शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

ईव्हीएम विरोधामुळेच राज ठाकरेंवर चौकशीचा ससेमिरा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 13:19 IST

राज ठाकरे यांनी ईव्हीएमविरोधी लढा तीव्र केल्यानंतर त्यांना चौकशीची नोटीस आली. यावरून सत्ताधाऱ्यांना ईव्हीएमविरोध नकोय, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शानदार विजय मिळवला. अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल लागले. परंतु, काही ठिकाणी मत मोजणीत मतांच्या बेरजेत गोंधळ आढळून आला. त्यामुळे निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशिनवरील संशय वाढला. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ईव्हीएमला विरोध सुरू केला. परंतु, हा विरोधच राज ठाकरे यांच्यासाठी अडचणीचा ठरतोय. सरकार आणि ईव्हीएमविरुद्ध आवाज उठविल्यामुळे राज यांच्यामागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लावल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाहीर सभा घेत नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना विरोध केला. तसेच पुरावे सादर करत भाजपला धारेवर धरले. परंतु, भाजपने २०१४ पेक्षा यावेळी मोठे यश मिळवले. त्यामुळे विरोधकांचा हिरमोड झाला. मात्र, भाजपचा विजय ईव्हीएममुळेच झाल्याचा दावा करत राज ठाकरे यांनी ईव्हीएमविरोधी नारा बुलंद केला. त्यासाठी त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच मनसे कार्यकर्त्यांना ईव्हीएमविरोधी चळवळ उभी करण्याच्या सूचना केल्या.

राज यांच्या या लढ्याला विरोधी पक्षांचा देखील पाठिंबा मिळत आहे. त्यातच आता, राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आली. राज यांच्या पाठिशी मोठमोठी आंदोलने उभारण्याचा अनुभव आहे. राज्यातील टोल वसुली, मराठी पाट्यांचे आंदोलन आणि भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये अधिक प्राधान्य देण्याचा मुद्दा यामुळे राज ठाकरे देशभरात गाजले होते. राज यांचा ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा देशभरात गाजू नये यासाठी राज यांना चौकशीच्या फेऱ्यात अडकवले जात असल्याचा दावा विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे.

ईव्हीएमविरोधात राज ठाकरेंनी आवाज उठविला म्हणून त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावण्याचा प्रयत्न सुरु आहे. लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकायला हवा, असं राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी म्हटले आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्रीपद असणारे अमित शाह आणि राज्याचं गृहमंत्रीपद आपल्याकडे ठेवणारे देवेंद्र फडणवीस ईडीच्या चौकशीचे हत्यार किती लोकांवर उगारणार, असा सवालही विद्या चव्हाण यांनी केला.

लोकसभा निवडणुकीत राज यांनी भाजपविरुद्ध अनेक सभा घेतल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यावर कोणतीही चौकशी लावण्यात आली नाही. परंतु, राज ठाकरे यांनी ईव्हीएमविरोधी लढा तीव्र केल्यानंतर त्यांना चौकशीची नोटीस आली. यावरून सत्ताधाऱ्यांना ईव्हीएमविरोध नकोय, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

टॅग्स :EVM Machineएव्हीएम मशीनRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBJPभाजपाAmit Shahअमित शहाNCPराष्ट्रवादी काँग्रेस