शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

राष्ट्रवादीचे नेते भाजपात पाठविण्याची शरद पवारांचीच खेळी?; 'या' नेत्याने केला आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 13:58 IST

वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन रॅलीच्या आगमनानंतर कार्यकर्त्यांचा मेळावा 

ठळक मुद्देवंचित बहुजन आघाडीच्या वतीने ‘सत्ता संपादन रॅली’चे आयोजन राज्यभरजे वंचितच्या जीवावर निवडून आले तेच ताटात विष कालवत आहेत - आण्णाराव पाटील वंचितमधून २५ मुस्लीम उमेदवारांना संधी देण्यात येणार - आण्णाराव पाटील

सोलापूर : वंचित बहुजन आघाडीला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे़ अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर हे ३७० जातींचे प्रतिनिधीत्व करतात. यामुळेच त्यांनी लोकसभेमध्ये अनेक जातींच्या लोकांना प्रतिनिधीत्व दिले़ याचबरोबर आगामी विधानसभेची तयारी ही सुरू केली असून, वंचितमधून २५ मुस्लीम उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे़ एमआयएम पक्षाने स्वत:हून वंचितमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला़ जे वंचितच्या जीवावर निवडून आले तेच ताटात विष कालवत आहेत असा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या संसदीय मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. आण्णाराव पाटील यांनी केला.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ‘सत्ता संपादन रॅली’चे आयोजन राज्यभर करण्यात येत आहे़ ही रॅली सोलापुरात आल़ी. यानिमित्त हुतात्मा स्मृती मंदिर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी अ‍ॅड. पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी जावेद पटेल, प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे, अमृता अलदार, नगरसेविका ज्योती बमगोंडे, शंकरराव लिंगे, सचिन माळी, बाळासाहेब बंडगर, उमर शेख, विठ्ठल पाथरुट मंचावर होते़.

पाटील म्हणाले, हे सरकार ईव्हीएम मशिनच्या बळावर निवडून आले आहे़ आम्हाला उशीर लागला तरी प्रामाणिकपणे सत्तेवर येऊ़ साधी कविता करणारा जर आज केंद्रीय मंत्री होऊ शकतात तर बाबासाहेबांचे वंशज अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर का मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत़? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.  वंचित बहुजन आघाडीला राज्यातून चांगला प्रतिसाद मिळत असून २८८ जागांसाठी साडेसहा हजार उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत, अशी माहितीही यावेळी त्यांनी दिली.

यावेळी यशपाल भिंगे, नगरसेवक चंदनशिवे, सचिन माळी, शंकर लिंगे, अमृता अलदार यांची भाषणे झाली.  सूत्रसंचालन अंजना गायकवाड यांनी केले.

सहावेळा वीज गेलीसकाळी ११ वाजल्यापासूनच हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये शीतल साठे, सचिन माळी यांचा जलसाचा कार्यक्रम सुरू होता़ या जलसालाही उत्तम प्रतिसाद उपस्थितांनी दिला़ या कार्यक्रमानंतर दुपारी अनेक नेत्यांचे मनोगत सुरू झाले़ या दरम्यान हुतात्मा सभागृहात ६ वेळा लाईट गेली़ यावेळी उपस्थितांनी मोबाईलचे टॉर्च सुरू करत घोषणाबाजी केली़ दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सत्ता संपादन रॅली ही सोलापुरात दाखल झाली़ या रॅलीचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले़ डॉ़ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास  मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी या परिसरात गर्दी केली होती़ 

टॅग्स :SolapurसोलापूरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSharad Pawarशरद पवारBJPभाजपाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019