शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

Sanjay Raut : "या सरकारमध्ये एकच शहाणा माणूस आहे असं वाटत होतं, पण..."; राऊतांचा फडणवीसांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 10:45 IST

Sanjay Raut Slams BJP Devendra Fadnavis : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपाचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार १६ आमदारांच्या अपात्रतेवर  निर्णय घेताना कोणतीही घाई मी करणार नाही; पण विलंबही करणार नाही. माझा निर्णय संविधानातील तरतुदी व कोर्टाच्या निर्देशानुसार असेल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. याच दरम्यान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपाचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे. "सरकारमध्ये जर कोणी शहाणा माणूस असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत असं माझं पहिल्यापासून मत होतं. पण फडणवीसच असं बोलत असतील तर शहाणपणाच्या व्याख्या आणि भूमिका बदलाव्या लागतील" असं म्हणत निशाणा साधला आहे. 

"सध्या महाराष्ट्राचं दिल्लीच्या दारातलं पायपुसणं झालं आहे. त्याला जबाबदार सध्याचं सरकार आहे" असं म्हणत संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. "सर्वोच्च न्यायालयाने मेलेल्य़ा पोपटाविषयी भाष्य केलं आहे. पोपट मेलेलाच आहे फक्त ते विधानसभा अध्यक्षांनी जाहीर करायचं आहे. शिंदे गटाचा पोपट हा मेलेला आहे. मला असं वाटलं होतं की या सरकारमध्ये एकच शहाणा माणूस आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. या अख्ख्या सरकारमध्ये जर कोणी शहाणा माणूस असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत असं माझं पहिल्यापासून मत होतं. बाकी सगळे अतिशहाणे किंवा मूर्ख आहेत. पण देवेंद्र फडणवीसच असं बोलत असतील तर शहाणपणाच्या व्याख्या आणि भूमिका बदलाव्या लागतील."

"मी पुन्हा पुन्हा सांगतोय की त्यांना वकिलीचं चांगलं ज्ञान आहे. त्यांना कायदा कळतो, प्रशासन कळतं. राजरकारण माहितीय, पडद्यामागे काय चाललंय हे माहितीय तरी ते अशी वक्तव्य करताहेत म्हणजे त्यांची काहीतरी मला मजबूरी दिसतेय. सध्या महाराष्ट्राचं दिल्लीच्या दारातलं पायपुसणं झालं आहे. त्याला जबाबदार सध्याचं सरकार आहे" असं म्हणत संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे. 

ठाकरे गटाने १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकर निर्णय घेण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर, नैसर्गिक न्यायतत्त्वानुसार संबंधितांना म्हणणे मांडण्याची संधी दिली जाईल. आपली बाजू मांडण्यासाठी काहींनी वेळ मागून घेतला आहे, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले. आमदार अपात्रतेसंदर्भात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण व्हायला जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ म्हणजे -‘रिझनेबल टाइम’ अशी व्याख्या अध्यक्ष नार्वेकर यांनी केली. तसेच  कोर्टाने दिलेल्या निकालानुसार १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिष्टमंडळाने सोमवारी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना भेटून केली. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय