शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

RSS Mohan Bhagwat: “देशासमोर अनेक आव्हाने, एक पक्ष एक नेता परिवर्तन करू शकत नाही”; मोहन भागवत स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 10:05 AM

RSS Mohan Bhagwat: देशाकरिता जगण्या-मरण्याची तयारी असलेले लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघात असल्याचे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

Maharashtra Political Crisis: एकीकडे देशातील विविध राज्यांमध्ये राजकीय सत्तासंघर्ष पराकोटीला पोहोचलेला असताना, विरोधकांकडून अनेकविध मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. यातच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी महत्त्वाचे प्रतिपादन केले आहे. देशापुढे अनेक आव्हाने उभी असतात. एक पक्ष, एक नेता या सगळ्या आव्हानांवर मात करू शकत नाही किंवा परिवर्तन घडवून आणू शकत नाही. ज्यावेळी समाज देशासाठी जगायला, मरायला तयार होतो, त्याचवेळी परिवर्तन घडून येते, असे मोहन भागवत यांनी नमूद केले. 

प्रामाणिकता, देशभक्ती, अनुशासन, ‘स्व’चे स्पष्ट भान, राष्ट्राबद्दलच्या कल्पना व देशाकरिता जगण्या-मरण्याची तयारी असलेले लोक संघात असल्याचेही मोहन भागवत यांनी सांगितले. देशापुढे आज अनेक आव्हाने आहेत. देशात मोठ्या प्रमाणात विविधता असून, या सगळ्यांना जोडण्यासाठी, संघटित करण्याची मोठी जबाबदारी समाजावर आहे. समाजानेही आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकार, संस्था, संघावर अवलंबून न राहता स्वावलंबी झाले पाहिजे, असेही ते म्हणाले. एका कार्यक्रमात ते बोलत होते. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शतकाकडे वाटचाल

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा शतकाकडे वाटचाल करीत असून, विपरीत परिस्थितीत सर्वांना जोडण्याचे काम सातत्याने करीत आला आहे. संघाला काही गोष्टींची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. जबाबदारी घेणारा समर्थ हिंदू समाज निर्माण झाला पाहिजे, या विचारातून संघाची स्थापना झाली. कोणताही नेता समाजाची निर्मिती करीत नाही, तर समाज नेता तयार करीत असतो. सर्व प्रकारच्या उपेक्षा आणि विरोधातून संघ आता अनुकूलतेच्या स्थितीत आला आहे. एक प्रचंड मोठे संघटन उभे झाले आहे. अशा स्थितीत कालच्या विरोधकांनाही जोडून घेण्यावर भर देण्याची गरज आहे. प्रामाणिकपणा, देशभक्ती, शिस्त, स्व आणि राष्ट्राची स्पष्ट कल्पना आणि देशासाठी मरण्याची भावना, हे गुण असणारा समाज निर्माण करावयाचा आहे. अनुभवाच्या कसोटीवर संघाचे काम सिद्ध झाले आहे, असेही मोहन भागवत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, ध्येयनिष्ठा, आत्मीयता, अनुशासन आणि आपपरभाव नसणे, हा संघाचा स्वभाव असून, ज्या उद्देशाने डॉ. हेडगेवारांनी संघाची स्थापना केली तो उद्देश कार्यपूर्तीपर्यंत तसाच राहील, असा विश्वास मोहन भागवत यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच ईशान्य भारताचा उर्वरित भारताशी रामायण आणि महाभारतकालापासून संबंध आहे. मात्र, नंतरच्या काळात या संबंधांची आपण उपेक्षा केली आणि त्यातून त्या प्रदेशात समस्या निर्माण झाल्या. कोणतेही आव्हान आततायीपणे काम करून दूर होत नाही. त्यासाठी दीर्घदृष्टीने काम करावे लागते. असे काम संघाने ईशान्य भारतात ४० वर्षांपूर्वी सुरू केले आणि त्याचे परिणाम आता दिसून येत आहे, असेही डॉ. भागवत म्हणाले. 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत