“उद्या हे सांगतील मुंबई महाराष्ट्रासाठी मेलेले १०६ हुतात्मे जैन होते”: राऊत, शिंदेंवरही टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 11:35 IST2026-04-01T11:32:50+5:302026-04-01T11:35:09+5:30

Sanjay Raut: सर्वांत आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा व्हायला पाहिजे. ताराराणीचे असे धर्मांतर सुरू असताना मरहट्टे म्हणून मिरवणारे सत्ताधारी गप्प बसले आहेत, अशी विचारणा संजय राऊतांनी केली.

sanjay raut criticized eknath shinde and mahayuti govt over tararani issue | “उद्या हे सांगतील मुंबई महाराष्ट्रासाठी मेलेले १०६ हुतात्मे जैन होते”: राऊत, शिंदेंवरही टीका

“उद्या हे सांगतील मुंबई महाराष्ट्रासाठी मेलेले १०६ हुतात्मे जैन होते”: राऊत, शिंदेंवरही टीका

Sanjay Raut: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे स्वत:ला मराठी किंवा मराठा समजतात. त्यांच्या उपस्थितीत महाराणी ताराबाई यांचा वंश आणि कुळ बदलण्याचा प्रयत्न झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यावर साधा निषेध केला नाही. महाराणी ताराराणी या जैन असल्याचा साक्षात्कार काही जैन मुनींना झाला. त्यांना असे का वाटले, ते मला माहिती नाही. त्यांच्याकडे बहुतेक काही शूर पुरुष किंवा वीरांगना नसल्यामुळे त्यांना असे वाटले असेल, असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला.

ताराराणी यांनी औरंगजेबाशी प्रचंड मोठी झुंज दिली. म्हणजे हंबीरराव मोहिते जैन होते का? हिंदू मराठा कुळात ताराराणी यांना जन्म झाला. शास्त्र जन्माला जागून त्यांनी तलवार आपल्या हातात घेतली. संपूर्ण महाराष्ट्राच एक प्रकारे वेगळ्या पद्धतीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न महायुतीच्या राजवटीत सुरू झालेला दिसतो, अशी टीका संजय राऊतांनी केली.

मुंबई महाराष्ट्रासाठी मेलेले १०६ हुतात्मे सुद्धा जैन होते! 

यासंदर्भात एक्सवर एक पोस्टही संजय राऊतांनी केली आहे. त्यात संजय राऊत म्हणाले की, काय सुरू आहे महाराष्ट्रात? शिवरायांचे राज्य इतके नपुसंक का झाले आहे? एक जैन मुनी उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या समोर सांगतात की महाराणी ताराराणी जैन धर्मीय होत्या! औरंगजेबाशी  झुंज देणाऱ्या वीरांगना ताराराणींचे धर्मांतर करण्याचा अधिकार याना दिला कोणी? ताराराणी शिवरायांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाकल्या सुनबाई म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांच्या धर्मपत्नी होत्या! ताराराणीचे असे धर्मांतर सुरू असताना मरहट्टे म्हणून मिरवणारे सत्ताधारी गप्प बसले आहेत, का? कशासाठी? उद्या हे सांगतील आमच्या मुंबई महाराष्ट्रासाठी मेलेले १०६ हुतात्मे सुद्धा जैन होते! यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री टाळ्या वाजवतील!, या शब्दांत संजय राऊतांनी निशाणा साधला.

सर्वांत आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा व्हायला पाहिजे

पण तुम्ही आमचे राजे, महाराजे, महाराणी यांना तुम्ही परस्पर जैन ठरवायला लागलात. म्हणजे तुमची विचारधारा, विकृती कोणत्या थराला गेली आहे. कुठे गेल्या आता मराठा संघटना? मराठी अस्मितेचे आमचे सहकारी. ताराराणी विषयी अशी वक्तव्य धर्मांतर दाखवणारी होत असतील तर नुसता निषेध करुन चालणार नाही. सर्वांत आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा व्हायला पाहिजे. ते तिथे उपस्थित होते. त्यांनी तिथे साधे अवाक्षरही काढले नाही. कदाचित त्यांना ताराराणी माहिती नसेल त्यांनी ताराबेन ऐकले असेल. पण त्या ताराराणी आहेत, असा हल्लाबोल राऊतांनी केला.

दरम्यान, धर्मांतर विरोधी कायदा आणलेला आपण महाराष्ट्रात. तुम्हाला धर्मांतर करता येणार नाही. तुम्ही आमच्या ताराराणींच जबरदस्तीने धर्मांतर करत आहात. याच्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे. तुम्ही आमच्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्येच ताराराणीचे, छत्रपती राजाराम यांच्या पत्नीचे, झुंजार वीरांगना ताराराणी यांचे अशा प्रकारे धर्मांतर करण्याचा अधिकार कोणी दिला? यामागे काय षड्यंत्र आहे?

Web Title : राउत ने शिंदे पर साधा निशाना: शहीदों को कल जैन कहा जा सकता है

Web Summary : संजय राउत ने डिप्टी सीएम शिंदे की रानी ताराबाई को जैन बताने के दावों का विरोध न करने पर आलोचना की। उन्हें डर है कि ऐतिहासिक हस्तियों, यहां तक कि शहीदों को भी झूठा जैन कहा जा सकता है, सरकार की चुप्पी और विचारधारा पर सवाल उठाया।

Web Title : Raut Slams Shinde: Claims Martyrs Could Be Called Jain Tomorrow

Web Summary : Sanjay Raut criticizes Deputy CM Shinde for not opposing claims of Queen Tararani being Jain. He fears historical figures, even martyrs, might be falsely labeled Jain, questioning the government's silence and ideology.