफ्ट लोन घेऊन एफआरपी देण्याची सवलत शासनाने दिली होती. एफआरपी न देणाºया काही कारखान्यांवर आरआरसीनुसार साखर जप्तीची कारवाई करण्यात आली. तरीही कारखान्यांनी शेतकºयांचे पैसे दिले नाहीत. त्यानंतर स्वॉफ्ट लोन उचलल्यानंतरही सोलापूर व उस्मानाबादच्या ३३ साखर कारखान्यांनी एफआरपी चुकती केली नसल्याने शासनाने शिल्लक साखर विक्री करून शेतकºयांचे पैसे देण्याची सवलत कारखान्यांना दिली आहे.

शासनाने दिलेल्या सवलतीनुसार कारखान्यांनी साखर विक्री सुरू केली आहे. १५ मे रोजीच्या सोलापूर साखर सहसंचालक कार्यालयाकडील आकडेवारीनुसार सोलापूर जिल्ह्यातील ३१ व उस्मानाबादच्या १० अशा ४१ कारखान्यांकडे ३८ लाख २५ हजार ३०४ क्विंटल साखर शिल्लक आहे. केंद्र शासनाने साखरेची आधारभूत किंमत प्रतिक्विंटल ३१०० रुपये  ठरवली आहे. शिल्लक साखरेची केंद्र शासनाने ठरविलेल्या आधारभूत किमतीनुसार ११८५ कोटी ८४ लाख ४२ हजार ४०० रुपये इतकी किंमत होते. दोन्ही जिल्ह्यातील ३३ साखर कारखान्यांनी १५ जूनच्या अहवालानुसार एफआरपीप्रमाणे ६०८ कोटी ६४ लाख रुपये इतकी रक्कम शेतकºयांची दिली नाही. शासनाने दिलेल्या सवलतीप्रमाणे कारखाने शिल्लक साखर विक्री करून एफआरपीची रक्कम देत असल्याचे सांगण्यात आले. 

उस्मानाबादचे कारखाने शिल्लकमध्ये  - उस्मानाबाद जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे १६ लाख ५० हजार ८७९ क्विंटल साखर असून त्याची आधारभूत किंमत ५११ कोटी ७७ लाख २४ हजार ९०० रुपये होते तर एफआरपीप्रमाणे १२५ कोटी ४ लाख रुपये इतकी रक्कम शेतकºयांचे देणे आहे.आधारभूत किमतीने साखर विक्री झाली तरीही ५१२ कोटी येतात व १२५ कोटी देणे असल्याने उस्मानाबादचे कारखाने शिल्लकमध्ये आहेत.- सोलापूर जिल्ह्यातील ३१ साखर कारखान्यांकडे २१ लाख ७४ हजार ४२५ क्विंटल साखर शिल्लक असून आधारभूत किमतीप्रमाणे त्याची किंमत ६७४ कोटी ७ लाख १७ हजार ५०० रुपये होते. २५ साखर कारखान्यांकडे एफआरपीनुसार ४८३ कोटी ६० लाख रुपये शेतकºयांचे देणे   आहे.

साखर विक्री करून एफआरपीची रक्कम देण्याची शासनाने सवलत दिली आहे. त्यानुसार बºयाच कारखान्यांनी साखर विक्री सुरू केली आहे.  त्यातून शेतकºयांचे पैसे दिले जातील.  जूनअखेर विक्री झालेली साखर व दिलेल्या एफआरपीची आकडेवारी समोर येईल.- अविनाश देशमुखप्रादेशिक सहसंचालक सोलापूर (साखर) 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेgovernment schemeसरकारी योजनाOsmanabadउस्मानाबादFarmerशेतकरीagricultureशेती