शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीनंतर आता राज्यात स्मार्ट ग्राम !

By admin | Updated: May 20, 2015 02:13 IST

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर स्मार्ट ग्राम योजना राबविण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील माळीण गावापासून त्याची सुरुवात होणार आहे.

यदु जोशी ल्ल मुंबईस्मार्ट सिटीच्या धर्तीवर स्मार्ट ग्राम योजना राबविण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील माळीण गावापासून त्याची सुरुवात होणार आहे. खेडी स्वयंपूर्ण करण्यासाठी उचललेले हे महत्त्वाकांक्षी पाऊल असून सुरुवातीला १० स्मार्ट ग्रामची उभारणी केली जाईल, असे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ही कल्पना पुढे आल्यानंतर पहिले स्मार्ट ग्राम माळीण असावे, हा विचार समोर आला. ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी माळीणला नुकतीच भेट दिली. शहरांवरील वाढता भार कमी करायचा असेत तर खेडी समृद्ध करणे आणि खेड्यांमध्येही उपजिविकेची साधने उपलब्ध होऊ शकतात, हा विश्वास निर्माण करण्याचा स्मार्ट ग्रामचा उद्देश असल्याचे मुंडे म्हणाल्या. योजनेची पंचसूत्री एस फॉर सॅनिटेशन (स्वच्छता), एम - मॅनेजमेंट/मॉडर्नायझेशन, (व्यवस्थापन), ए - अकाउंटॅबिलिटी (उत्तरदायित्व), आर - रिन्युएबल एनर्जी (अपारंपरिक ऊर्जा) व टी- ट्रान्स्फ रन्सी ही स्मार्ट ग्रामची पंचसूत्री असेल.बदल्यांसाठी भरला मेळासह्याद्री अतिथीगृहावर आज वेगळे चित्र होते. एकेक अधिकारी उभे राहून त्याला कुठे बदली हवी आहे ते सांगत होता आणि त्याची मागणी मान्य केली जात होती. ग्रामविकास विभागांतर्गत कार्यरत साहाय्यक गटविकास अधिकारी आणि बालविकास प्रकल्प अधिकारी राज्यभरातून आपल्या बदलीचा ‘चॉइस’ सांगण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे आणि सचिव व्ही. गिरीराज यांच्यासमोर हजर झाले. आमच्या हयातीत आम्हाला असा ‘चॉइस’ पहिल्यांदाच विचारला गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मी पारदर्शकपणे बदल्या करतेय, तुम्ही पारदर्शकपणे काम करावे, अशी अपेक्षा पंकजा यांनी व्यक्त केली.पर्यावरण संतुलित ग्रामविकास योजना बंद पर्यावरण संतुलनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना पर्यावरण संतुलित ग्रामविकास योजनेंतर्गत दरवर्षी बक्षिसे दिली जातात. ही योजना आता बंद करण्याचा शासनाचा विचार आहे. केवळ बक्षिसे देण्याइतपत ही योजना मर्यादित राहते. बक्षिसे मिळालेल्या गावांनी पुढे पर्यावरण राखले का, याचे कुठेही आॅडिटिंग होत नाही. बक्षिसांचा सोपस्कार करण्याऐवजी योजना बंद करणे योग्य ठरेल, असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.