शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
2
Air India Plane Crash in Ahmedabad : पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
3
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
4
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
5
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
6
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
7
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
8
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
9
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
10
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
11
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
12
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
13
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
14
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
15
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
16
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
17
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
18
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
19
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
20
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

स्थिर सरकारवर शरद पवार बोललेत, पण...; नारायण राणेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 13:46 IST

नारायण राणे यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. तसेच त्यांच्याकडे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले होते.

मुंबई : कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. अडीच-तीन हजारांनी कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. यावर राज्यपालांकडे केलेली राष्ट्रपती राजवटीची मागणी हे भाजपाचे नाही तर आपले वैयक्तीक मत असल्याचा खुलासा खासदार नारायण राणे यांनी केला आहे. याचबरोबर त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. 

नारायण राणे यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. तसेच त्यांच्याकडे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले होते. यावर बाळासाहेब थोरात यांनी राजकारण करू नये असे म्हटले होते. यावर थोरातांना महाराष्ट्राचा काय अभ्यास आहे. महसूलमंत्री पद घरात मिळाले चांगले आहे. त्यांना विचारा हे सरकार पाच वर्षे टिकेला का? राज्यातील जनतेला वाचविण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी असे मला वाटत असल्याचे राणे म्हणाले. तसेच चला एकत्र जाऊया आणि राज्यातील हॉस्पिटल पाहुयात, असे आव्हान राणे यांनी  थोरातांना दिले. तसेच गुजरातच्या अवस्थेवर बोलण्यास नारायण राणेंनी नकार दिला. 

संजय राऊत हे बेताल बोलतात. त्यांना काय केंद्र सरकारने सल्लागार ठेवलाय का, असा प्रश्न राणे यांनी विचारला. केंद्र सरकार सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहे. राष्ट्रपती राजवटीला एवढे घाबरता कशाला असा सवाल राणे यांनी विचारला. तसेच शरद पवार यांनी यावर राज्यातील सरकार पाच वर्षे टिकणार असल्याचे सांगितल्यावर लक्ष वेधले असता राणे यांनी खोचक उत्तर दिले. 

महाराष्ट्रातल्या कोणत्याही ग्रामस्थाला विचारा राज्य सरकारची वस्तुस्थिती काय आहे ती. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पटत नाही. शरद पवार बोलले आहेत पण हे सरकार जास्त काळ टिकणार नाही. पवार जे स्थिर सरकारचे बोलले ते मला मान्य नाही. पवार सांगतात म्हणून विश्वास ठेवायचा तर ठेवा, पण हे सरकार राहणार की जाणार ते लवकरच कळेल. ऑपरेशन लोटस सुरु नाही, पण हे सरकार आपोआपच जाणार. राऊतांकडे १८० नाहीत २०० आमदार आहेत. ते खिशातच घेऊन फिरतात, असा टोला त्यांनी लगावला. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

विशालहृदयी भारत! चीनच्या नादाला लागलेल्या नेपाळने मदत मागितली; तत्काळ देऊ केली

चीनचा थरकाप उडणार! भारताची 18वी खतरनाक 'फ्लाइंग बुलेट' झेपावणार

कंगाल पाकिस्तानला कोरोना पावला; 'या' देशाकडून लाखो डॉलरची मदत

भन्नाट! सहा कॅमेऱ्यांचा Redmi K30i 5G लाँच; किंमतही आवाक्यात

व्वा भाई व्वा! भावाने न सांगताच UPSC चा फॉर्म भरला; बहीण आयएएस झाली

 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Sharad Pawarशरद पवारmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना