शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

उपमुख्यमंत्री अजित पवारांना 'डॉक्टर' म्हणाले संजय राऊत; त्यामागे आहे एक खास कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 17:52 IST

Coronavirus in Maharashtra: अलीकडच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून ज्या घडामोडी घडल्या, तेव्हा संजय राऊत यांनी 'राजभवन'वर काही टीकेचे बाण सोडले होते.

ठळक मुद्देसंजय राऊत यांचा हजरजबाबीपणा आणि हळूच चिमटा काढसंजय राऊत यांचा हजरजबाबीपणा आणि हळूच चिमटा काढण्याची 'स्टाईल' सगळ्यांनाच माहीत आहे.ण्याची 'स्टाईल' सगळ्यांनाच माहीत आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख त्यांनी 'डॉक्टर' असा केला. ती गंमत असेल की चिमटा, हे सूज्ञांस सांगण्याची गरज नाही.

मुंबईः शिवसेना नेते आणि 'सामना'चे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांचा हजरजबाबीपणा आणि हळूच चिमटा काढण्याची 'स्टाईल' सगळ्यांनाच माहीत आहे. त्याच हलक्याफुलक्या शैलीत त्यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख 'डॉक्टर' असा केला. त्यामागचं कारण ठरलं, अजितदादांचंच एक वाक्य!

खासदार संजय राऊत यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनवर जाऊन भेट घेतली. स्वाभाविकच, या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. कारण, अलीकडच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून ज्या घडामोडी घडल्या, तेव्हा संजय राऊत यांनी 'राजभवन'वर काही टीकेचे बाण सोडले होते. राजभवन राजकारणाचा अड्डा बनू नये, अशी टिप्पणी त्यांनी केली होती. त्यामुळे राज्यपालांच्या भेटीनंतर त्यांचा ‘बाईट’ घेण्यासाठी राजभवनाबाहेर वृत्तवाहिन्या सज्ज होत्या.  त्यांना पाहून  संजय राऊत आपल्या कारमधून  उतरून आले. त्यांचं पहिलं वाक्य होतं, ‘‘अजित पवार काल म्हणालेत बूम (माईक) लांब ठेवा. त्याने कोरोना होतो, असं ‘डॉक्टर’ अजित पवारांनी सांगितलंय.’’ त्यातही डॉक्टर या शब्दावर त्यांचा जरा जास्तच जोर होता. त्यांनी असा उल्लेख का केला असेल, ती गंमत असेल की चिमटा, हे सूज्ञांस सांगण्याची गरज नाही.

काय म्हणाले होते अजित पवार?

अजित पवार काल पुण्यात होते. महापालिका अधिकाऱ्यांसोबतची एक बैठक संपवून ते बाहेर आले, तेव्हा पत्रकार त्यांची वाटच बघत होते. पण, अजितदादांनी दुरूनच नमस्कार केला होता. कोरोना संपल्यावर मीडियाशी बोलेन, एवढंच मोघम बोलून ते पुढे निघाले. तेव्हा, काही जणांनी बूम माईक पुढे नेले. त्यावर, ते जवळ आणू नका, त्याने कोरोना होतो, असं म्हणत अजितदादांनी धूम ठोकली होती. त्यांच्या याच ‘संशोधना’बद्दल संजय राऊत यांनी त्यांना ‘डॉक्टर’ ही पदवी दिली आहे.

राज्यपालांना का भेटले राऊत?

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबत काय चर्चा झाली, या प्रश्नावर, तुम्हाला का सांगू?, असा प्रतिप्रश्न संजय राऊत यांनी केला. राज्यपाल आमचे मार्गदर्शक आहेत. बरेच दिवस त्यांना भेटलो नव्हतो. म्हणून ही सदिच्छा भेट होती, असं ते म्हणाले. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध मधुर आहेत, पित्रा-पुत्राच्या संबंधांसारखे आहेत आणि ते तसेच राहतील, असंही त्यांनी सांगितलं. राजभवनाला राजकारणाचा अड्डा बनवू नका, हे विधान देशभरातील घटनांबद्दल होतं. त्याला मुंबईच्या राजभवनाशी जोडू नका, असं म्हणत त्यांनी काहीसा सावध पवित्राही घेतला.

आणखी वाचाः 

आज तर आकाशात 'काळे' कावळेही दिसले नाहीत; संजय राऊतांकडून भाजपाची खिल्ली

राज्य सावरण्यासाठी शरद पवारांची धडपड अद्भुत, राऊतांकडून कामाचं कौतुक

कोरोना संकटात पंतप्रधानांवर टीका योग्य नाही- संजय राऊत

राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये- संजय राऊत

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSanjay Rautसंजय राऊतAjit Pawarअजित पवारShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस