शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

फक्त ‘टोमणे’च असे भारी असतील तर...; उद्धव ठाकरेंच्या भाषणावरून शिवसेनेचा भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 7:51 AM

अंगावर येऊ नका, दिल्लीतील सत्तेचा माज दाखवू नका, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी देऊन भाजपला व त्यांच्या बगलबच्च्यांना पायाखाली घेतले आहे.

मुंबई - शिवसेनेच्या राजकीय विरोधकांचे आकलन कमी पडत असल्याने शिवसेनेच्या बाबतीत त्यांचे अंदाज रोजच चुकत आहेत. मुंबईतील महाप्रचंड सभेने तर या सगळ्या विरोधकांनी मातीच खाल्ली आहे. सभेतील गर्दी पाहून शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) हेसुद्धा उसळून बोलले व त्यांच्या प्रत्येक फटकाऱ्यासरशी विरोधकांचे एक-एक दात घशात गेले. फडणवीसादी भाजपचे पुढारी या सभेची तुलना ‘टोमणे सभा’, ‘टोमणे बॉम्ब’ अशीच करत होते. एकवेळ ते खरे मानू. ठाकऱ्यांचे फक्त ‘टोमणे’च असे भारी असतील तर प्रत्यक्ष घाव, फटके व हल्ले किती भयंकर असतील? उद्धव ठाकरे यांनी फणस सोलावा तसे विरोधकांना सोलून काढले आहे असा टोला सामना अग्रलेखातून शिवसेनेनं भाजपाला लगावला आहे.

तसेच भाजपचे(BJP) पुढारी देशभरात इतरांना ‘बुस्टर’ डोस देत फिरत असतात, पण मुंबईतील शिवसेनेच्या सभेने या मंडळींना जहाल बुस्टर डोस देऊन उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा बाणा दाखवून दिला. मुंबई स्वतंत्र करण्याची भाषा मधल्या काळात फडणवीसादी नेत्यांनी केली. शिवसेना व मराठी माणूस भाजपचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही, अशी हाळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली. अंगावर येऊ नका, दिल्लीतील सत्तेचा माज दाखवू नका, असा इशारा ठाकरे यांनी देऊन भाजपला व त्यांच्या बगलबच्च्यांना पायाखाली घेतले आहे. शिवसेनेला(Shivsena) कमी लेखण्याचे व खाली खेचण्याचे धाडस अंगलट येईल, हाच शिवसेनेच्या वादळी सभेचा इशारा आहे असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

तुमच्या सत्तेचा ‘ढाचा’ आम्ही खाली खेचणार; देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना जोरदार प्रत्युत्तर

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे

मुंबईतील शिवसेनेची सभा दिमाखात झाली. शिवसेनेच्या सभांना होणाऱ्या गर्दीची आकडेमोड आजपर्यंत कोणालाच जमली नाही. बीकेसीतील खुल्या मैदानावरील सभेची सुरुवात वांद्रय़ातून होती, तर दुसरे टोक कुर्ल्याच्या पार गेले होते. त्यामुळे विरोधी पक्षातील गर्दी पंडितांचीही वाचा गेली आहे.

सभेची गर्दी ही फक्त त्या मैदानावरच नव्हती. सभास्थानी लाखो लोक होते, तेवढेच लोक बाहेर अडकून पडले होते व आसपासच्या रस्त्यांवर गर्दीच्या वादळी लाटा जणू उसळत असल्याचे वर्णन प्रसिद्ध झाले ते खरेच आहे. शिवसेना पूर्वीची राहिली नाही, असा अपप्रचार करणाऱ्यांच्या जिभा हा महासागर पाहून टाळूलाच चिकटल्या असतील.

कश्मीरात सध्या हिंदू पंडितांवरच नव्हे, तर देशभक्त नागरिकांवर अतिरेक्यांचे अमानुष हल्ले सुरू झाले आहेत. राहुल भट्ट या कश्मिरी पंडित तरुणावर दहशतवाद्यांनी सरकारी कार्यालयात घुसून हल्ला केला व ठार मारले. त्यानंतर कश्मीरातील हिंदू समाज रस्त्यावर उतरला.

पोलिसांनी हिंदूंवर अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या. हिंदू समाजाने मोदी व शहांच्या विरोधात घोषणा दिल्या. उद्धव ठाकरे यांनी या परिस्थितीवर केला, ‘‘राहुल भट्टला जिथे मारले तिथे आता ‘हनुमान चालिसा’ वाचायची काय?’’

“पुढची २५ वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री हवा; शाखेत बसा, लोकांच्या समस्या ऐका”: उद्धव

कंगना राणावतपासून नवनीत राणापर्यंत सर्वांना केंद्र सरकारने एकदम खास सुरक्षा पुरवली आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे तर केंद्रीय सुरक्षा व्यवस्थेचा ‘सेल’ लागला आहे किंवा काळा बाजारच सुरू आहे. शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विरोधात अनापशनाप बोला व केंद्रीय सुरक्षेचे खास पथक मिळवा, असे ‘पॅकेज’ लावले आहे.

महाराष्ट्रात अनेक टिनपाट लोकांना केंद्राने सुरक्षा पुरवली ही गंमतच आहे, पण कश्मीरात राहुल भट्टसारख्या लोकांना कोणतीही सुरक्षा नाही व ते दिवसाढवळय़ा मारले जात आहेत. उद्धव ठाकरे यांचा हा मुद्दा बिनतोड आहे. भगवी टोपी घालणाऱ्यांना तुम्ही प्रखर हिंदुत्ववादी मानता. मग आरएसएसची टोपी काळी कशी? या प्रश्नावर आता संघाला खुलासा करावा लागेल.

फक्त 13 वर्षांच्या देवेंद्र फडणवीस यांनी राममंदिराच्या आंदोलनात कसा काय सहभाग घेतला? या ढोंगाचा मुखवटाच ठाकरे यांनी फाडला. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून भाजप राजकीय विरोधकांना नामोहरम करीत आहे. खोटय़ा मार्गाने आमच्या मागे लागणार असाल तर तुम्हालाही दया-माया-क्षमा दाखविणार नाही. महाराष्ट्रातून पळता भुई थोडी करीन असा दम ठाकरे यांनी भरला.

जे विरोधात आहेत ते सगळे भाजपच्या दृष्टीने गुन्हेगार कसे? मग भाजपमध्ये कोण आहेत? सध्या दाऊदच्या नावाने राजकारण सुरू आहे, पण उद्या दाऊद म्हणाला, मीच भाजपमध्ये येतो तर तो लगेच शुद्ध होईल व मंत्री म्हणून भाजप नेत्यांच्या मांडीस मांडी लावून बसलेला दिसला तरी आश्चर्य वाटायला नको अशा अस्वली गुदगुल्या ठाकरे यांनी भाजपास केल्या. त्यामुळे संपूर्ण सभेत हास्यस्फोटच घडले.

भारतीय जनता पक्ष व त्यांचे पूर्वाश्रमीचे बाप ‘जनसंघ’ वगैरे स्वातंत्र्य लढय़ात कधीच नव्हते. मुंबई, महाराष्ट्राच्या युद्धातूनही त्यांनी पळ काढला. अशा लोकांनी शिवसेनेला किंवा महाराष्ट्राला काही शिकविण्याच्या फंदात पडू नये.

राज ठाकरे वगैरे नेत्यांच्या मेंदूचा केमिकल लोचा झाला असल्याची चपखल उपमा त्यांनी दिली. राज ठाकरे यांचे राजकारण भरकटल्याप्रमाणे झाले आहे व भाजप त्यांचा वापर करून घेत आहे. आपल्यात बाळासाहेब ठाकऱ्यांचा संचार झाल्याचा आव आणून ते वागतात. यामागे भाजपची खेळी आहे. फाटक्या टय़ूबमध्ये अशी हवा भरल्याने हिंदुत्वाचा वारू कसा उधळणार? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला.

देशात महागाई, बेरोजगारीचा आगडोंब उसळला आहे. मोदी धान्य फुकट देतात, पण गॅसच्या किमती हजारावर गेल्या. त्यामुळे अन्न शिजवायचे कसे? त्या महागाईवर बोलायचे की भोंगे आणि ‘हनुमान चालिसा’वर वाद करायचा? हिंदुत्वाची ठेकेदारी काही भाजपने घेतलेली नाही.

भाजपचे हिंदुत्व विषारी, विखारी आणि विकृत असल्याचा घणाघात ठाकरे करतात, तेव्हा यापुढे शिवसेना-भाजपचे नाते काय असेल याचा खुलासा होतो. मोदी-शहांच्या बाबतीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी परखड भूमिका मांडली व ती मांडणे आवश्यक होते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा