शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

शरद पवार-राहुल गांधींची फोनवरून चर्चा, आता लवकरच...; जयंत पाटलांची महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 18:23 IST

लोकसभा निवडणुकी संदर्भात शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यात झाली चर्चा

Sharad Pawar Rahul Gandhi, Jayant Patil Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची आज महत्वपूर्ण बैठक पार पडली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना महाराष्ट्रातल्या संघटनेबाबत चर्चा केली. लोकसभेच्या जागावाटपाच्या वृतांबाबत चर्चा झाली. राज्यात किती जागा जिंकू शकतो याची माहिती त्यांना दिली असे जयंत पाटील म्हणाले. लोकसभा निवडणुकांच्या बाबतीतला महाराष्ट्रातील पेच लवकरात लवकर सोडवला जाईल. त्यासंदर्भात पवार व राहुल गांधी यांची फोनवरून चर्चा झाली आहे, असेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्रात सापडत असलेल्या ड्रग्जवर बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात ड्रग्सच्या घटना घडल्या. त्यावेळी सरकारला जबाबदार ठरवण्यात आले. पुण्यात ज्यावेळी छापेमारीत ड्रग्सचे साठे सापडले आहेत त्यावेळी वर्णन काय तर पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणाने ड्रग्स पकडले. यावेळी सरकारची जबाबदारी नाही? आज महाराष्ट्रात ड्रग्सचा सूळसुळाट आहे व कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती मोठ्या प्रमाणात हाताबाहेर गेलेली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनावर ते म्हणाले की, परीक्षेच्या दिवसांत विद्यार्थ्यांना परीक्षा स्थळापर्यंत पोहोचण्यास अडथळा येऊ नये यासाठी मनोज जरांगे यांना विनंती राहील की अशा प्रकारचे आंदोलन करताना काळजी घ्यावी. मनोज जरांगे यांच्याशी कधीही आदरणीय शरद पवार साहेबांचा संपर्क आलेला नाही, त्यांचा संपर्क कोणाशी आहे? हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत असावे असा माझा अंदाज आहे. मुख्यमंत्री व मनोज जरांगे पाटील यांच्या संवादात कशामुळे विसंवाद तयार होतोय? याचा अभ्यास करून सरकारने अशी आंदोलने वारंवार होणार नाहीत याची जबाबदारीने काळजी घेतली पाहिजे अशी सूचना त्यांनी केली.

मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांवर होणाऱ्या वारेमाप खर्चावर बोलताना ते म्हणाले की, सरकारला उत्पन्न मिळवण्याचे गांभीर्य नाही पण खर्च करण्यात स्पर्धा चालू आहे. कोणत्या मंत्र्याने काय करावं याच्यावर कोणाचेही नैतिक बंधन किंवा अंकुश राहिलेले नाही. त्यामुळे बंगल्यांवर फार मोठ्या प्रमाणात खर्च चालू आहेत, त्याचा हिशोब राज्याचे अर्थमंत्री देतील अशी आमची अपेक्षा आहे असा टोला त्यांनी लगावला.

माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईबाबत बोलताना जयंत पाटील यांनी सरकारला टोला लगावला. ते म्हणाले की, सत्यपाल मलिक स्पष्टपणाने बोलले याची त्यांना शिक्षा मिळत आहे का? हे तपासावे लागेल.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारJayant Patilजयंत पाटीलRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस