शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

Santosh Deshmukh: सरकारी वकिलांनी खटला चालवण्यास नकार का दिला?; दानवेंनी सरकारकडे केल्या तीन मागण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 16:40 IST

Santosh Deshmukh News: राज्यभर गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तीन मागण्या राज्य सरकारकडे केल्या आहेत.

संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर काही अजूनही फरार आहेत. दरम्यान, हत्येचा हा खटला बीड जिल्ह्याबाहेर चालवण्याची मागणी जोर धरताना दिसत आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा खटला बीड जिल्ह्याबाहेर चालवण्यासह तीन मागण्या राज्य सरकारकडे केल्या आहेत. सरकारी वकिलांनी खटला लढण्यास नकार दिल्याच्या मुद्द्यावरही दानवेंनी शंका उपस्थित केली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल भूमिका मांडली. त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी काही मुद्दे उपस्थित करत राज्य सरकारकडे तीन मागण्या केल्या आहेत.   

अंबादास दानवे म्हणाले, "ज्या आरोपींचे मोबाईल जप्त झाले, त्यात व्हिडीओ काय आहेत? त्यांना कोणा-कोणाचे फोन आले? कारण तीन तासांचा काळ मधला आहे. या तीन तासाच्या काळात काय काय झाले, हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. हे लवकरात लवकर बाहेर येण्याचीही गरज आहे." 

खटला बीड जिल्ह्याबाहेर चालवा -अंबादास दानवे

"सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या एसआयटीच्या टीम आहेत, त्यामध्ये महाराष्ट्रातील तरबेज अधिकारी नियुक्त केले पाहिजेत. हा खटला बीड जिल्ह्याच्या बाहेर चालला पाहिजे. देशपांडे, जे तिथले सरकारी वकील आहेत, त्यांनी खटला चालवण्यास का नकार दिला, याची सुद्धा माहिती घेतली पाहिजे, अशी मागणी मी राज्य सरकारकडे करतोय", असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले. 

सरकारी वकिलांनी ऐनवेळी दिला होता नकार

३१ डिसेंबर २०२४ रोजी वाल्मीक कराड याला केज न्यायालयात हजर करण्यात आले होते. कोर्टात सरकारी वकील एस.एस. देशपांडे हे सीआयडीच्या वतीने युक्तिवाद करणार होते. पण, त्यांनी ऐनवेळी खटला लढवण्यास नकार दिला होता. देशपांडे यांनी वैयक्तिक कारण देत दुसऱ्या वकिलांची नियुक्ती करण्याबद्दल कोर्टाला पत्र दिले होते. 

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेwalmik karadवाल्मीक कराडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस