शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

...म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली; उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 9:18 PM

आम्ही सकाळी चोरुन नाही, तर संध्याकाळी शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने हजारो लोकांसमोर शपथ घेतली : उद्धव ठाकरे

"भाजपने पोकळ हिंदुत्व केलं आहे. विविध राज्यात सोईचे राजकारण करतात. त्यांनी हिंदुत्वासाठी काही राज्यात गोवंश हत्या बंदी केली, तर काही राज्यात ही सुरू ठेवली आहे. हे म्हणतात आम्ही लोकशाहीचा अपमान केला. पण, तुम्ही आम्हाला गुलामाची वागणूक दिली. तुम्ही आम्हाला दिलेलं वचन मोडलं, त्यामुळेच आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती केली. पण, आम्ही तुमच्यासारखी सकाळी चोरुन नाही, तर संध्याकाळी शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने हजारो लोकांसमोर शपथ घेतली," असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिकांशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

युतीमध्ये २५ वर्षे सडली हे माझं मत आजही कायम आहे. शिवसेना प्रमुख म्हणायचे, राजकारण म्हणजे गजकरण आहे, जेवढं खाजवावं तेवढी खाज आहे. हे राजकारणातले गजकरणी आहेत. ते राजकारण म्हणून काहीही खाजवतायत, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. "आजचं यांचं जे हिंदुत्व आहे, ते सत्तेसाठी अंगीकारलेलं एक ढोंग आहे. वाघाचं कातडं पांघरलेलं गाढव असतं तसं यांनी हिंदुत्वाचं कातडं पांघरलंय. २५ वर्ष यांना पोसल्यानंतर हे लक्षात आलं हे दुर्देव आहे. आम्ही हिंदुत्व सोडलं नाही. ते कदापी सोडणार नाही. भाजपला आम्ही सोडलं. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही," असंही ते म्हणाले. 

"अमित शाह एकदा पुण्यात म्हणाले होते, एकट्यानं लढून दाखवा. आमची एकट्यानं लढायची तयारी आहे. आम्ही वीरासारखे लढू. हिंमत असेल तर कार्यकर्ते आणि पक्ष जसे राजकारणात भिडतात तसं भिडा. आव्हान द्यायचं आणि मागे ती ईडीची पिडा लावायची, इन्कम टॅक्सची पिडा लावायची, है शौर्य नाही. त्यांनी तशी आव्हानं द्यायची गरज नाही," असं उद्धव ठाकरे म्हणाले. यांची पद्धत म्हणजे वापरायचं आणि फेकून द्यायचं. एकेकाळी यांचं डिपॉझिट जप्त व्हायचं. तेव्हा यांनी प्रादेशिक पक्षांशी युती केली. आमच्याशी केली, अकाली दलाशी केली, सर्व पक्ष सोबत घेऊन अटलबिहारी वाजपेंयींनी सरकार चालवलं. आम्ही साथ दिली, काहीही करा पण जो भगवा फडकलाय तो उतरू देऊ नका. पण त्या भगव्याचं रंग पुसट होत चाललाय. हे हिंदुत्वाचा वापर स्वार्थासाठी करू लागलेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसBJPभाजपा