शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येला जाणाऱ्यांची संख्या घटली, स्पाइसजेटनं विमान सेवा बंद केली!
2
तो फोन शेवटचा! मुलांना मन लावून अभ्यास करण्याचा सल्ला अन्...; काळजात चर्र करणारी घटना
3
सचिन तेंडुलकरला "तेंडल्या" म्हटल्याने राज ठाकरेंनी सिद्धार्थला सुनावले होते खडेबोल, अभिनेत्याने सांगितला किस्सा
4
Kangana Ranaut : कंगनाला मिळणार इतका पगार; मोफत घरासह आलिशान सुविधा, खासदार झाल्यावर बदलणार आयुष्य
5
National News धक्कादायक! मजूर आणि शेतकऱ्यांच्या खात्यातून अचानक पैसे गायब; बँकेत घातला गोंधळ
6
'अजून किती वेळ?', सुशांतसिंह राजपूतच्या निधनाला झाली ४ वर्ष, मित्राने पोस्ट करत विचारले प्रश्न
7
Durgashtami: आज शुक्रवार आणि दुर्गाष्टमी, या संयोगावर घरच्याघरी करा लक्ष्मी कुंकुमार्चन; होतील अनेक लाभ!
8
"फोटोत दिसताय त्याप्रमाणे नेहमी हसत...", राज ठाकरेंच्या वाढदिवशी प्राजक्ताची खास पोस्ट
9
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची तरुणाईमध्ये क्रेझ; तुम्हाला माहितीये का बिहारच्या या लेकाचं शिक्षण?
10
खासदार होताच युसूफ अडचणीत; गुजरातमधील सरकारी भूखंडावर कब्जा केल्याप्रकरणी नोटीस
11
हमासनंतर आता हिजबुल्लाहनं उडवली इस्रायलची झोप, 250 रॉकेट डागले; मोठं युद्ध भडकण्याची शक्यता 
12
सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाचं आमंत्रण मिळाल्यावर पूनम ढिल्लो म्हणाल्या, "जहीर, प्लीज तिला..."
13
'आधी प्रभू रामचंद्रांची भक्ती केली, नंतर अहंकार आला, म्हणून...', RSS नेते इंद्रेश कुमार यांचा भाजपवर निशाणा
14
PHOTOS : अमेरिकेत 'सूर्या'चा रोमँटिक अंदाज! भारतीय शिलेदाराची पत्नीसोबत भटकंती
15
USA vs IRE : पाकिस्तानचे वर्ल्ड कपमधील भवितव्य आज ठरणार; अमेरिकेच्या हाती सर्वकाही
16
जबरदस्त! या कंपनीच्या शेअरवर म्यूचुअल फंडांच्या उड्या, एकाच महिन्यात खरेदी केले १४००००००० शेअर
17
Saudi vs USA: सौदी अरबने अमेरिकेला दिला ५० वर्षांतील सर्वात मोठा धक्का, प्रकरण काय?
18
विशेष लेख : ...आता दिल्लीत महाराष्ट्राची किंमत किती?
19
अजित पवार गटासह शिंदेसेनेला ‘कॅबिनेट’? ‘एनडीए सरकार’चा पहिला मंत्रिमंडळ विस्तार सप्टेंबरमध्ये
20
भारत-पाकिस्तान क्रिकेट रद्द करा! उद्धवसेनेकडून पंतप्रधानांना पाठविले पत्र

वीज पुनर्निर्मिती संयंत्रांमुळे कार्यालयांची होणार बचत; राज्य सरकारने कंपनीसोबत केला करार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 2:11 AM

राज्य सरकारने केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेडशी (ईईएसएल) गॅसवर आधारित त्रिस्तरीय वीजनिर्मिती प्रकल्पासाठी करार केला आहे. या प्रकल्पातून विजेची पुनर्निर्मिती करणे शक्य आहे.

मुंबई : राज्य सरकारने केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेडशी (ईईएसएल) गॅसवर आधारित त्रिस्तरीय वीजनिर्मिती प्रकल्पासाठी करार केला आहे. या प्रकल्पातून विजेची पुनर्निर्मिती करणे शक्य आहे. यामुळे राज्य सरकारच्या विविध कार्यालयांमध्ये विजेवर होणारा खर्च सुमारे २० टक्क्यांनी कमी करता येणार आहे.ईईएसएल ही कंपनी वीजनिर्मिती व वीज वापरासंबंधी पर्यायी सुविधांच्या क्षेत्रात काम करते. या कंपनीने वीजनिर्मितीचा खर्च काही प्रमाणात तरी भरून काढता येईल, अशा स्वरूपाची योजना आणली आहे. विजेच्या पुनर्निर्मितीसाठी कंपनीने गॅसवर आधारित त्रिस्तरीय वीजनिर्मिती संयंत्र तयार केले आहे.ही यंत्रे बसवण्याबाबत कंपनीने शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य सरकारशी करार केला आहे.या करारानुसार, कंपनीकडून राज्य सरकारच्या मालकीची रुग्णालये, उपाहारगृहे, आमदार निवास, मोठ्या संस्था, कार्यालये तसेच मोठी प्रशासकीय कार्यालये येथे गॅसवर आधारित त्रिस्तरीय वीजनिर्मिती संयंत्रे (ट्राय पॉवर जनरेटर) बसविली जाणार आहेत. या संयंत्रांपासून ७ मेगावॅट वीज तयार होऊ शकते. यासाठी कंपनी पहिल्या टप्प्यात ७५ कोटी रुपयांची गुंतवणूक करीत आहे.यासंबंधी वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषधे प्रशासन, सार्वजनिक बांधकाम, सामान्य प्रशासन व आदिवासी विकास या पाच विभागांशी करार झाला आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ कुमार व संबंधित विभागाचे सचिव यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. ही संयंत्रे भविष्यात टप्प्याटप्पाने सर्वच कार्यालयात बसविण्याचा विचार सुरू आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र