शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
3
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
4
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
5
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
6
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
7
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
8
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
9
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
10
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
11
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
12
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
13
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
14
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
15
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
16
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
17
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
18
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
19
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
Daily Top 2Weekly Top 5

गुपचूप-गुपचूप-

By admin | Updated: September 26, 2014 23:30 IST

सरकारनामा

विट्याच्या सदाभाऊंनी टोपी सरळ केली. टोपीची ‘कोंच’ नीट तपासली आणि संजयकाकांना फोन लावला. ‘बोला भाऊ’, असं काकांनी विचारताच भाऊंनी लगेच प्रश्नाला हात घातला, ‘आता कसं हो?...’ त्यांचा प्रश्न मध्येच तोडत काका उत्तरले, ‘भाऊ, कशाला काळजी करताय? पाचजण नाचायला लागले की, तुमचीच फत्ते!’ पण एक शंका भाऊंचं मन कुरतडत होतीच... ‘व्हय, पण तुमचं काय? तुम्ही गोपीला हात देणार की...’ त्यांचा प्रश्न संपण्याआधीच ‘हॅलो... हॅलो... ऐकायला येत नाही. रेंजमध्ये नाही. नंतर बोलू...’ असं म्हणत काकांचा फोन बंद कट झाला... तेव्हापासून काकांचा मोबाईल ‘डायव्हर्ट’ झालाय. सदाभाऊंनी लावला की, त्यावर ‘जय मल्हाऽऽर’ची टोन ऐकायला येतेय आणि ‘कॉल’ गोपीचंदच्या माणसाकडं जातोय म्हणे!विट्याच्या अनिलभाऊंचंही तसंच. त्यांनी रात्रीच आबांना कॉल केला. आबा रात्रीच फोनवर भेटतात म्हणे. (ते दिवसभर कुठं असतात, तपासा... असा प्रचार हल्ली काकांनी सुरू केलाय.) ‘आबा, तुमचं ऐकून भगवा खांद्यावर घेतलाय, पण आता कसं करायचं? तुम्ही आटपाडीकरांबरोबर राहणार, असं सगळे म्हणताहेत...’ भाऊंना आबांच्या उत्तराची अपेक्षा होती. ते काही क्षण थांबले; पण संभाषण एकतर्फीच सुरू होतं. कॉल लागताच तो कट करून आबांनी मोबाईल पीएकडं दिला होता! नंतर तर ते ‘रेंज’बाहेर गेले. ...आणि खरंच आबा ‘रेंज’बाहेर गेले. त्यांनी दंडोबाचा डोंगर गाठला. जयसिंगतात्या आधीच येऊन झाडाच्या आडोशाला थांबलेले दिसले. आबा स्वत:च जवळ गेले आणि कानात कुजबूजले, ‘तिकीट घ्या. त्येचा सूड घ्यायची संधी सोडू नका. शेंडगेबापूंना संपवल्याचा बदला घ्या.’ आबांनी हाक्केबापूंना खुणावलं. बापूंनी तात्यांच्या खांद्यावर हात टाकला. गाडीकडं नेलं. (तिथं काय झालं, हे चाणाक्ष लोकांना सांगायला हवं का?) काही वेळातच जयसिंगतात्यांनी आरेवाडी गाठली. बिरोबाकडं गाऱ्हाणं मांडलं. तेवढ्यात संजयकाकांचा फोन आला... कुणी बघतंय का, असं इकडंतिकडं बघत तात्यांनी तो झट्दिशी बंद केला. तो अजून ‘स्वीच आॅफ’ आहे!जाता जाता : साहेब साखराळेत कारखान्याच्या गेस्ट हाऊसवर झोपाळ्यावर बसलेले. सुरेशअण्णा सकाळीच तिथं पोहोचले होते. ‘अर्ज भरा, संध्याकाळी ठरवू’, असं साहेबांनी सांगूनही ते हेका सोडत नव्हते. साहेबांचा फोन वाजला. ‘बोला पाहुणे’, असं म्हणत साहेब थांबले... तिकडचं बोलणं होताच त्यांनी विचारलं, ‘ शिराळ्याकडं कसं बघू आता?... पण खर्चाचं काय? तुमची तयारी आहे काय? झेपत नसंल तर कशाला उतरताय?’ पुढं साहेबांनी फोनवरून आकडेमोड सांगितली. ती ऐकूनच सुरेशअण्णा कावरेबावरे झाले... ‘साहेब, मग तुम्ही म्हणताय तसंच करू’, असं सांगत लगेच उठले... साहेबांचा पायानं झोका सुरू झाला. पीए जवळ आला. अण्णा गेल्याचं बघून साहेब म्हणाले, ‘बरं झालं. तू वेळेवर कॉल केलास. नाहीतर अण्णांनी पाठ सोडली नसती!’- श्रीनिवास नागे