शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

शिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 11:10 IST

सरसकट कर्जमाफी आणि मराठा आरक्षणाचाचा मुद्दा भाजपसाठी डोकेदुखी होता. यापैकी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागला असून कर्जमाफीचा मुद्दा शिल्लक आहे. यातही नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, राज्यात मराठा समाजाचा मुख्य व्यावसाय शेती आहे. त्यामुळे आरक्षण मिळाल्यामुळे कर्जमाफीचा मुद्दा बाजुला पडला आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली दुरवस्था तसेच २८८ पैकी बहुतांशी मतदार संघात युतीला मिळालेले मताधिक्य सत्ताधारी भाजपचा आत्मविश्वास वाढवणारे आहे. केवळ नरेंद्र मोदी यांच्यामुळेच भाजपला लोकसभेला प्रचंड यश मिळाले असून भाजप-शिवसेना उमेदवारांना अनेक विधानसभा मतदार संघात आघाडी मिळाली आहे. राज्यात देखील या मोदी लाटेवर स्वार होण्याची संधी भाजपकडे आहे. त्यामुळे शिवसेनेला युतीची आस असली तरी भाजप ऐनवेळी एकला चलो रे नारा देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. तशी वक्तव्य देखील भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहेत.

२०१४ मध्ये स्वतंत्र लढून १२२ जागांपर्यंत मजल मारणाऱ्या भाजपची नजर लोकसभेप्रमाणेच राज्यातही बहुमताचा आकडा गाठण्यावर आहे. सत्तेत असलेल्या शिवसेनेसोबत सरकार चालवणे म्हणजे लोढणं गळ्यात अडकविल्याची भावना अनेक भाजप नेत्यांच्या मनात आहे.  लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात २३ जागा मिळाल्या. तर शिवसेनेच्या वाट्याला १८ जागा आल्या. या जागांवरूनच शिवसेना भाजपच्या पेक्षा बरीच मागे असल्याचे दिसून येते. गेल्यावेळी मोठा भाऊ म्हणून युती तोडणारे शिवसेना नेते पाच वर्षांत शिवसेना-भाजप जुळे भाऊ असल्याचे सांगत आहेत. यावरून शिवसेना नेत्यांना देखील भाजपला स्वबळावर बहुमत मिळण्याची भीती आहे, असंच दिसत. तर विधानसभेला विरोधक एकत्र लढले तरी, भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचा इशारा मिळत आहे. 

२०१४ मध्ये भाजपने १२२ जागा जिंकल्या होत्या, तर अनेक जागांवर थोडक्यात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सहाजिकच युतीत विजयी झालेल्या जागांवर भाजप आग्रही असणार आहे. त्यानंतर प्रश्न उतरतो तो थोडक्यात पराभव पत्कराव्या लागलेल्या जागांचा, या जागांवर देखील भाजप दावा करणार हे निश्चितच आहे. गेल्या वेळचा हिशोब मुख्यमंत्र्यांनीच मांडला असून २०१४ मध्ये भाजपला २४५ जागा मिळाल्या असत्या, परंतु काही जागा थोडक्यात भाजपच्या हातून गेल्या. यावरून एकंदरीतच युती शिवसेनेला फायद्याची असली तरी भाजपसाठी तोट्याचीच दिसत आहे. 

सरसकट कर्जमाफी आणि मराठा आरक्षणाचाचा मुद्दा भाजपसाठी डोकेदुखी होता. यापैकी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागला असून कर्जमाफीचा मुद्दा शिल्लक आहे. यातही नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, राज्यात मराठा समाजाचा मुख्य व्यावसाय शेती आहे. त्यामुळे आरक्षण मिळाल्यामुळे कर्जमाफीचा मुद्दा बाजुला पडला आहे. त्यातच अनेक मराठा घराणी भाजपच्या बाजूने गेल्यामुळे विरोधकांची शक्ती कमी झाली आहे. तर शिवसेनेकडे असा काहीही मुद्दा उरलेला नाही. सत्तेत असूनही विरोधकांप्रमाणे भूमिका घेतल्याने शिवसैनिकांमध्येच संभ्रम आहे. त्यामुळे विधानसभेला स्वबळावर लढल्यास भाजपसाठी ही बाब फायद्याची ठरू शकते.