शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

समृद्धी महामार्गाने साधली समृद्धी, १६ हजार ७०० शेतकऱ्यांना ४ हजार ३०० कोटी रुपयांची भरपाई

By यदू जोशी | Published: April 06, 2018 4:39 AM

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीसाठी आतापर्यंत १६ हजार ७०० शेतकºयांना ४ हजार ३०० कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. त्यातील ६० टक्के शेतकºयांना भूसंपादनानंतर केवळ पाच दिवसांत भरपाई देण्याचा विक्रम राज्य रस्ते विकास महामंडळाने केला आहे.

मुंबई - नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीसाठी आतापर्यंत १६ हजार ७०० शेतकºयांना ४ हजार ३०० कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. त्यातील ६० टक्के शेतकºयांना भूसंपादनानंतर केवळ पाच दिवसांत भरपाई देण्याचा विक्रम राज्य रस्ते विकास महामंडळाने केला आहे. यातील ७० टक्क्यांहून अधिक शेतकºयांनी शेतजमिनीची अन्यत्र खरेदी करून या महामार्गामुळे शेतकरी भूमिहीन होणार असल्याचा आरोप खोटा ठरविला आहे.या महामार्गासाठी ज्यांनी जमीन दिली त्यांना मिळालेल्या रकमेतून समृद्धीचा नवा मार्ग कसा खुला झाला याची आकडेवारीच एमएसआरडीसीने नेमलेल्या एका एजन्सीने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. या महामार्गामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राची प्रचंड आर्थिक प्रगती होत असताना त्यासाठी जमीन गेलेले शेतकरी देशोधडीला लागतील, अशी टीका होत होती. तथापि, आतापर्यंत देण्यात आलेल्या मोबदल्याची रक्कम आणि त्या रकमेचा शेतकºयांनी केलेला विनियोग बघता प्रकल्पग्रस्तांचेही आर्थिक परिवर्तन होत असल्याचे दिसते.एकूण ६४०० शेतकºयांचे सर्वेक्षण करण्यात आले. ३८ टक्के शेतकºयांनी जमीन खरेदीतच पैसा गुंतविला. ६ टक्के शेतकºयांनी कृषीपूरक व्यवसायात (ट्रॅक्टर, बैलगाडी खरेदी, शेतात विहिरी खोदणे, सूक्ष्म सिंचन, शेतीला कुंपण घालणे) गुंतवणूक केली. १० टक्के शेतकºयांनी कृषी व्यवसायाव्यतिरिक्त (डेअरी, पोल्ट्री फार्म, किराणा) यात गुंतवणूक केली. ४५ टक्के शेतकºयांनी फिक्स्ड् डिपॉझिट, म्युच्युअल फंड, प्रवासी वाहनांची खरेदी, घरबांधणी वा प्लॉट खरेदीत पैसा टाकत समृद्धी साधली. ७४ टक्के शेतकºयांनी काही पैसा मुलांच्या भविष्यातील शिक्षणासाठीची तरतूद म्हणून गुंतविला. ७१ टक्के शेतकºयांनी आपल्या कुटुंबाला आधार व्हावा यासाठीही गुंतवणूक केली. ५० टक्क्यांहून अधिक शेतकºयांचा पुन्हा शेतजमीन खरेदी करण्याकडे कल असल्याचे या सर्वेक्षणात आढळले.भूसंपादन आणि मोबदल्याबाबत समाधानी असल्याचे सांगत भूसंपादनाची प्रक्रिया पारदर्शक होती, असे मत ९० टक्के शेतकºयांनी नोंदविले. नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्यांमधून हा समृद्धी महामार्ग जाणार असून त्या दहाही जिल्ह्यांत हे सर्वेक्षण करण्यात आले.या महामार्गासाठी आवश्यक असलेल्या जमिनीपैकी ७५ टक्के संपादन आतापर्यंत पूर्ण झाले असून येत्या एक-दीड महिन्यात कार्यारंभ आदेश देण्यापूर्वी ९० टक्के भूसंपादन झालेले असेल, असा विश्वास एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारFarmerशेतकरी