शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

'आठवलेंसाठी महायुतीत भाजप-शिवसेना विद्यमान जागा सोडणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2019 5:21 PM

भाजप-शिवसेना १३५-१३५ आणि मित्रपक्षाला १८ जागा देण्याचे ठरले होते.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत झालेल्या महायुतीप्रमाणेच विधानसभेत सुद्धा युती होणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. मात्र जागावाटपाच्या मुद्यावरून अंतिम निर्णय होऊ शकला नाही. गेल्यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला भाजपने ८ जागा सोडल्या होत्या. मात्र त्या संपूर्ण ८ ही जागांवर शिवसेनेचे विद्यमान आमदार असल्याने, महायुतीत शिवसेना-भाजपकडून विद्यामान जागा माझ्या पक्षाला सोडण्यात येईल अशी अपेक्षा करतो, असे आठवले म्हणाले आहे. 

आठवले यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखीत लोकसभावेळी ठरलेल्या महायुतीच्या फॉर्म्युल्याचा खुलासा केला आहे. भाजप-शिवसेना १३५-१३५ आणि मित्रपक्षाला १८ जागा देण्याचे ठरले होते. अशी माहिती आठवले यांनी दिली आहे. तसेच यावेळी ते म्हणाले की, गेल्यावेळी माझ्या पक्षाला सोडलेल्या ८ जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे आरपीआयला सोबत ठेवायचे असेल तर काही सिटिंग जागा शिवसेना-भाजपकडून मिळायला हव्यात ही अपेक्षा आहे, असं आठवले म्हणाले.

विशेष म्हणजे आठवले यांनी आगामी निवडणुकीत १० जागा आपल्या पक्षाला सोडण्याची मागणी केली आहे. तर या जागा देतांना गेल्यावेळी दिलेल्या जागांचा सुद्धा समावेश असणार आहे. त्यामुळे शिवसेना आठवलेंसाठी आपल्या विद्यमान जागा सोडणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर भाजपने सुद्धा काही विद्यमान जागा आमच्यासाठी सोडाव्यात अशी अपेक्षा असल्याचे सुद्धा आठवले म्हणाले.

पुढे बोलताना आठवले म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत आम्ही आमच्याच पक्षाच्या चिन्हावर लढणार आहोत. जर आमदार निवडून आले तर ते आमच्या पक्षातील असतील.अन्यथा ते आमदार भाजपचे असल्याचा संदेश जाईल. मात्र आठवले यांना महायुतीत प्रत्यक्षात किती जागा मिळणार आणि जर गेल्यावेळी दिलेल्या जागांचा त्यात समावेश असल्यास सेनेच्या विद्यामान जागा उद्धव ठाकरेंना सोडाव्या लागतील. त्यामुळे उद्धव ठाकरे त्यासाठी तयार होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.