शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

मुलीला पुढे आणण्यासाठी शरद पवारांनी नेत्यांना बाजूला केलं असावं; काँग्रेस नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 14:58 IST

शिंदे गटाचे ४०-५० आमदार आहेत त्यातील काहीच मंत्री बनलेत. १६ आमदार अपात्र झाले तर नवीन मुख्यमंत्र्यांची आवश्यकता असेल. अजित पवार हे मुख्यमंत्री बनतील असं आश्वासन भाजपाने दिले असावे असंही काँग्रेसने म्हटलं.

मुंबई – इतक्या वर्षापासून राष्ट्रवादीत धुसफुस सुरू होती. पक्ष चालवताना शरद पवारांच्या काही चुका झाल्या असतील. कौटुंबिक वादावर बोलणे योग्य होणार नाही. परंतु कौटुंबिक वाद असून त्याचा राज्याच्या राजकारणावर परिणाम होतोय. राष्ट्रवादीतील फूट वैयक्तिक पातळीवर झालीय हे खरे आहे. मुलीला पुढे आणण्यासाठी कदाचित नेत्यांना बाजूला केले असावे. हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे असा दावा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आरोप-प्रत्यारोप होत असतात. प्रफुल पटेल यांनी धमकी दिलीय, त्यांनी आत्मचरित्र लिहिलं की अनेक गोष्टी बाहेर पडतील. ज्या नेत्यांना शरद पवारांनी पुढे आणले ते आता आरोप करतायेत. महाविकास आघाडीवर या फुटीचा परिणाम झालाय. अजित पवारांसोबत जे आमदार गेले ते आमच्यासोबत होते आता तेविरोधात गेले. ४-५ मतदारसंघात त्याचा फटका बसेल. ज्याप्रकारे शिवसेनेत विभाजनानंतर नेते एकनाथ शिंदेंसोबत गेले परंतु कार्यकर्ते उद्धव ठाकरेंसोबत होते. तसेच शरद पवारांच्या बाबतीत झाले. नेते गेले पण कार्यकर्ते शरद पवारांसोबत आहेत असं त्यांनी म्हटलं.

तसेच शिंदे गटाचे ४०-५० आमदार आहेत त्यातील काहीच मंत्री बनलेत. १६ आमदार अपात्र झाले तर नवीन मुख्यमंत्र्यांची आवश्यकता असेल. अजित पवार हे मुख्यमंत्री बनतील असं आश्वासन भाजपाने दिले असावे. भाजपा, शिवसेना आमदारांमध्ये खूप नाराजी आहे. ९ राष्ट्रवादीचे आमदार बनलेत. त्यामुळे त्या जागा कमी झाल्या. बाकी जागा तिघांमध्ये वाटाव्या लागतील. राज्यातील अनिश्चिता बनली आहे. राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत. पाऊस झाला नाही, पेरणी झाली नाही. त्यात सरकारमध्ये नाराजी खूप आहे. सरकारकडे बहुमत पण आनंदी कोणच नाही असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.

दरम्यान, २०१९ मध्ये महाविकास आघाडी राज्यात बनली होती. मतदानाची आकडेवारी पाहिली तर हे आकडे जोडले तर महाविकास आघाडी ही भाजपा-शिवसेनेपेक्षा ८-१० टक्के अधिक आहे. ४८ पैकी ४२ जागा मागच्या निवडणुकीत भाजपा-शिवसेनेला मिळाल्या होत्या. महाविकास आघाडी मजबूत असतील तर भाजपा एकेरी आकड्यात आली असती. ८ ते १० जागा भाजपा जिंकल्या असत्या. त्यामुळे मविआ कमकुवत करणे भाजपाचे काम होते असा आरोप काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाAjit Pawarअजित पवार