शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

महाविकास आघाडीत कुरघोडी, जागावाटपावरून वाद; एक मित्रपक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 17:50 IST

विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर राज्यात राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. त्यात जागावाटपावरून मविआत रस्सीखेच सुरू असल्याने अद्याप जागावाटप जाहीर झाले नाही. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता काही दिवस शिल्लक आहेत. त्यात अद्याप महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर झाले नाही. मात्र इच्छुकांनी आपापल्या मतदारसंघात तयारीला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीत २६० जागांवर तिन्ही पक्षाचे एकमत झालं असलं तरी उर्वरित २८ जागांवरून प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. त्यात महाविकास आघाडीत तीन प्रमुख पक्ष वगळता इतर मित्र पक्षांनाही सामावून घ्यावे लागणार असल्याने मविआत जागावाटपावरून कुरघोडी सुरू आहे.

सांगोला मतदारसंघात विद्यमान आमदार शिवसेनेचा आहे, त्याठिकाणी मविआत ही जागा ठाकरेंच्या वाट्याला जाणार आहे. परंतु तिथे शेतकरी कामगार पक्षाने दावा केला आहे. शेकापकडून या मतदारसंघात निवडणुकीची तयारीही केली जात आहे. मात्र त्यातच ठाकरेंनी सांगोला मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आलेले दीपक आबा साळुंखे यांना पक्षप्रवेश दिला आहे. त्यामुळे सांगोला मतदारसंघात दीपक आबा मशाल चिन्हावर उभे राहतील हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे नाराज शेकाप नेत्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. या मतदारसंघात गणपतराव देशमुख यांच्या रुपाने शेकापने ६० वर्ष नेतृत्व केले आहे. त्यामुळे इथं शेकाप उमेदवार अनिकेत देशमुख विधानसभा लढण्याची तयारी करत आहेत. मात्र ठाकरेंकडून ही जागा सोडण्यास नकार देण्यात आला आहे.

काँग्रेस-ठाकरे गटात वादंग

विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर जागावाटपासाठी मविआ नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. मात्र काही जागांवर जोरदार चुरस आहे. त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला. आता वेळ खूप झालाय. महाराष्ट्रातील काँग्रेस नेते निर्णय घेण्यास सक्षम नाहीत. वारंवार त्यांना दिल्लीत यादी पाठवावी लागते, मग चर्चा होते. आता ही वेळ निघून गेलीय. लवकरात लवकर निर्णय व्हावा असं आम्हाला वाटतं. राष्ट्रवादी आणि आमच्यात मतभेद नाहीत. काँग्रेससोबतही नाही. परंतु काही जागा आहेत ज्यावर तिन्ही पक्षांचा दावा आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांडच्या नेत्यांशी मी बोलणार आहे असं राऊतांनी सांगितले.

दरम्यान, संजय राऊतांचे नेते उद्धव ठाकरे आहेत, जितेंद्र आव्हा़ड, जयंत पाटील यांना त्यांचे नेते शरद पवार यांना माहिती द्यावी लागते. परंतु आमची नेमणूक जी केलीय ती मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधींनी केली आहे. त्यामुळे आमच्या नेत्यांना माहिती द्यावी लागते. हायकमांड बसून हे निर्णय घेतील. त्यामुळे संजय राऊतांचं म्हणणं नेमकं मला कळलं नाही त्यावर मी बोलणार नाही असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे.   

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४