शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

Santosh Deshmukh: सरकारी वकिलांनी खटला चालवण्यास नकार का दिला?; दानवेंनी सरकारकडे केल्या तीन मागण्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 16:40 IST

Santosh Deshmukh News: राज्यभर गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तीन मागण्या राज्य सरकारकडे केल्या आहेत.

संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर काही अजूनही फरार आहेत. दरम्यान, हत्येचा हा खटला बीड जिल्ह्याबाहेर चालवण्याची मागणी जोर धरताना दिसत आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा खटला बीड जिल्ह्याबाहेर चालवण्यासह तीन मागण्या राज्य सरकारकडे केल्या आहेत. सरकारी वकिलांनी खटला लढण्यास नकार दिल्याच्या मुद्द्यावरही दानवेंनी शंका उपस्थित केली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल भूमिका मांडली. त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी काही मुद्दे उपस्थित करत राज्य सरकारकडे तीन मागण्या केल्या आहेत.   

अंबादास दानवे म्हणाले, "ज्या आरोपींचे मोबाईल जप्त झाले, त्यात व्हिडीओ काय आहेत? त्यांना कोणा-कोणाचे फोन आले? कारण तीन तासांचा काळ मधला आहे. या तीन तासाच्या काळात काय काय झाले, हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. हे लवकरात लवकर बाहेर येण्याचीही गरज आहे." 

खटला बीड जिल्ह्याबाहेर चालवा -अंबादास दानवे

"सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या एसआयटीच्या टीम आहेत, त्यामध्ये महाराष्ट्रातील तरबेज अधिकारी नियुक्त केले पाहिजेत. हा खटला बीड जिल्ह्याच्या बाहेर चालला पाहिजे. देशपांडे, जे तिथले सरकारी वकील आहेत, त्यांनी खटला चालवण्यास का नकार दिला, याची सुद्धा माहिती घेतली पाहिजे, अशी मागणी मी राज्य सरकारकडे करतोय", असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले. 

सरकारी वकिलांनी ऐनवेळी दिला होता नकार

३१ डिसेंबर २०२४ रोजी वाल्मीक कराड याला केज न्यायालयात हजर करण्यात आले होते. कोर्टात सरकारी वकील एस.एस. देशपांडे हे सीआयडीच्या वतीने युक्तिवाद करणार होते. पण, त्यांनी ऐनवेळी खटला लढवण्यास नकार दिला होता. देशपांडे यांनी वैयक्तिक कारण देत दुसऱ्या वकिलांची नियुक्ती करण्याबद्दल कोर्टाला पत्र दिले होते. 

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेwalmik karadवाल्मीक कराडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस