शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

ईव्हीएम विरोधामुळेच राज ठाकरेंवर चौकशीचा ससेमिरा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 13:19 IST

राज ठाकरे यांनी ईव्हीएमविरोधी लढा तीव्र केल्यानंतर त्यांना चौकशीची नोटीस आली. यावरून सत्ताधाऱ्यांना ईव्हीएमविरोध नकोय, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शानदार विजय मिळवला. अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल लागले. परंतु, काही ठिकाणी मत मोजणीत मतांच्या बेरजेत गोंधळ आढळून आला. त्यामुळे निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशिनवरील संशय वाढला. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ईव्हीएमला विरोध सुरू केला. परंतु, हा विरोधच राज ठाकरे यांच्यासाठी अडचणीचा ठरतोय. सरकार आणि ईव्हीएमविरुद्ध आवाज उठविल्यामुळे राज यांच्यामागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लावल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाहीर सभा घेत नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना विरोध केला. तसेच पुरावे सादर करत भाजपला धारेवर धरले. परंतु, भाजपने २०१४ पेक्षा यावेळी मोठे यश मिळवले. त्यामुळे विरोधकांचा हिरमोड झाला. मात्र, भाजपचा विजय ईव्हीएममुळेच झाल्याचा दावा करत राज ठाकरे यांनी ईव्हीएमविरोधी नारा बुलंद केला. त्यासाठी त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच मनसे कार्यकर्त्यांना ईव्हीएमविरोधी चळवळ उभी करण्याच्या सूचना केल्या.

राज यांच्या या लढ्याला विरोधी पक्षांचा देखील पाठिंबा मिळत आहे. त्यातच आता, राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आली. राज यांच्या पाठिशी मोठमोठी आंदोलने उभारण्याचा अनुभव आहे. राज्यातील टोल वसुली, मराठी पाट्यांचे आंदोलन आणि भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये अधिक प्राधान्य देण्याचा मुद्दा यामुळे राज ठाकरे देशभरात गाजले होते. राज यांचा ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा देशभरात गाजू नये यासाठी राज यांना चौकशीच्या फेऱ्यात अडकवले जात असल्याचा दावा विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे.

ईव्हीएमविरोधात राज ठाकरेंनी आवाज उठविला म्हणून त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावण्याचा प्रयत्न सुरु आहे. लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकायला हवा, असं राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी म्हटले आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्रीपद असणारे अमित शाह आणि राज्याचं गृहमंत्रीपद आपल्याकडे ठेवणारे देवेंद्र फडणवीस ईडीच्या चौकशीचे हत्यार किती लोकांवर उगारणार, असा सवालही विद्या चव्हाण यांनी केला.

लोकसभा निवडणुकीत राज यांनी भाजपविरुद्ध अनेक सभा घेतल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यावर कोणतीही चौकशी लावण्यात आली नाही. परंतु, राज ठाकरे यांनी ईव्हीएमविरोधी लढा तीव्र केल्यानंतर त्यांना चौकशीची नोटीस आली. यावरून सत्ताधाऱ्यांना ईव्हीएमविरोध नकोय, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

टॅग्स :EVM Machineएव्हीएम मशीनRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBJPभाजपाAmit Shahअमित शहाNCPराष्ट्रवादी काँग्रेस