शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

शरद पवार, उद्धव ठाकरेंची बैठक संपली; कंगनाबाबत झाला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 21:51 IST

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. सुमारे दोन तास चर्चा सुरु होती. आज वाढलेला कंगनावरील वाद आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेला मराठा आरक्षणावरील निर्णय यावर चर्चा करण्यात आल्याचे समजते.

मुंबई : अभिनेत्री कंगना राणौत आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली. या दोन्ही हाय टेन्शनच्या मुद्द्यांवर चर्चेसाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत देखील उपस्थित होते. यामध्ये कंगना राणौतबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. सुमारे दोन तास चर्चा सुरु होती. आज वाढलेला कंगनावरील वाद आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेला मराठा आरक्षणावरील निर्णय यावर चर्चा करण्यात आल्याचे समजते. याआधी मुंबई महापालिका आयुक्त उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी आले होते. 

कंगनाच्या वादावरही चर्चा झाली. या बैठकीत महापालिकेने ही कारवाई केली असून राज्य सरकारचा यामध्ये हात नाही आणि हा राज्य सरकारचाही विषय नसल्याचे शरद पवारांना पटवून देण्यात आले. यामुळे या प्रकरणाला जास्त महत्व दिले जाऊ नये असा निर्णय घेण्यात आला. 

कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केल्यानंतर शरद पवार यांनी देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई करत तिला बोलण्यासाठी अनावश्यक संधी दिली आहे. मुंबईमध्ये कित्येक अनधिकृत बांधकामे आहेत. आता अधिकाऱ्यांनी हा निर्णय का घेतला हे पहावे लागेल, असे पवारांनी म्हटले होते. तसेच प्रत्येकाला माहिती आहे की, मुंबई पोलीस सुरक्षेसाठी काम करते. यामुळे कंगना सारख्या लोकांना प्रसिद्धी देता नये, अशा शब्दांत पवार यांनी शिवसेनेचे कान टोचले आहेत. 

वेळ चुकली का?

या प्रकरणावारील माध्यमे देत असलेल्या प्रसिद्धीवरही मला आक्षेप आहे. माध्यमे ही गोष्ट मोठी करत आहेत. आपल्याला अशा गोष्टी टाळायला हव्यात, असेही पवारांनी एएनआयशी बोलताना सांगितले. तसेच बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी जी कारवाईची वेळ निवडली आहे ती देखील लोकांमध्ये चुकीचा संदेश देते, असे पवार म्हणाले होते.

कंगना येण्याआधीच कारवाईकंगना आज मुंबईत पोहोचण्याआधीच महापालिकेने तिच्या ऑफिसवर हातोडा मारायला सुरुवात केली होती. मुंबईची पीओकेशी तुलना करणे कंगना राणौतला भोवले. आज मुंबई महानगरपालिकेने कंगनाला जोरदार दणका देत, तिच्या मुंबईतील पाली हिल येथील कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवत कारवाई केली. मात्र, यावर कंगनाने पुन्हा मुंबई पीओके असल्याचे म्हणत माझे कार्यालय राम मंदिर आहे का ज्यावर बाबराने हल्ला केला, अशी टीका केली आहे. 

पालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईचे फोटो कंगनाने ट्विट केले असून बाबरची सेना, पाकिस्तान, पाकिस्तानव्याप्त काश्मीर असे उल्लेख करण्यात आले आहेत. ही लोकशाहीची हत्या असल्याचे तिने म्हटले आहे.पालिकेच्या कारवाईविरोधात कंगनाच्या वकिलाने उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाने स्थगिती देण्याआधीच कंगनाचे ऑफिस तोडण्यात आले होते. 

जग हादरले! युद्धखोर चीनने मिसाईल डागली; हिमालयाच्या नजिकचे लोकेशन

कंगनाला विनाकारण बोलायची संधी दिली, प्रसिद्धी दिली; शरद पवारांनी शिवसेनेचे कान टोचले

Reliance Jio दणका करणार; स्वस्त किंमतीचे 1 कोटी स्मार्टफोन विकणार

भारतीयांसाठी उद्या मोठा दिवस; शक्तीशाली योद्धा देशसेवेसाठी झेपावणार

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेKangana Ranautकंगना राणौतSanjay Rautसंजय राऊत