शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

वैज्ञानिक कथा, कादंबरी हेही साहित्यच, डाॅ. जयंत नारळीकर यांनी अध्यक्षीय भाषणात केला विज्ञान लिखाणाचा गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 07:10 IST

वैज्ञानिक संशोधनाचे प्रबंध वा त्या विषयातील पोटशाखेत जागतिक स्तरावरील संशोधनाचा आढावा यांना मी विज्ञान साहित्यात मानत नाही. परंतु वैज्ञानिकाने सामान्यांपर्यंत शोध पोहोचविण्यासाठी लिहिलेले लेख मी विज्ञान साहित्यात धरेन.

- धनंजय रिसोडकर कुसुमाग्रजनगरी, नाशिक : वैज्ञानिक संशोधनाचे प्रबंध वा त्या विषयातील पोटशाखेत जागतिक स्तरावरील संशोधनाचा आढावा यांना मी विज्ञान साहित्यात मानत नाही. परंतु वैज्ञानिकाने सामान्यांपर्यंत शोध पोहोचविण्यासाठी लिहिलेले लेख मी विज्ञान साहित्यात धरेन. वैज्ञानिक कल्पनेभोवती रचलेली कथा किंवा कादंबरी विज्ञान साहित्य म्हणून मानल्यास आक्षेप असू नये, असे प्रतिपादन ९४ व्या अ.भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व प्रख्यात शास्त्रज्ञ  डॉ. जयंत नारळीकर यांनी शुक्रवारी केले.विसावे शतक हे विज्ञानाचे शतक म्हटल्यास चूक ठरणार नाही. आइन्स्टाइनचा सापेक्षतावाद आणि प्लांक-आइन्स्टाइन-बोर यांचा पुंजवाद हे महत्त्वाचे मूलभूत  सिद्धांत या शतकाच्या पहिल्या पंधरा वर्षात भौतिकशास्त्राला मिळाले. अमूर्त गणिताच्या अनेक नव्या शाखा या शतकात चालू झाल्या. वर्षानुवर्षे न सुटू शकणारे प्रश्न चुटकीसरशी सोडवणारी गणकयंत्रे या शतकाच्या उत्तरार्धात मिळाली. त्यामुळे मराठीचे अपूर्णत्व जास्त कुठे जाणवत असेल तर ते विज्ञान साहित्याबाबतीत, अशी खंतही डॉ. नारळीकर यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली. नाशकात सांयकाळी संमेलनाचे उद्घाटन ‘पानिपत’कार विश्वास पाटील, पसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

कुठल्याही भाषेतील साहित्य ती भाषा वापरणाऱ्या समाजातील घडामोडींनी प्रभावित झालेले असते. साहित्याचा कोणताही विषय असाे, ते लिहिणारा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीपासून अलिप्त राहू शकत नाही. एखाद्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत ‘ह्या पुस्तकातील घटना व पात्रे काल्पनिक असून त्यांचा प्रत्यक्षाशी काहीही संबंध नाही’ इत्यादी विधाने सापडतात. त्यांनी कायद्याचे समाधान होत असेल, पण लेखकाने आत्मपरीक्षण केल्यास त्याला अशा विधानात तथ्य नसल्याचे आढळून येईल. परंतु याचा अर्थ असा नव्हे की, सामाजिक घडामोडींचे संपूर्ण प्रतिबिंब साहित्यात उमटते. एखादी भाषा पुष्कळ विकसित असेल तर समाजाचे बहुतेक पैलू त्यात उमटतात. परंतु काही महत्त्वाचे पैलू भाषेकडून उपेक्षिले गेले तर त्या बाबतीत तिला असमृद्ध समजले पाहिजे, असेही डॉ. नारळीकर यांनी नमूद केले.

विज्ञानाचे मनोरंजक चित्र समाजापुढे उभे करायचे काम अनेक लेखकांनी केले आहे. विज्ञानाची ओळख जनसामान्यांना करून देण्याची प्रथा १९व्या शतकात मायकेल फॅरॅडे याने सुरू केली. फॅरॅडेने भाषणे, प्रयोग, प्रात्यक्षिके, लेखन आदी करून शोध सोप्या भाषेत समजावून सांगितले. त्या प्रयत्नांतून जन्माला आलेली विज्ञान संस्था रॉयल इन्स्टिट्यूशन ते काम बजावीत आहे, असेही डॉ. नारळीकर यांनी अध्यक्षीय भाषणात स्पष्ट केले.

 गडकिल्ल्यांच्या स्मृती जपा : विश्वास पाटील शिवरायांच्या स्मारकाचा विचार करताना तो अमेरिकेच्या स्वातंत्र्यदेवतेपेक्षा मोठा करण्याचा विचार हा आक्रस्ताळेपणा आणि अविचार ठरेल. त्यापेक्षा सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर गडकिल्ल्यांच्या रुपात असलेल्या पाऊलखुणा जपणे, हे कर्तव्य आहे, असे मत संमेलनाचे उद‌्घाटक ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.

सत्य लिहिणारे ठरतात राष्ट्रविरोधी : जावेद अख्तरसक्षम लोकशाहीसाठी संसद, शासन, विरोधक  याचप्रमाणे सत्य बोलणारे, स्वतंत्र लिहिणारे साहित्यिकही गरजेचे असतात. त्यामुळे साहित्यिकांकडे स्वातंत्र्य असायला हवे असे प्रतिपादन जावेद अख्तर यांनी केले. ते म्हणाले, एखादा लेखक काल्पनिक लिहितो, तोपर्यंत तो चांगला वाटतो. मात्र तो सत्य लिहितो तेव्हा त्याला पूर्वी वाईट ठरवले जाई, आता त्याला राष्ट्रविरोधी ठरवले जाते. राज्यकर्ते आणि लोकांना काल्पनिक लिहलेले आवडते. मात्र रस्त्यावरील लढाई लढणारे आणि प्रश्न उपस्थित करणारे नको असतात.  साहित्यिकानी पक्षनिष्ठा पाळत न बसता देशहितासाठी लिहिले पाहिजे.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनJayant Narlikarजयंत नारळीकर