शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

"... म्हणून पहिल्या दिवशी राज ठाकरे आणि आम्ही कुटुंबीयांनी पूरग्रस्तांकडे जाणं टाळलं"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 8:45 AM

MNS Raj Thackeray Maharashtra Flood : शर्मिला ठाकरे यांनी सांगितलं कारण. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्याच दिवशी जाण्याची इच्छा होती, असंही त्या म्हणाल्या.

ठळक मुद्देपूरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्याच दिवशी जाण्याची इच्छा होती, शर्मिला ठाकरे यांचं वक्तव्य

महाराष्ट्रात आलेल्या महापूरानं सर्व जनजीवन विस्कळीत झालं आहे. आता सर्वच भागांतून पूरग्रस्तांसाठी मदतही पोहोचू लागली आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आपल्याला पहिल्याच दिवशी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जाण्याची इच्छा होती, परंतु त्या का गेल्या नाहीत, यामागचं कारण उलगडलं आहे. राज ठाकरे यांनी आधी पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचू द्यावी असं सांगितल्यानंच उशिरा भेट दिली असल्याचं नमूद केलं. तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कार्यरत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

आपल्याला पहिल्याच दिवशी पूरग्रस्त भागाला भेट द्यायची इच्छा होती. आपण त्या ठिकाणी भेट दिल्यास तिकडे सुरू असलेल्या मदत कार्यात काही अडचण निर्माण होऊ शकते, म्हणून राज ठाकरे आणि आम्ही कुटुंबीयांनी पूरग्रस्त भागात जाणं टाळलं, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या. परंतु मनसेकडून मदत मात्र सुरू असल्याचं त्यांनी नमूद केलं. "कोकणातूल पूरग्रस्त खांदापटली, इंदापूर, कळकवणे आणि तिवरे या गावांमध्ये तातडीची मदत करण्यात येत आहे. या ठिकाणी ५०० कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तू पुरवल्या जात आहेत," अशी माहिती मनसेचे विभाग प्रमुख यशवंत किल्लेदार यांनी दिली. 

महापूरात अनेक गोष्टी वाहून गेल्या"महापूरात बँकेच्या कागदपत्रांपासून अनेक गोष्टी वाहून गेल्या. आम्ही पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू मदत म्हणून पाठवत आहोत. राज ठाकरेंच्या आवाहानानंतर मनसेचे अनेक ट्रक मदत घेऊन जात आहेत. मदत सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मनसे कार्यकर्ते काम करत आहेत. मनसेची मदत पोहोचल्याचं तेखील पोलिसांनीही फोनद्वारे सांगितलं," असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेsharmila thackerayशर्मिला ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रkonkanकोकणfloodपूर