शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

शरद पवार - राज ठाकरे एकाच विमानात; हवेत होणार 'मन(से) की बात'? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 20:20 IST

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय जवळीक वाढताना दिसत आहे.

औरंगाबाद -  आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय जवळीक वाढताना दिसत आहे. मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याचे वृत्त आले होते. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसेप्रमुख राज ठाकरे हे औरंगाबादहून एकाच विमानातून मुंबईकडे रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना ऊत आला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून विदर्भ दौऱ्यावर होते. तो दौरा आटोपल्यानंतर आज राज ठाकरे औरंगाबाद येथे आले होते. दरम्यान, आज संध्याकाळी राज ठाकरे मुंबईकडे रवाना झाले. याच विमानातून शरद पवार प्रवास करत होते. शरद पवार आणि राज ठाकरे हे एकाच विमनातून प्रवास करत असल्याने त्यांच्यात नेमकी मन(से) बात झाली, याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने आपल्या उमेदवारींच्या चाचपणीला सुरुवात केली आहे. मनसेकडून ज्या मतदारसंघात 25 हजारांपेक्षा जास्त मतदान मिळाले, अशा 40 जागांवर विधानसभा निवडणूक लढवण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळेच, मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी उत्सुक आहे.

लोकसभा निवडणुकांना काही महिनेच उरले असून त्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकांचेही पडघम वाजणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांनी निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या चाचपणीला सुरुवात झाली आहे. यंदाच्या निवडणुकीतही राज ठाकरेंच्या मनसेचा चांगलाचा प्रभाव जाणवणार असल्याचे संकेत मिळत आहेत.  त्यामुळे राज ठाकरेंना सोबत घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेस इच्छुक असल्याचे समजते. दरम्यान, राज ठाकरेंकडून पंतप्रधान मोदी अन् शिवसेनेवर होणारी टीका आणि शरद पवारांसोबत वाढणारी जवळीक लक्षात घेता मनसेही आघाडीत जाण्यासाठी सकारात्मक आहे. मात्र, याबाबत काँग्रेसने अद्यापही मौन पाळले आहे. मात्र, मनसेने आघाडीत प्रवेश केल्यास याचा फायदा निश्चितच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना होईल. या जागांवरील आघाडीचे उमेदवार निवडणूक आणण्यात मनसेची भूमिका महत्त्वाची ठरेल. 

दरम्यान, मुंबईतील काही मतदारसंघात मनसेचं स्थान भक्कम आहे. तसेच ठाणे, नाशिक, नवी मुंबई आणि पुण्यातील काही मतदारसंघात मनसे जोमाने उतरणार आहे. तर, राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यामुळे पुन्हा एकदा मनसेच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला आहे. त्यामुळे मनसेला सोबत घेऊनच भाजपाचा विजयीरथ रोखण्याचा आघाडीचा प्रयत्न राहणार आहे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेSharad Pawarशरद पवारMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण