शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य अकादमीने मौन सोडले

By admin | Updated: October 24, 2015 04:52 IST

डॉ. दाभोलकर, पानसरे, डॉ. कलबुर्गी व अन्य पुरोगामी विचारवंतांची हत्या तसेच देशातील वाढती असहिष्णुता याविरोधात साहित्यविश्वातून उमटू लागलेले निषेधाचे

नवी दिल्ली : डॉ. दाभोलकर, पानसरे, डॉ. कलबुर्गी व अन्य पुरोगामी विचारवंतांची हत्या तसेच देशातील वाढती असहिष्णुता याविरोधात साहित्यविश्वातून उमटू लागलेले निषेधाचे स्वर अधिकाधिक तीव्र होत असतानाच अखेर साहित्य अकादमीने शुक्रवारी आपले मौन सोडले. अकादमीच्या येथील कार्यालयाबाहेर साहित्यिकांच्या दोन गटांची परस्परविरोधी निदर्शने सुरू असतानाच कर्नाटकातील पुरोगामी कलबुर्र्गी यांच्या हत्येचा निषेध करणारा व केंद्र व राज्य सरकारांना अशा घटनांविरुद्ध ठोस पावले उचलण्याचे आवाहन करणारा ठराव अकादमीने आपत्कालीन बैठकीत पारित केला. ज्या साहित्यिकांनी पुरस्कार परत केले, ते त्यांनी पुन्हा स्वीकारावेत. शिवाय निषेधापोटी अकादमीचे राजीनामे देणाऱ्यांनी पुन्हा कामावर रुजू व्हावे, असे आवाहनही अकादमीने केले. दादरी हत्याकांड आणि देशातील वाढता जातीय तणाव या निषेधार्थ गेल्या काही दिवसांत देशभरातील सुमारे ५० साहित्यिकांनी आपले अकादमी पुरस्कार परत केले. अनेकांनी अकादमीच्या पदांचे राजीनामे दिले. याउपरही साहित्यिकांची स्वायत्त संस्था असलेल्या अकादमीने या मुद्द्यावर मौन बाळगले होते. तथापि या निषेधाची गंभीर दखल घेत, अकादमीने शुक्रवारी कार्यकारिणीची एक आपत्कालीन बैठक बोलावली. सुमारे दोन तास चाललेल्या बैठकीत २४ पैकी २० सदस्य सहभागी झाले. त्यांनी हा ठराव पारित केला. कार्यकारिणीचे सदस्य कृष्णास्वामी नचिमुतू यांनी ही माहिती दिली. परस्परविरोधी निदर्शनेसाहित्य अकादमीच्या नवी दिल्लीतील कार्यालयाबाहेर शुक्रवारी लेखकांविरुद्ध लेखक अशी निदर्शने पाहायला मिळाली. स्वत:ला पुरोगामी मानणाऱ्या लेखकांच्या एका गटाने एकीकडे देशातील वाढत्या असहिष्णुतेविरोधात पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांच्या समर्थनार्थ ‘शोक मौन’ मोर्चा काढला. तर दुसरीकडे स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवणारा अन्य एक गट पुरस्कार परत करणाऱ्यांंविरोधात मैदानात उतरला. अकादमीच्या आपत्कालीन बैठकीच्या पार्श्वभूमीवर स्वत:ला पुरोगामी मानणाऱ्या लेखकांनी तोंडावर काळ्या पट्ट्या बांधत ‘शोक मौन’ मोर्चा काढला. याचवेळी जॉइंट अ‍ॅक्शन ग्रुप नॅशनलिस्ट माइंडेड आर्टिस्ट्स अ‍ॅण्ड थिंकर्सनेही (जनमत) निदर्शने करीत, पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांमध्ये एक कवी आहेत. साहित्य अकादमीच्या पदावर त्यांचा डोळा होता. त्यात त्यांना अपयश आले. साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदासाठी निवडणुका घेण्याऐवजी ही नियुक्ती थेट सरकारद्वारे व्हावी, असा सल्ला या कवीने दिला होता. कुठल्याही विचारधारेतून नव्हे तर स्वहितांसाठी काही साहित्यिकांनी सरकारविरुद्ध निषेधाचे हत्यार उपसले आहे, असा आरोपही जनमतने केला. अकादमीचा ठरावसाहित्य अकादमी ही साहित्यिकांची आणि साहित्यिकांद्वारे संचालित होणारी संस्था आहे. अकादमी सर्व भाषिक साहित्यिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा पुरस्कार करते. कुठेही साहित्यिकांवर होणारे हल्ले, अत्याचार निंदनीय आहेत. याविरोधात केंद्र व राज्य सरकारांनी ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी अकादमी करते. नऊ साहित्यिकांनी परत केले पुरस्कारमुंबई - कवयित्री प्रज्ञा दया पवार यांच्यासह नऊ साहित्यिकांनी राज्य सरकारने त्यांना दिलेले पुरस्कार शुक्रवारी त्यांच्या रकमेसह मंत्रालयात जाऊन परत केले. पुरस्कार परत करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात गेलेल्या साहित्यिकांच्या भेटीसाठी ना मुख्यमंत्री समोर आले ना कोणी मंत्री.त्यांनी आपले पुरस्कार एका अधिकाऱ्याच्या स्वाधीन केले. यात प्रज्ञा दया पवार, हरिश्चंद्र थोरात, गणेश विसपुते, संभाजी भगत, ऊर्मिला पवार, मिलिंद मालशे, मुकुंद कुळे, येशू पाटील आणि वसंत पाटणकर यांचा समावेश होता. त्यांनी पुरस्काराचे धनादेशही परत केले. सरकारकडून होत असलेली अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आणि एकूणच दलित, अल्पसंख्यकांसह सर्वच समाजातील व्यक्तींचा जगण्याचा अधिकारच प्रतिगामी शक्ती आज हिरावून घेत आहेत. आणीबाणीच्या काळातही इतकी मुस्कटदाबी नव्हती. - प्रज्ञा पवार