शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

BJP vs Shivsena, CM Uddhav Thackeray: "उद्धव ठाकरे बहुधा राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री होणार"; भाजपाचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 13:49 IST

"उद्धव ठाकरेंच्या हाती घड्याळ बांधणार? म्हणजे राऊतही समाधानी आणि सुप्रियाताईही समाधानी"

BJP vs Shivsena, CM Uddhav Thackeray: महाराष्ट्रात २०१९च्या अखेरीस शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिघांनी मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. तीनही पक्षांच्या विचारधारा भिन्न होत्या, त्यामुळे किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर सत्तास्थापना झाली आणि शिवनेसेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. या सरकारला आता अडीच वर्षे पूर्ण झाली असून कार्यकाळ संपण्यासाठी आणखी अडीच वर्षे शिल्लक आहेत. पण आतापासून पुढच्या टर्मला मुख्यमंत्री कोण असावं यावरून विधानं केली जाऊ लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना, पुढील मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी काँग्रेसचा होऊ दे', असं साकडं सुप्रिया सुळे यांनी देवीला घातल्याचे सांगितले. तर, पुढील २५ वर्षे उद्धव ठाकरे हेच राज्याचे मुख्यमंत्री राहतील, असे विधान शिवसेनेच खासदार संजय राऊत यांनी केले. त्यावरूनच भाजपाने आघाडी सरकारला टोला लगावला.

एकीकडे उद्धव ठाकरे २५ वर्षे मुख्यमंत्री राहणार असं शिवसेनेचे संजय राऊत म्हणत आहेत. दुसरीकडे, अडीच वर्षानंतर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर तुळजाभवानीचा नवस फेडणार असं सुप्रिया सुळे म्हणत आहेत. त्यामुळे बहुदा उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री होणार, असा खोचक टोला भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला.

भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. "महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झाल्यास सगळ्या आमदारांसह दर्शनाला येईन, असा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी तुळजाभवानी मातेला केलेल्या नवसाची कालपासून चर्चा आहे. खरंतर कट्टर पुरोगामी मंडळी मंदिरांचे उंबरठे झिजवून देवांना नवससायास करू लागतीत, हे एक आश्चर्यच म्हटलं पाहिजे. बाकी आता देवीच्या आशीर्वादानं राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर पुढील २५ वर्षे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील, या शिवसेना प्रवक्ते, प्रख्यात ज्योतिषी सामनावीर संजय राऊत यांनी केलेल्या दाव्याचं काय होणार? की हा दावा खरा ठरण्यासाठी आणि सुप्रियाताईंचा नवसही पूर्ण व्हावा यासाठी मध्यममार्ग म्हणून उद्धव ठाकरेंच्या हाती घड्याळ बांधणार? म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहिले म्हणून राऊत समाधानी आणि राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला, म्हणून सुप्रियाताईही समाधानी", असा खोचक टोला उपाध्ये यांनीही लगावला. तसेच, "तुम्ही कितीही दावे तरी पुढचा मुख्यमंत्री हा कुठल्याही फोडाफोडी, तिघाड्यांमधून नाही तर जनतेच्या स्पष्ट बहुमताच्या बळावर निवडून येईल आणि तो मुख्यमंत्री भाजपाचाच असेल!!!", असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सुप्रिया सुळे यांच्या विधानावर राऊत काय म्हणाले-

संजय राऊत म्हणाले, "सध्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि सुप्रिया सुळे यांचेदेखील हेच म्हणणे आहे की, उद्धव ठाकरे हेच पुढील २५ वर्षे मुख्यमंत्री राहणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात असे संभ्रम निर्माण केले जातात. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सोनिया गांधी, राहुल गांधी हे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वशैलीवर खुश आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाबद्दलचे प्रश्न कोणीही निर्माण करत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे."

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSupriya Suleसुप्रिया सुळेSanjay Rautसंजय राऊत