शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

संभाजीराजेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; म्हणाले, 'इतिहास तज्ज्ञांची समिती नेमून...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 21:40 IST

Sambhajiraje Chhatrapati Devendra Fadnavis: संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलेल आहे. छत्रपती ताराबाई महाराणी यांच्यासंदर्भात हे पत्र आहे. 

Sambhajiraje Chhatrapati News: संभाजीराजे छत्रपती यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. छत्रपती ताराबाई महाराणी यांच्या समाधी स्थळाबाबत संभाजीराजेंनी हे पत्र लिहिले असून, एक इतिहास तज्ज्ञांची समिती नेमण्याची मागणीही केली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सरकारचे लक्ष छत्रपती ताराबाई महाराणी यांच्या समाधीच्या दुरावस्थेकडे वेधले आहे. 

संभाजीराजेंनी पत्रात काय म्हटलं आहे?

"शिवपुत्र श्री छत्रपती संभाजी महाराज व श्री छत्रपती राजाराम महाराज यांच्यानंतर स्वराज्याची धुरा हाती घेऊन ज्यांनी सात वर्षे औरंगजेचाशी लढा दिला व श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या हिंदवी स्वराज्याचे रक्षण केले, त्या शिवस्नुषा, मुघलमर्दिनी छत्रपती ताराबाई महाराणी साहेब यांचे स्मृतिस्थळ सातारा येथे संगम माहुली या ठिकाणी असल्याचे इतिहास अभ्यासकांनी मांडले आहे."

"पतीच्या मृत्यूनंतर खचून न जाता, शस्त्र हाती धरून रणांगणात उतरून औरंगजेबासारख्या क्रूर व बलाढ्य बादशहाला या महाराष्ट्राच्या मातीतच ज्यांनी गाडले, त्या स्वराज्यरक्षिका ताराराणी साहेबांचे स्मृतिस्थळ हे महाराष्ट्रासाठी जाज्वल्य प्रेरणास्थान आहे", असे संभाजीराजेंनी म्हटले आहे. 

संभाजीराजे पत्रात पुढे म्हणतात, "मात्र, सध्या हे स्मृतिस्थळ अत्यंत दयनीय व दुर्लक्षित स्थितीत आहे. महाराष्ट्र शासनाने इतिहास तज्ज्ञांची समिती नेमून या स्मृतीस्थळाबद्दल अधिक व विस्तृत संशोधन करावे व तत्काळ या स्मृतीस्थळाचा जीर्णोद्धार करावा, ही विनंती", असे संभाजीराजे छत्रपतींनी मुख्यमंत्र्यांना म्हटले आहे.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChhatrapati Sambhaji Maharajछत्रपती संभाजी महाराजMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार