शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 11:10 IST

सरसकट कर्जमाफी आणि मराठा आरक्षणाचाचा मुद्दा भाजपसाठी डोकेदुखी होता. यापैकी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागला असून कर्जमाफीचा मुद्दा शिल्लक आहे. यातही नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, राज्यात मराठा समाजाचा मुख्य व्यावसाय शेती आहे. त्यामुळे आरक्षण मिळाल्यामुळे कर्जमाफीचा मुद्दा बाजुला पडला आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली दुरवस्था तसेच २८८ पैकी बहुतांशी मतदार संघात युतीला मिळालेले मताधिक्य सत्ताधारी भाजपचा आत्मविश्वास वाढवणारे आहे. केवळ नरेंद्र मोदी यांच्यामुळेच भाजपला लोकसभेला प्रचंड यश मिळाले असून भाजप-शिवसेना उमेदवारांना अनेक विधानसभा मतदार संघात आघाडी मिळाली आहे. राज्यात देखील या मोदी लाटेवर स्वार होण्याची संधी भाजपकडे आहे. त्यामुळे शिवसेनेला युतीची आस असली तरी भाजप ऐनवेळी एकला चलो रे नारा देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. तशी वक्तव्य देखील भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहेत.

२०१४ मध्ये स्वतंत्र लढून १२२ जागांपर्यंत मजल मारणाऱ्या भाजपची नजर लोकसभेप्रमाणेच राज्यातही बहुमताचा आकडा गाठण्यावर आहे. सत्तेत असलेल्या शिवसेनेसोबत सरकार चालवणे म्हणजे लोढणं गळ्यात अडकविल्याची भावना अनेक भाजप नेत्यांच्या मनात आहे.  लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात २३ जागा मिळाल्या. तर शिवसेनेच्या वाट्याला १८ जागा आल्या. या जागांवरूनच शिवसेना भाजपच्या पेक्षा बरीच मागे असल्याचे दिसून येते. गेल्यावेळी मोठा भाऊ म्हणून युती तोडणारे शिवसेना नेते पाच वर्षांत शिवसेना-भाजप जुळे भाऊ असल्याचे सांगत आहेत. यावरून शिवसेना नेत्यांना देखील भाजपला स्वबळावर बहुमत मिळण्याची भीती आहे, असंच दिसत. तर विधानसभेला विरोधक एकत्र लढले तरी, भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचा इशारा मिळत आहे. 

२०१४ मध्ये भाजपने १२२ जागा जिंकल्या होत्या, तर अनेक जागांवर थोडक्यात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सहाजिकच युतीत विजयी झालेल्या जागांवर भाजप आग्रही असणार आहे. त्यानंतर प्रश्न उतरतो तो थोडक्यात पराभव पत्कराव्या लागलेल्या जागांचा, या जागांवर देखील भाजप दावा करणार हे निश्चितच आहे. गेल्या वेळचा हिशोब मुख्यमंत्र्यांनीच मांडला असून २०१४ मध्ये भाजपला २४५ जागा मिळाल्या असत्या, परंतु काही जागा थोडक्यात भाजपच्या हातून गेल्या. यावरून एकंदरीतच युती शिवसेनेला फायद्याची असली तरी भाजपसाठी तोट्याचीच दिसत आहे. 

सरसकट कर्जमाफी आणि मराठा आरक्षणाचाचा मुद्दा भाजपसाठी डोकेदुखी होता. यापैकी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागला असून कर्जमाफीचा मुद्दा शिल्लक आहे. यातही नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, राज्यात मराठा समाजाचा मुख्य व्यावसाय शेती आहे. त्यामुळे आरक्षण मिळाल्यामुळे कर्जमाफीचा मुद्दा बाजुला पडला आहे. त्यातच अनेक मराठा घराणी भाजपच्या बाजूने गेल्यामुळे विरोधकांची शक्ती कमी झाली आहे. तर शिवसेनेकडे असा काहीही मुद्दा उरलेला नाही. सत्तेत असूनही विरोधकांप्रमाणे भूमिका घेतल्याने शिवसैनिकांमध्येच संभ्रम आहे. त्यामुळे विधानसभेला स्वबळावर लढल्यास भाजपसाठी ही बाब फायद्याची ठरू शकते.