शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार 10व्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री; NDA च्या बैठकीत शिक्कामोर्तब, उद्या शपथविधी
2
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
3
काँग्रेस नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; बैठकीत काय ठरले? सुप्रिया सुळेंनी दिली मोठी अपडेट
4
राफेलला बदनाम करण्यासाठी..., चीनने भारत-पाक युद्धात एआय फोटो व्हायरल केले, अमेरिकी अहवालात धक्कादायक खुलासा
5
मुंबईत बांधकाम व्यावसायिकाला भरदिवसा घातल्या गोळ्या; कारमध्ये बसलेले असताना झाडल्या गोळ्या
6
बाजारात जोरदार 'यू-टर्न'! IT क्षेत्रात बंपर खरेदी, एचसीएल-टीसीएससह 'या' शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
'राज' सिनेमातली 'ती' आज कुठे गायब? भूताच्या भूमिकेत दिसली; बिपाशा बासूवरही पडलेली भारी
8
निरोगी त्वचा, मजबूत केस, वजन कमी करण्यासाठी बेस्ट ठरते मेथी; 'हे' आहेत १० जबरदस्त फायदे
9
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
10
बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ४५ भारतीयांचे अंत्यसंस्कार सौदी अरेबियातच होणार! कुटुंबीयांनी दिली मंजूरी
11
PPF मध्ये विना गुंतवणूक करताच दर महिन्याला कमावू शकता २४ हजार रुपये; वापरू शकता 'ही' पद्धत
12
ठरलं! RSS सरसंघचालक मोहन भागवत मणिपूरला जाणार; जातीय हिंसाचारानंतर प्रथमच ३ दिवसीय दौरा
13
कार्तिक अमावस्या २०२५: गुरुवार, २० नोव्हेंबर कार्तिक अमावस्या; 'या' ७ राशींना छोटी चूकही पडू शकते महाग
14
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
15
आयकर अधिकाऱ्यांच्या रडारवर 'ही' दिग्गज कंपनी; स्टॉक विक्रीसाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, शेअर आपटला
16
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
17
सिनेमाच्या स्टोरीला शोभणारा प्रकार ! बँक मॅनेजर बनला चोर ; ऑनलाईन गेमिंगच्या नादात बँकेतून केली १ कोटी ५८ लाखांची चोरी
18
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
19
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
20
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 10:51 IST

बाळासाहेबांची प्रकृती चिंताजनक होती तेव्हा मी तिथे होतो. शेवटच्या क्षणापर्यंत मी तिथे होतो. आम्ही मोजकेच लोक होतो. आम्हाला माहिती आहे. आमच्या सगळ्यांची काय अवस्था होती. रामदास कदम कुठे होते? कुणी नव्हते असं त्यांनी सांगितले.

मुंबई - ज्या रामदास कदमांना विधान परिषदेवर पाठवण्यासाठी पक्षातील लोकांचा विरोध होता तरीही उद्धव ठाकरे यांनी त्यांना कायम संधी दिली. आज ते जे गरळ ओकतायेत. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांची विटंबना हे लोक करत आहेत त्यांना याची जबर किंमत मोजावी लागणार आहे असा हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी रामदास कदम यांच्या आरोपावर ते बोलत होते. 

संजय राऊत म्हणाले की, १२ वर्ष रामदास कदम यांना विधान परिषदेवर पाठवले होते, अशा माणसांनी ठाकरे कुटुंबासोबत कृतज्ञ राहायला पाहिजे होते मात्र आता ते गरळ ओकत आहेत. बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर जी विटंबना हे लोक करतायेत, त्याची जबर किंमत या लोकांना मोजावी लागेल. बाळासाहेब ठाकरेंबाबत तुम्ही अशी विधाने करताना तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत. ज्या घटनाक्रमाबद्दल ते सांगतायेत तेव्हा तुम्ही इथं उपस्थित नव्हता. शेवटचे ८ दिवस बाळासाहेबांची प्रकृती चिंताजनक होती तेव्हा मी तिथे होतो. शेवटच्या क्षणापर्यंत मी तिथे होतो. आम्ही मोजकेच लोक होतो. आम्हाला माहिती आहे. आमच्या सगळ्यांची काय अवस्था होती. रामदास कदम कुठे होते? कुणी नव्हते असं त्यांनी सांगितले.

तसेच उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूची, त्यांच्या मृतदेहाची विटंबना करण्याइतपत या लोकांची मजल गेली असेल तर त्याची जबर किंमत मोजावी लागेल. आज १२ वाजता अनिल परब यांची पत्रकार परिषद आहे. पद आणि पैसा यासाठी एखादी व्यक्ती किती खालच्या पातळीवर जाऊ शकते हे रामदास कदम यांनी दाखवून दिले. रामदास कदम यांनी पक्षात काम केले, त्यांनाही पक्षाने भरपूर दिले. खासकरून उद्धव ठाकरे यांनी रामदास कदमांना दिले. विरोधी पक्षनेते पद, मंत्रिपद हे उद्धव ठाकरेंनी दिले. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर जेव्हा पक्षाची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्या हाती गेली. तेव्हा बाळासाहेबांसोबत काम करणाऱ्या या नेत्यांना उद्धव ठाकरे यांनी सन्मानाने वागणूक दिली असं संजय राऊत यांनी म्हटलं. 

दरम्यान, या प्रसंगावर फक्त टाळ्या मिळवण्यासाठी अशी विधाने केली जात आहेत परंतु त्यांना टाळ्या नाही तर महाराष्ट्र त्यांच्यावर थुंकतोय. मराठी माणूस जो बाळासाहेब ठाकरे यांची विटंबना करतो त्यांच्यावर थुंकतो. आम्ही अजून जिवंत आहोत. काय करायचे यापुढे ते आम्ही पाहू. पद आणि पैशासाठी वेडा झालेला माणूस कुठल्याही प्रकारची विधाने करतो. अनिल परबांची पत्रकार परिषद नीट ऐका, त्यावर ते बोलतील. एकनाथ शिंदेंपासून सगळे जे पक्ष सोडून गेलेत, जे भाजपाच्या चरणी विलीन झालेत. शाहांच्या जोड्याची शस्त्र म्हणून पूजा करतायेत ते कधीही बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानत नाहीत असंही संजय राऊत यांनी सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sanjay Raut slams those disrespecting Balasaheb Thackeray after death, warns consequences.

Web Summary : Sanjay Raut criticized Ramdas Kadam for disloyalty and disrespecting Balasaheb Thackeray after his death. He warned of severe consequences for those defaming Thackeray and his legacy for personal gain, especially regarding his final days.
टॅग्स :Ramdas Kadamरामदास कदमSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे