शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: शिवसेना आणि भाजप युतीचं 'ऑल इज वेल' ! 'वंचित', 'आघाडी'चे पाय खोलात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 17:13 IST

Maharashtra Assembly Election 2019: विधानसभेलाही काँग्रेस-राष्ट्रवादीशी जुळवून न घेता स्वबळावर आमदार निवडून आणण्याची तयारी त्यांनी केली आहे. मात्र जागावाटप फिस्कटल्यामुळे एमआयएमने साथ सोडली. त्यामुळे वंचितचे भवितव्य आता अधांतरी राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मुंबई - विधानसभा निवडणूक जवळ येत असून युती आणि आघाडीच्या चर्चांना वेग आला आहे. तर काहीजण एकमेकांपासून दुरावत आहेत. यात युतीचं सर्वकाही व्यवस्थित असल्याचं दिसत आहे. तर एमआयएमने साथ सोडल्यामुळे वंचित बहुजन आघाडी अंधातरी असल्याचे दिसून येत असून मेगा आउटगोइंगमुळे आघाडीची मार्गही खडतर झाला आहे.

शिवसेना आणि भाजप यांच्यातील युती निश्चित मानली जात आहे. वाटपावरून अद्याप एकमत झाले नसले तरी पुढची सत्ता युतीची असंही सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत आधीच युतीने शानदार कामगिरी केली आहे. लोकसभा निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी विधानसभा मतदारसंघानुसार पाहिल्यास, युतीची गोळाबेरीज २२८ पर्यंत जाते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत या जागा ४३ ने अधिक आहे. हेच वर्चस्व विधानसभेला कायम ठेवण्याचा प्रयत्न युतीचा आहे.

लोकसभा निवडणुकीत स्थापनेपासून आठ महिन्यांतच मोठी भरारी घेणाऱ्या वंचित आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ९ जागांवर पराभव पत्करावा लागला होता. यामुळे वंचित आघाडीचा आत्मविश्वास वाढला. विधानसभेलाही काँग्रेस-राष्ट्रवादीशी जुळवून न घेता स्वबळावर आमदार निवडून आणण्याची तयारी त्यांनी केली आहे. मात्र जागावाटप फिस्कटल्यामुळे एमआयएमने साथ सोडली. त्यामुळे वंचितचे भवितव्य आता अधांतरी राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी नेत्यांच्या पक्षांतरामुळे अडचणीत सापडली आहे. राष्ट्रवादीतील ३० हून अधिक नेत्यांनी पक्षातर केले आहे. तर काँग्रेसची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. त्यातच पक्षातील अंतर्गत मतभेद बाहेर येत असल्याने अडचणी थांबण्याचं नाव घेत नाहीत. अशा सगळ्या स्थितीत देखील वंचित आणि आघाडीकडून समजदारीची भूमिका घेतली जात ण्यात येत नाही. त्यामुळे 'युतीचं सर्वकाही ऑल इज वेल' असून वंचित बहुजन आघाडी अन् आघाडीचे पाय आणखीच खोलात दिसून येत आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी