शहरं
Join us  
Trending Stories
1
शतकातील सर्वात दीर्घ सूर्यग्रहण, ६ मिनिटे २३ सेकंदांपर्यंत परसेल अंधकारा, कोण कोणत्या देशांत दिसणार? भारतात कुठे-कुठे दिसणार? जाणून घ्या
2
२० वर्षांनी राज ठाकरे घरी गेले, सक्रीय होताच संजय राऊतांना भेटले; अर्धा तास चर्चा, काय घडले?
3
इंडिगोच्या ७० हून अधिक विमानांचे उड्डाण रद्द! क्रूच्या कमतरतेमुळे मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरातील हजारो प्रवासी हैराण
4
'मी खोटे काम केलं नाही!' छत्रपती संभाजीनगरची बोगस 'IAS' कल्पना भागवत अखेर 'बोलली'...
5
₹६७००००० चं टॉयलेट, ₹७६००० चा ब्रश अन्... किती श्रीमंत आहेत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन? रहस्यमय आहे संपत्ती!
6
MS धोनीचा लाडका, वर्ल्डकपही खेळला; पण नंतर १० वर्ष संघाबाहेर बसला... अखेर क्रिकेटला रामराम
7
पुतिन यांच्या भारत दौऱ्यामुळे शेअर बाजारात खळबळ, 'हे' शेअर्स फोकसमध्ये राहणार...
8
Team India's New Jersey For T20 World Cup 2026: रोहितनं दाखवली टीम इंडियाची नवी जर्सी; कॉलरवरील तिरंगा चर्चेत!
9
मोठी बातमी! बिजापूरमध्ये भीषण चकमक; 7 नक्षलवादी ठार, तर 2 जवान शहीद
10
सायको काकी! सुंदर मुलांचा काटा काढायची अन् पार्टी करायची, स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही
11
India's Squad For T20I vs SA: टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पांड्यासह गिलचं कमबॅक!
12
एलॉन मस्कची धडकी भरवणारी भविष्यवाणी, म्हणाला- येत्या काळात महायुद्ध अटळ! २०३० पर्यंत...
13
हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
14
फोनचा पासवर्ड विसरलात? सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही; 'अशा' प्रकारे ५ मिनिटांत घरबसल्या करू शकता अनलॉक!
15
गुरुनिष्ठेचा आदर्श, रामदास स्वामींचे दर्शन; संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे श्रीधर स्वामी!
16
चमत्कार! कडाक्याच्या थंडीत निर्दयी आईने रस्त्यावर फेकलं, भटक्या कुत्र्यांनी नवजात बाळाला वाचवलं
17
"भारताचे तुकडे झाले, तरच...!"; बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे विषारी फुत्कार, कोण आहेत अब्दुल्लाहिल अमान आजमी?
18
Virat Kohli Century : किंग कोहलीचा 'शतकी रोमान्स'! रायपूरच्या मैदानातही विक्रमांची 'बरसात'
19
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ‘असे’ करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, सोपा विधी अन् काही मान्यता!
20
मोठी उलथापालथ! ओला इलेक्ट्रीक रसातळाला पोहोचली; नोव्हेंबरच्या रेसमध्ये बाहेर फेकली गेली 
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना, भाजप पुन्हा 'एकला चलो रे'च्या दिशेने !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2019 11:10 IST

सरसकट कर्जमाफी आणि मराठा आरक्षणाचाचा मुद्दा भाजपसाठी डोकेदुखी होता. यापैकी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागला असून कर्जमाफीचा मुद्दा शिल्लक आहे. यातही नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, राज्यात मराठा समाजाचा मुख्य व्यावसाय शेती आहे. त्यामुळे आरक्षण मिळाल्यामुळे कर्जमाफीचा मुद्दा बाजुला पडला आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली दुरवस्था तसेच २८८ पैकी बहुतांशी मतदार संघात युतीला मिळालेले मताधिक्य सत्ताधारी भाजपचा आत्मविश्वास वाढवणारे आहे. केवळ नरेंद्र मोदी यांच्यामुळेच भाजपला लोकसभेला प्रचंड यश मिळाले असून भाजप-शिवसेना उमेदवारांना अनेक विधानसभा मतदार संघात आघाडी मिळाली आहे. राज्यात देखील या मोदी लाटेवर स्वार होण्याची संधी भाजपकडे आहे. त्यामुळे शिवसेनेला युतीची आस असली तरी भाजप ऐनवेळी एकला चलो रे नारा देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. तशी वक्तव्य देखील भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहेत.

२०१४ मध्ये स्वतंत्र लढून १२२ जागांपर्यंत मजल मारणाऱ्या भाजपची नजर लोकसभेप्रमाणेच राज्यातही बहुमताचा आकडा गाठण्यावर आहे. सत्तेत असलेल्या शिवसेनेसोबत सरकार चालवणे म्हणजे लोढणं गळ्यात अडकविल्याची भावना अनेक भाजप नेत्यांच्या मनात आहे.  लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात २३ जागा मिळाल्या. तर शिवसेनेच्या वाट्याला १८ जागा आल्या. या जागांवरूनच शिवसेना भाजपच्या पेक्षा बरीच मागे असल्याचे दिसून येते. गेल्यावेळी मोठा भाऊ म्हणून युती तोडणारे शिवसेना नेते पाच वर्षांत शिवसेना-भाजप जुळे भाऊ असल्याचे सांगत आहेत. यावरून शिवसेना नेत्यांना देखील भाजपला स्वबळावर बहुमत मिळण्याची भीती आहे, असंच दिसत. तर विधानसभेला विरोधक एकत्र लढले तरी, भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचा इशारा मिळत आहे. 

२०१४ मध्ये भाजपने १२२ जागा जिंकल्या होत्या, तर अनेक जागांवर थोडक्यात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सहाजिकच युतीत विजयी झालेल्या जागांवर भाजप आग्रही असणार आहे. त्यानंतर प्रश्न उतरतो तो थोडक्यात पराभव पत्कराव्या लागलेल्या जागांचा, या जागांवर देखील भाजप दावा करणार हे निश्चितच आहे. गेल्या वेळचा हिशोब मुख्यमंत्र्यांनीच मांडला असून २०१४ मध्ये भाजपला २४५ जागा मिळाल्या असत्या, परंतु काही जागा थोडक्यात भाजपच्या हातून गेल्या. यावरून एकंदरीतच युती शिवसेनेला फायद्याची असली तरी भाजपसाठी तोट्याचीच दिसत आहे. 

सरसकट कर्जमाफी आणि मराठा आरक्षणाचाचा मुद्दा भाजपसाठी डोकेदुखी होता. यापैकी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागला असून कर्जमाफीचा मुद्दा शिल्लक आहे. यातही नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, राज्यात मराठा समाजाचा मुख्य व्यावसाय शेती आहे. त्यामुळे आरक्षण मिळाल्यामुळे कर्जमाफीचा मुद्दा बाजुला पडला आहे. त्यातच अनेक मराठा घराणी भाजपच्या बाजूने गेल्यामुळे विरोधकांची शक्ती कमी झाली आहे. तर शिवसेनेकडे असा काहीही मुद्दा उरलेला नाही. सत्तेत असूनही विरोधकांप्रमाणे भूमिका घेतल्याने शिवसैनिकांमध्येच संभ्रम आहे. त्यामुळे विधानसभेला स्वबळावर लढल्यास भाजपसाठी ही बाब फायद्याची ठरू शकते.